शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

अडून बसलेले ‘टेकआॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:45 IST

पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रामध्ये जी काही प्रगती झालेली आहे ती निश्चितच उल्लेखनीय अशा स्तरावरची आहे. एका बाजूला हिंजवडी, चंदननगर, खराडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आटी पार्क साकारली.

पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रामध्ये जी काही प्रगती झालेली आहे ती निश्चितच उल्लेखनीय अशा स्तरावरची आहे. एका बाजूला हिंजवडी, चंदननगर, खराडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आटी पार्क साकारली. केपीओ-बीपीओ कंपन्यांनी जाळे विस्तारले. त्याच्या जोडीला उद्यमनगरी म्हणून पिंपरी चिंचवड परिसरात जे उद्योग एकवटलेले होते. त्यांचाही एमआयडीच्या रुपाने चाकण, राजगुरूनगर, शिरुर या ठिकाणी विस्तार झाला. जगभरात अत्यंत नावाजलेल्या अशा जीई, जीएम, मर्सिडीज, वोक्सवॅगन या सारख्या कंपन्यांनी आपले बस्तान बसवले. आता या विस्तार-विकासाची घोडदौड सुरू असताना शासनानेही त्यांचा ‘लालफितीचा कारभार’ जरा आवरून अशा कंपन्यांसाठी ‘लाल पायघड्या’ अंथरल्या. मात्र या सर्व परिस्थितीत अडथळा होता आणि आहे तो एकच. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचा. लोहगाव येथील विमानतळ हे वायूदलाच्या अखत्यारित असलेल्या जागेत असल्याने तेथील विस्ताराला मुळातच मर्यादा होत्या. त्यामुळे तातडीने पावले उचलून एक नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारणे ही काळाची गरज होती. पण ‘भिजत घोंगडे’ ही उपमाही फिकी पडावी इतका काळ केवळ जागा निश्चित करण्यासाठी घालवला गेला. तब्बल १२ वर्षे हा प्रस्ताव अजूनही कागदावरच आहे. सुरुवातीला खेड तालुक्यात प्रकल्प उभारण्याच्या घोषणा झाल्या. त्यानंतर तिथल्याच जागा आलटून पालटून बदलत राहिल्या. तेही थोडे म्हणून मग प्रस्तावित विमानतळाच्या विरोधात शेतकºयांचे आंदोलन उभे राहिले. खासदार-आमदारांच्या भूमिका सोयीस्कर बदलत राहिल्या. सत्तांतरानंतर नव्याने धुरा सांभाळलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल सांगत नवीनच गुगली टाकली. सगळ््यांचे लक्ष खेडकडून पुरंदरकडे वळले. तिकडे जागांचा शोध, पाहणी सुरू झाली आणि आता पुन्हा एकदा तांत्रिक कारण उपस्थित करून जागा पुन्हा बदलली जाऊ शकते असे पिल्लू जिल्हाधिकाºयांनी सोडले. यामागचे राजकारण आणि राजकारण्यांचे आडाखे काही असोत पण शहर व जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टेक आॅफ गरजेचे आहे. त्यासाठी योग्य वेळेत तत्पर व नियोजनबद्ध पावले उचलायला हवीत. उड्डाणाच्या पोकळ वल्गना ठरू नयेत, तर विकासाचा रनवे सुकर व्हावा हीच अपेक्षा आहे.