शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

मोबाईल घे, अभ्यास कर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 13:03 IST

मिलिंद कुलकर्णी कोरोना काळातील सहा महिन्यात शिक्षणाविषयी जेवढे घोळ घातले गेले, तेवढे आरोग्याच्या क्षेत्रातदेखील घातले गेलेले नाहीत. उच्च शिक्षणाविषयी ...

मिलिंद कुलकर्णी

कोरोना काळातील सहा महिन्यात शिक्षणाविषयी जेवढे घोळ घातले गेले, तेवढे आरोग्याच्या क्षेत्रातदेखील घातले गेलेले नाहीत. उच्च शिक्षणाविषयी सरकार जेवढे संवेदनशील होते, तेवढे शालेय शिक्षणाविषयी नव्हते. त्यामुळे महाराष्टÑातील सुमारे सव्वा दोन कोटी विद्यार्थ्यांच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षाविषयी अनिश्चितता कायम आहे.मार्च महिन्यात कोरोनाच्या उद्रेकानंतर लॉकडाऊन जाहीर झाले. परीक्षा रद्द झाल्या. उन्हाळी सुटया लागल्याने निश्चिंतता होती. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर आॅनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय झाला. या शिक्षणातून पारंपरिक वाद ‘इंडिया’ आणि ‘भारत’ पुन्हा ठळकपणे दिसून आला. नामांकित, प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आॅनलाईन शिक्षण देण्यासाठी आपल्या शिक्षकांना व्यवस्थित प्रशिक्षण दिले. संगणक, वेगवेगळे अ‍ॅप उपलब्ध करुन दिले. त्यातून शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना शिकवू लागले. जिल्हा परिषद, पालिका आणि खाजगी मराठी शाळांमध्ये मात्र वेगळे चित्र होते. या शाळांमधील शिक्षकांना राज्य सरकारने कोरोना काळातील वेगवेगळी कामे सोपविली होती. रेशन दुकानांची तपासणी, घरोघर जाऊन सर्वेक्षण, रस्त्यांवरील तपासणी नाक्यांवर पर्यवेक्षण अशी कामे देण्यात आली. काही शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले. नंतर सरकारने ही कामे काढून घेतली. विलगीकरण कक्ष हटविले. पण शाळांमध्ये वीजपुरवठा, संगणक, नेटवर्क असे अनेक प्रश्न कायम राहिले.दिवाळीपर्यंत आॅनलाईन शिक्षण सुरु ठेवावे, अशा सूचना राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने आता दिल्या आहेत. अभ्यासक्रम, परीक्षा यासंदर्भात आग्रही भूमिका न घेता शालेय शिक्षण विभागाने उदार भूमिका घेतली आहे. या काळात वयोगटानुसाार वेगवेगळे उपक्रम राबविणे, अभ्यासक्रमांची ओळख कायम ठेवणे यासाठी शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. पालकांनीही मुले घरी असल्याने त्यांच्या शिक्षणात हातभार लावावा, अशा सूचना दिल्या आहेत. कोरोना महासाथीच्या काळात सरकार म्हणून यापेक्षा अधिक काही करु शकत नाही, हे वास्तव लक्षात आले.तब्बल सव्वा दोन कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकतीच इयत्तानिहाय आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यात पहिली ते चौथी : ७९ लाख ३८ हजार ५९१, पाचवी ते सातवी : ५८ लाख ८३ हजार ५२५, आठवी ते दहावी : ५६ लाख ४९ हजार १४४, अकरावी - बारावी : २८ लाख ८४ हजार ७११ अशी विभागणी आहे.कोरोनाचे संक्रमण पहाता शालेय गटातील विद्यार्थी घरी राहण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र आॅनलाईन शिक्षणासंबंधी अडचणीदेखील समोर येत आहे. एक विनोद याच काळात मोठयाप्रमाणात प्रसारीत झाला. गेल्या वर्षीपर्यंत मुलांच्या हाती मोबाईल दिसला की, मोबाईल दूर ठेव, अभ्यास कर, असे पालक म्हणत असत. आता मोबाईल घे, अभ्यास कर असा धोशा पालक लावत असतात. काळाचा महिमा म्हणतात, तो हाच. अडचण अशी आहे की, सतत मोबाईलच्या स्क्रीनकडे बघण्याने, वाचन करण्याने डोळ्यांच्या समस्या उद्भवत आहेत. शिक्षकांची अडचण अशी की, हे शिक्षण एकतर्फी दिले जात आहे. आपण शिकविलेले विद्यार्थ्यांना कळले किंवा नाही, हे समजत नाही.लॉकडाऊन काळात अनेकांचे रोजगार गेले. पगारकपात झाली. त्यामुळे  दैनंदिन आयुष्यावर मोठा परिणाम झाला. अँड्रॉईड मोबाईल घेण्याची ऐपत नसलेल्या पालकांपुढे पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. मुले घरी असली, तरी शाळांचे शैक्षणिक शुल्क भरायला पालक अनुत्सुक दिसले. काही ठिकाणी सवलतीची मागणी झाली. पण संस्थाचालक व शिक्षकांचे म्हणणे असे की, शिक्षक शाळेत येऊन विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिकवत आहे. अभ्यास घेत आहेत. त्यांचा पगार, वीज, इंटरनेट यांचा खर्च येतोच. पालकांना तर बस, रिक्षाचा खर्च कमी झाला आणि मोबाईल बिलाचा वाढला. परस्पर सामंजस्याने मार्ग काढायला हवा.‘इंडिया’मधील ही स्थिती आहे तर ‘भारता’तील आश्रमशाळा, वसतिगृहे, अंगणवाडी या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होतोय. शिक्षण नाही आणि हक्काचे माध्यान्ह भोजनदेखील मिळत नाही. सरकार दरबारी घरपोच पुरवठयाच्या नोंदी असतील देखील, पण त्यांच्या पोटात ते गेलेले नाही. त्यांच्या शिक्षणाविषयी चकार शब्द कुणी बोलायला तयार नाही, ही विषमता नाही का? 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव