शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

शेतकऱ्यांचे बोला, नंतर भांडत बसा

By admin | Updated: July 13, 2015 00:18 IST

महाराष्ट्रात सध्या बदलाचे राजकारण सुरू आहे. पंधरा वर्षांची सत्ता हातची गेल्याने अस्वस्थ झालेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही मुद्यांचे कोलीत हातात पडताच राज्यातील

महाराष्ट्रात सध्या बदलाचे राजकारण सुरू आहे. पंधरा वर्षांची सत्ता हातची गेल्याने अस्वस्थ झालेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही मुद्यांचे कोलीत हातात पडताच राज्यातील आजवरच्या सर्व पापांचे धनी भाजपच आहे या आविर्भावात तुटून पडले आहेत. मुख्यमंत्रीही बदलाची भाषा बोलत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढण्याची धमकी त्यांनी दिली आहे. सोमवारपासून सुरू होणारे विधिमंडळाचे अधिवेशन एकमेकांच्या कुलंगड्या बाहेर काढण्याचा अड्डा बनेल असे दिसते. घोटाळे चव्हाट्यावर आणण्यासाठी या अधिवेशनाचा वापर करायला दोघेही निघाले आहेत. यासाठीच का लोकांनी यांना निवडून दिले?अधिवेशनात शेतकऱ्यांबद्दल बोला. राज्यात पाऊस जवळपास बेपत्ता आहे. शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे. त्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. इवल्याशा रोपट्यांनी माना टाकल्या आहेत. दुबार पेरणीचे संकट अख्ख्या राज्यावर आहे. विधिमंडळात ७० टक्के आमदार शेतकरी आहेत वा शेतकऱ्यांची मुलं आहेत. तरीही बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी विधिमंडळ धावून गेल्याचे दिसले नाही तर त्यासारखे दुसरे दुर्दैव नसेल. धरणं कोरडी पडताहेत, पिकलंच नाही तर चाऱ्याचा प्रश्न भीषण होईल. महागाई डोक्यावर आहेच. टँकरची संख्या वाढते आहे. जलयुक्त शिवार योजनेत निर्माण केलेले पाणीसाठे पावसाची वाट पाहून थकत आहेत. नजीकच्या काळात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनेल. शेतकरीच जगला नाही तर सरकार चालवायचं कोणासाठी? सनसनाटी आरोप-प्रत्त्यारोप करून खळबळ उडवून देण्याची ही वेळ आहे की अख्खे राज्य शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे चित्र निर्माण करणे ही आजची गरज आहे हे सर्वच पक्षांनी ठरविले पाहिजे. शिवसेना सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे अजूनही समजत नाही. ‘मित्र’ पक्ष भाजप हा नंबर एकचा शत्रू असल्यासारखी शिवसेनेच्या नेतृत्वाची विधाने असतात आणि मुखपत्रातून भाजपवर जे तोंडसुख घेतले जाते ते पाहता शिवसेना एकाचवेळी सत्तेतील भागीदार आणि विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे जाणवते. सरकारमध्ये सहभागी होऊन राज्याला स्थैर्य द्यायचे आणि त्याचवेळी राजकीय अस्थिरताही ठेवायची अशी दुटप्पी आणि तितकीच अनाकलनीय भूमिका शिवसेनेने घेतली आहे. सत्तेत राहून समाधान नसेल तर त्यांनी बाहेर पडावं. तळ्यातमळ्यात कशाला करता? एक घाव दोन तुकडे हा बाळासाहेबांचा स्वभाव होता. मातोश्रीचा स्वभाव आता बदलला की काय? शिवसेनेचे सरकारला सहकार्य नाही. दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही समन्वय नाही. मुंबई महापालिकेच्या दीड वर्षाने होणाऱ्या निवडणुकीवर डोळा ठेवून एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा भाजप-शिवसेनेत लागली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले आणि त्यांनी वीस वर्र्षे आम्हीच सत्तेत राहणार असा विश्वास पक्षजनांना दिला. केंद्र आणि राज्यात पक्षाची सत्ता असताना भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेत असलेली सत्ता भाजपला टिकवता आली नाही. खासदार नाना पटोले विरुद्ध भाजप असा सामना काही ठिकाणी झाला. भाजपचा परंपरागत मतदार असलेल्या या जिल्ह्यात नाचक्की झाली. अंतर्गत हेव्यादाव्यांनी फटका बसला. त्याचे आत्मचिंतन भाजपच्या प्रदेश कार्यालयात दिसत नाही. उलट, दोन जिल्हे गेले तर काय असा फरक पडला ही गुर्मी आहे. केंद्र आणि राज्य सरकारबद्दल लोक खुश नाहीत हे मानायला भाजपवाले तयार नाहीत ही खरी अडचण आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल फॉर्मात होते. त्यांनी शंभर सभा घेतल्या. लोकसभेत दारुण पराभव झालेले पटेल पुन्हा परतले. राज्यात आरोपांमुळे घेरलेल्या राष्ट्रवादीला दिलासा मिळाला. विशेष म्हणजे दोन्ही जिल्ह्यांत दमदार नेता नसलेल्या काँग्रेसनेही चांगले यश मिळविले. काँग्रेस लोकांच्या मनातून गेलेली नाही. जाता जाता : महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्या यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची शेती पेरून दिली. ते आणि अनेक शिवसैनिक दोन दिवस स्वत: शेतात राबले; पेरणी के ली. एखादा मंत्री असे काही करू शकतो हे अविश्वसनीय आणि तितकेच कौतुकास्पद आहे. संजूभाऊ! आपण केवळ बियाणे पेरले नाही तर माणुसकी पेरली आणि त्यातून माणुसकीच उगवेल, अशी आशा आहे.- यदु जोशी