शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अडून बसलेले ‘टेकआॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:45 IST

पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रामध्ये जी काही प्रगती झालेली आहे ती निश्चितच उल्लेखनीय अशा स्तरावरची आहे. एका बाजूला हिंजवडी, चंदननगर, खराडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आटी पार्क साकारली.

पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रामध्ये जी काही प्रगती झालेली आहे ती निश्चितच उल्लेखनीय अशा स्तरावरची आहे. एका बाजूला हिंजवडी, चंदननगर, खराडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आटी पार्क साकारली. केपीओ-बीपीओ कंपन्यांनी जाळे विस्तारले. त्याच्या जोडीला उद्यमनगरी म्हणून पिंपरी चिंचवड परिसरात जे उद्योग एकवटलेले होते. त्यांचाही एमआयडीच्या रुपाने चाकण, राजगुरूनगर, शिरुर या ठिकाणी विस्तार झाला. जगभरात अत्यंत नावाजलेल्या अशा जीई, जीएम, मर्सिडीज, वोक्सवॅगन या सारख्या कंपन्यांनी आपले बस्तान बसवले. आता या विस्तार-विकासाची घोडदौड सुरू असताना शासनानेही त्यांचा ‘लालफितीचा कारभार’ जरा आवरून अशा कंपन्यांसाठी ‘लाल पायघड्या’ अंथरल्या. मात्र या सर्व परिस्थितीत अडथळा होता आणि आहे तो एकच. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचा. लोहगाव येथील विमानतळ हे वायूदलाच्या अखत्यारित असलेल्या जागेत असल्याने तेथील विस्ताराला मुळातच मर्यादा होत्या. त्यामुळे तातडीने पावले उचलून एक नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारणे ही काळाची गरज होती. पण ‘भिजत घोंगडे’ ही उपमाही फिकी पडावी इतका काळ केवळ जागा निश्चित करण्यासाठी घालवला गेला. तब्बल १२ वर्षे हा प्रस्ताव अजूनही कागदावरच आहे. सुरुवातीला खेड तालुक्यात प्रकल्प उभारण्याच्या घोषणा झाल्या. त्यानंतर तिथल्याच जागा आलटून पालटून बदलत राहिल्या. तेही थोडे म्हणून मग प्रस्तावित विमानतळाच्या विरोधात शेतकºयांचे आंदोलन उभे राहिले. खासदार-आमदारांच्या भूमिका सोयीस्कर बदलत राहिल्या. सत्तांतरानंतर नव्याने धुरा सांभाळलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल सांगत नवीनच गुगली टाकली. सगळ््यांचे लक्ष खेडकडून पुरंदरकडे वळले. तिकडे जागांचा शोध, पाहणी सुरू झाली आणि आता पुन्हा एकदा तांत्रिक कारण उपस्थित करून जागा पुन्हा बदलली जाऊ शकते असे पिल्लू जिल्हाधिकाºयांनी सोडले. यामागचे राजकारण आणि राजकारण्यांचे आडाखे काही असोत पण शहर व जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टेक आॅफ गरजेचे आहे. त्यासाठी योग्य वेळेत तत्पर व नियोजनबद्ध पावले उचलायला हवीत. उड्डाणाच्या पोकळ वल्गना ठरू नयेत, तर विकासाचा रनवे सुकर व्हावा हीच अपेक्षा आहे.