शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

शेतकऱ्यांचे बोला, नंतर भांडत बसा

By admin | Updated: July 13, 2015 00:18 IST

महाराष्ट्रात सध्या बदलाचे राजकारण सुरू आहे. पंधरा वर्षांची सत्ता हातची गेल्याने अस्वस्थ झालेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही मुद्यांचे कोलीत हातात पडताच राज्यातील

महाराष्ट्रात सध्या बदलाचे राजकारण सुरू आहे. पंधरा वर्षांची सत्ता हातची गेल्याने अस्वस्थ झालेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही मुद्यांचे कोलीत हातात पडताच राज्यातील आजवरच्या सर्व पापांचे धनी भाजपच आहे या आविर्भावात तुटून पडले आहेत. मुख्यमंत्रीही बदलाची भाषा बोलत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढण्याची धमकी त्यांनी दिली आहे. सोमवारपासून सुरू होणारे विधिमंडळाचे अधिवेशन एकमेकांच्या कुलंगड्या बाहेर काढण्याचा अड्डा बनेल असे दिसते. घोटाळे चव्हाट्यावर आणण्यासाठी या अधिवेशनाचा वापर करायला दोघेही निघाले आहेत. यासाठीच का लोकांनी यांना निवडून दिले?अधिवेशनात शेतकऱ्यांबद्दल बोला. राज्यात पाऊस जवळपास बेपत्ता आहे. शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे. त्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. इवल्याशा रोपट्यांनी माना टाकल्या आहेत. दुबार पेरणीचे संकट अख्ख्या राज्यावर आहे. विधिमंडळात ७० टक्के आमदार शेतकरी आहेत वा शेतकऱ्यांची मुलं आहेत. तरीही बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी विधिमंडळ धावून गेल्याचे दिसले नाही तर त्यासारखे दुसरे दुर्दैव नसेल. धरणं कोरडी पडताहेत, पिकलंच नाही तर चाऱ्याचा प्रश्न भीषण होईल. महागाई डोक्यावर आहेच. टँकरची संख्या वाढते आहे. जलयुक्त शिवार योजनेत निर्माण केलेले पाणीसाठे पावसाची वाट पाहून थकत आहेत. नजीकच्या काळात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनेल. शेतकरीच जगला नाही तर सरकार चालवायचं कोणासाठी? सनसनाटी आरोप-प्रत्त्यारोप करून खळबळ उडवून देण्याची ही वेळ आहे की अख्खे राज्य शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे चित्र निर्माण करणे ही आजची गरज आहे हे सर्वच पक्षांनी ठरविले पाहिजे. शिवसेना सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे अजूनही समजत नाही. ‘मित्र’ पक्ष भाजप हा नंबर एकचा शत्रू असल्यासारखी शिवसेनेच्या नेतृत्वाची विधाने असतात आणि मुखपत्रातून भाजपवर जे तोंडसुख घेतले जाते ते पाहता शिवसेना एकाचवेळी सत्तेतील भागीदार आणि विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे जाणवते. सरकारमध्ये सहभागी होऊन राज्याला स्थैर्य द्यायचे आणि त्याचवेळी राजकीय अस्थिरताही ठेवायची अशी दुटप्पी आणि तितकीच अनाकलनीय भूमिका शिवसेनेने घेतली आहे. सत्तेत राहून समाधान नसेल तर त्यांनी बाहेर पडावं. तळ्यातमळ्यात कशाला करता? एक घाव दोन तुकडे हा बाळासाहेबांचा स्वभाव होता. मातोश्रीचा स्वभाव आता बदलला की काय? शिवसेनेचे सरकारला सहकार्य नाही. दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही समन्वय नाही. मुंबई महापालिकेच्या दीड वर्षाने होणाऱ्या निवडणुकीवर डोळा ठेवून एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा भाजप-शिवसेनेत लागली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले आणि त्यांनी वीस वर्र्षे आम्हीच सत्तेत राहणार असा विश्वास पक्षजनांना दिला. केंद्र आणि राज्यात पक्षाची सत्ता असताना भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेत असलेली सत्ता भाजपला टिकवता आली नाही. खासदार नाना पटोले विरुद्ध भाजप असा सामना काही ठिकाणी झाला. भाजपचा परंपरागत मतदार असलेल्या या जिल्ह्यात नाचक्की झाली. अंतर्गत हेव्यादाव्यांनी फटका बसला. त्याचे आत्मचिंतन भाजपच्या प्रदेश कार्यालयात दिसत नाही. उलट, दोन जिल्हे गेले तर काय असा फरक पडला ही गुर्मी आहे. केंद्र आणि राज्य सरकारबद्दल लोक खुश नाहीत हे मानायला भाजपवाले तयार नाहीत ही खरी अडचण आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल फॉर्मात होते. त्यांनी शंभर सभा घेतल्या. लोकसभेत दारुण पराभव झालेले पटेल पुन्हा परतले. राज्यात आरोपांमुळे घेरलेल्या राष्ट्रवादीला दिलासा मिळाला. विशेष म्हणजे दोन्ही जिल्ह्यांत दमदार नेता नसलेल्या काँग्रेसनेही चांगले यश मिळविले. काँग्रेस लोकांच्या मनातून गेलेली नाही. जाता जाता : महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्या यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची शेती पेरून दिली. ते आणि अनेक शिवसैनिक दोन दिवस स्वत: शेतात राबले; पेरणी के ली. एखादा मंत्री असे काही करू शकतो हे अविश्वसनीय आणि तितकेच कौतुकास्पद आहे. संजूभाऊ! आपण केवळ बियाणे पेरले नाही तर माणुसकी पेरली आणि त्यातून माणुसकीच उगवेल, अशी आशा आहे.- यदु जोशी