शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

अडून बसलेले ‘टेकआॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:45 IST

पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रामध्ये जी काही प्रगती झालेली आहे ती निश्चितच उल्लेखनीय अशा स्तरावरची आहे. एका बाजूला हिंजवडी, चंदननगर, खराडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आटी पार्क साकारली.

पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रामध्ये जी काही प्रगती झालेली आहे ती निश्चितच उल्लेखनीय अशा स्तरावरची आहे. एका बाजूला हिंजवडी, चंदननगर, खराडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आटी पार्क साकारली. केपीओ-बीपीओ कंपन्यांनी जाळे विस्तारले. त्याच्या जोडीला उद्यमनगरी म्हणून पिंपरी चिंचवड परिसरात जे उद्योग एकवटलेले होते. त्यांचाही एमआयडीच्या रुपाने चाकण, राजगुरूनगर, शिरुर या ठिकाणी विस्तार झाला. जगभरात अत्यंत नावाजलेल्या अशा जीई, जीएम, मर्सिडीज, वोक्सवॅगन या सारख्या कंपन्यांनी आपले बस्तान बसवले. आता या विस्तार-विकासाची घोडदौड सुरू असताना शासनानेही त्यांचा ‘लालफितीचा कारभार’ जरा आवरून अशा कंपन्यांसाठी ‘लाल पायघड्या’ अंथरल्या. मात्र या सर्व परिस्थितीत अडथळा होता आणि आहे तो एकच. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचा. लोहगाव येथील विमानतळ हे वायूदलाच्या अखत्यारित असलेल्या जागेत असल्याने तेथील विस्ताराला मुळातच मर्यादा होत्या. त्यामुळे तातडीने पावले उचलून एक नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारणे ही काळाची गरज होती. पण ‘भिजत घोंगडे’ ही उपमाही फिकी पडावी इतका काळ केवळ जागा निश्चित करण्यासाठी घालवला गेला. तब्बल १२ वर्षे हा प्रस्ताव अजूनही कागदावरच आहे. सुरुवातीला खेड तालुक्यात प्रकल्प उभारण्याच्या घोषणा झाल्या. त्यानंतर तिथल्याच जागा आलटून पालटून बदलत राहिल्या. तेही थोडे म्हणून मग प्रस्तावित विमानतळाच्या विरोधात शेतकºयांचे आंदोलन उभे राहिले. खासदार-आमदारांच्या भूमिका सोयीस्कर बदलत राहिल्या. सत्तांतरानंतर नव्याने धुरा सांभाळलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल सांगत नवीनच गुगली टाकली. सगळ््यांचे लक्ष खेडकडून पुरंदरकडे वळले. तिकडे जागांचा शोध, पाहणी सुरू झाली आणि आता पुन्हा एकदा तांत्रिक कारण उपस्थित करून जागा पुन्हा बदलली जाऊ शकते असे पिल्लू जिल्हाधिकाºयांनी सोडले. यामागचे राजकारण आणि राजकारण्यांचे आडाखे काही असोत पण शहर व जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टेक आॅफ गरजेचे आहे. त्यासाठी योग्य वेळेत तत्पर व नियोजनबद्ध पावले उचलायला हवीत. उड्डाणाच्या पोकळ वल्गना ठरू नयेत, तर विकासाचा रनवे सुकर व्हावा हीच अपेक्षा आहे.