शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

‘टास्क फोर्स’ने भले व्हावे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 01:04 IST

राज्यात प्रामुख्याने विदर्भात कापसाचे विक्रमी उत्पादन होते. पण कापूस उत्पादक प्रदेश असलेल्या विदर्भाच्याच पदरी नेहमी निराशा आली आहे.

राज्यात प्रामुख्याने विदर्भात कापसाचे विक्रमी उत्पादन होते. पण कापूस उत्पादक प्रदेश असलेल्या विदर्भाच्याच पदरी नेहमी निराशा आली आहे. कापसाच्या हमीभावाचा प्रश्न योग्यरीत्या सुटलेला नाही. उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न होत नाही. झाले तरी भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी आत्महत्यांचे सत्र आजही सुरू आहे. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे राज्यात १ मार्च ते ३१ मे २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत ६३९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, अशी कबुली सरकारनेच विधिमंडळाच्या सभागृहात दिली आहे. यापैकी सर्वाधिक आत्महत्या विदर्भातील आहेत, हे आवर्जून नमूद करावे लागेल. काँग्रेसच्या काळातही केंद्र व राज्याने भरीव पॅकेज देऊनही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला. हजारो कोटींची उधळपट्टी होऊनही शेतकरी आत्महत्यांवर तोडगा निघालेला नाही. मुळात शेतकºयांच्या नेमक्या समस्या काय आहेत, याविषयीचाच अभ्यास केला जात नाही. हमीभावाच्या मूळ प्रश्नाकडेच कानाडोळा करून उपाययोजनेच्या मलमपट्ट्या लावल्या गेल्याने आजही आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. याआधी कापसावरील ‘लाल्या’नेही शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावला होता. नंतर कीटकनाशक फवारणीने शेतकºयांचे बळी घेतले. केवळ कापूसच नव्हे तर सोयाबीनच्या बाबतीतही असेच अनुभव आहेत. असे एकानंतर एक शुक्लकाष्ट बिचाºया शेतकºयांचे मागे लागलेले आहे. एकीकडे शेतीत सधनता आणि दुसरीकडे शेतीत अधोगती असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. नवनवीन प्रयोग करण्याची मानसिकता शेतकºयांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष शेतीचे प्रयोग शेतीवर राबविणे गरजेचे आहे. बोंडअळी असो की अन्य कुठलाही रोग त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कृषी खात्याने उचलली पाहिजे. गतवर्षी कापसावर बोंडअळी आली. प्रामुख्याने विदर्भातील शेतकºयांचेच प्रचंड नुकसान झाले. मात्र, शेतकºयांनी पीक विम्याची रक्कम भरूनही नुकसानभरपाई देणाºया कंपन्यांनी अटींची हेकेखोरी सुरू केली. यंदाच्या हंगामात अर्ध्यापेक्षा जास्त शेतकºयांची पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली असल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच बोंडअळीने नुकसान झालेल्या ४४ लाखपैकी ३८ लाख शेतकºयांच्या खात्यावर विम्याची रक्कमही जमा करण्यात आली आहे. मात्र, यात विमा कंपन्यांचा हलगर्जीपणा शेतकºयांना त्रस्त करीत आहे. राज्य सरकार अशा कंपन्यांवर कारवाई करेल आणि यासाठी ‘विशेष टास्क फोर्स’ तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली आहे. केवळ ‘टास्क फोर्स’ तयार केल्याने या प्रश्नावर कायमचा तोडगा निघेल, याची शाश्वती नाही. कारण, पीक विमा कंपन्यांबाबतचे शेतकºयांना आलेले आजवरचे अनुभव हे वाईटच आहेत. असे अनुभव पाठीशी असताना अशा विमा कंपन्यांवर कडक कारवाईचा पवित्रा सरकारने उचलणे गरजेचे आहे.