शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

ताठ कण्याचा प्रतिभावंत लेखक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 04:32 IST

मतकरी यांचा जन्म मुंबई १७ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. रॉबर्ड मनी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर राममोहन इंग्लिश स्कूलमधून १९५४ मध्ये ते एस.एस.सी. उत्तीर्ण झाले.

-  महेश केळुसकर(ज्येष्ठ साहित्यिक)रत्नाकर मतकरी यांचे वडील रामकृष्ण विठ्ठल मतकरी हे १९३०च्या दशकातील एक विद्याव्यासंगी वाङ्मयसेवक म्हणून प्रसिद्ध होते. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व असलेल्या रा. वि. मतकरी यांनी ‘संदेश’, ‘मौज’, ’प्रमोद’ या साप्ताहिकांमधून गडकऱ्यांच्या त्या काळी गाजत असलेल्या नाटकांवर टीकालेख लिहिले, त्यामुळे ते नाट्यवाङ्मयाचे दर्दी टीकाकार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या या नि:पक्ष टीकादृष्टीचे संस्कार रत्नाकर मतकरी यांच्या नाट्यलेखनावरआणि लेखक म्हणून एकंदरीतच आचार-विचारांवर झालेले पाहावयास मिळतात. एक चतुरस्र प्रतिभेचा आणि ताठ कण्याचा या काळातील मोठा लेखक,कलावंत म्हणून १७ मे २०२० रोजी वयाच्या ८१व्या वर्षी रत्नाकर मतकरी यांनी एक्झिट घेतल्याची बातमी कळल्यावर टी.व्ही. वाहिन्यांवरून आणि समाजमाध्यमांवर साहित्य व नाट्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांच्याबद्दल ज्या जिव्हाळ्याने आठवणी सांगितल्या, त्यावरून मतकरी हे एक दुर्मीळ रसायनहोतं, असं म्हणावं लागेल. एकाच वेळी सत्यअणि न्यायाची बाजू घेत परखड विश्लेषण करीत राहणं आणि सहृदयतेने सर्जनशीलतेबाबत कमालीचीआस्था बाळगत चारी दिशांना लोकप्रियता मिळविणं, आदर मिळविणं मराठीत आजघडीला सोपं राहिलेलं नाही; पण रत्नाकर मतकरी यांनी आपल्या प्रतिभाशक्तीनं ते साध्य केलं.मतकरी यांचा जन्म मुंबई १७ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. रॉबर्ड मनी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर राममोहन इंग्लिश स्कूलमधून १९५४ मध्ये ते एस.एस.सी. उत्तीर्ण झाले. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक वेळा पहिला क्रमांक पटकाविला होता. १९५४-५५ मध्ये ‘नवशक्ती’मधून झालेल्या रंग स्पर्धांमध्ये रत्नाकर रामकृष्ण मतकरी या तरुणाने पहिला क्रमांक मिळवून त्यातील ‘नाईटस् आॅफ द राऊंड टेबल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एमजीएमने लावलेल्या स्पर्धेत १०० रुपयांचे बक्षीस मिळविले. चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि नाट्य स्पर्धांमधून उत्कृष्ट परफॉर्मन्स देत एलफिन्स्टन कॉलेज गाजवून सोडणाºया रत्नाकर मतकरी यांनी (तत्कालीन) बॉम्बे युनिव्हर्सिटीचा प्रतिनिधी म्हणून इंटर-युनिव्हर्सिटी यूथ फेस्टिव्हलमध्येही प्रभावी कामगिरी केल्याची नोंद इतिहासकार गुं. फ. आजगावकर यांनी करून ठेवली आहे. (संदर्भ- कुडाळदेशकर (इतिहास आणि व्यक्ती) प्र. आ. १९५५)वयाच्या १७व्या वर्षांपासून रत्नाकर मतकरी आकाशवाणीशी जोडलेले होते. ‘वेडी माणसे’ ही त्यांनी लिहिलेली श्रुतिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ‘युववाणी’ कार्यक्रमात १६ फेब्रुवारी १९५५ रोजी प्रसारित झाली. त्यानंतर मग त्यांची किती नाटकं, व्याख्यानं, मुलाखती आकाशवाणीवरून झाल्या, याची गणती खूपच होईल. २००५ मध्ये मी ‘महानायक’ या महामालिकेची निर्मिती करीत असताना मराठी रंगभूमीवर अनेक मोठे अभिनेते आणि अभिनेत्री अभिवाचन करण्यासाठी मुंबई केंद्राच्या स्टुडिओत येत होते.नाटक -सिनेमावाल्यांच्या दुनियेत या ‘महानायक’ मालिकेबद्दल चांगली चर्चा होत होती. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत होती. एकेदिवशी मतकरीसर माझ्यासमोर खुर्चीत येऊन बसले आणि त्यांनी थेट प्रश्न केला, ‘केळुसकर, ‘महानायक’साठी एवढे सगळेजण वाचायला येत असताना तुम्हाला मला फोन करावासा वाटला नाही?’ मी तर एकदम गांगरूनच गेलो. चाचपडत म्हटलं, ‘सर, पण एक मोठा लेखक दुसºया ज्युनिअर मोठ्या लेखकाची कादंबरी वाचण्यासाठी रेडिओवर येईल असं डोक्यात नाही आलं.’ तेव्हा मतकरी सर हसून म्हणाले, ‘मी मोठा अभिवाचकही आहे केळुसकर. बघाच तुम्ही एकदा मी कसं वाचतो ते.’ आम्ही त्यांना निवडक पानं दिली. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी मतकरी सर आले आणि ५ भाग म्हणजे २०-२२ छापील पृष्ठे त्यांनी एका दमात वाचून ‘वांचिक अभिनय’ म्हणजे काय सीरिअस प्रकार असतो, याचा वस्तुपाठ घालून दिला.आणीबाणी असो की एन्रॉन प्रकरण, मतकरींनी स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका घेतली. व्यवस्थेच्या विरोधी भूमिका घेताना आपले लेखक म्हणून हितसंबंध बिघडतील की काय, अशी भीती कधीच बाळगली नाही. कणा ताठ ठेवला. साहित्य संस्थांमधील राजकारणाची पत्रास न बाळगता तथाकथित चमकदार दुटप्पी लोकांना तोंडावर सुनावणारा लेखक म्हणून मतकरी प्रसिद्ध होते. २०१८ मध्ये बालसाहित्यातील योगदानाबद्दल ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार त्यांना मिळाला. त्याबद्दल आनंद व्यक्तकरून, अकादमीच्या गलथानपणाबद्दल आणि अंतर्गत राजकारणाकडे निर्देश करताना मतकरी म्हणाले होते, ‘तरी पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या लेखनाला आज बालसाहित्य पुरस्कार मिळणं म्हणजे गंमतच आहे. तेव्हा यासाठी पुरस्कार देणाºया यंत्रणा आणि त्यावरील परीक्षक समितीने कायम सजग राहायला हवं. त्या - त्या काळातीलनेमकी माणसं हुडकून काढता यायला हवीत.’ पुरस्कारांच्या पलीकडचा लेखकच असं बोलूशकतो. सलाम!