शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

Lal Bahadur Shastri Jayanti: 'लाल बहादूर शास्त्रींचा आदर्श जीवनात उतरवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 09:45 IST

महान आणि उत्तुंग कामगिरी केलेल्या नेत्यांचे स्मरण त्यांच्या जयंती दिनी करून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.

- एम. व्यंकय्या नायडूमहान आणि उत्तुंग कामगिरी केलेल्या नेत्यांचे स्मरण त्यांच्या जयंती दिनी करून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. अनेकदा असे कार्यक्रम परंपरा म्हणून यांत्रिकपणे पार पडतात, पण केवळ श्रद्धांजली अर्पण करून न थांबता, त्यांनी देशाच्या भल्यासाठी केलेल्या कामाची ओळख तरुण पिढीला करून देणेही गरजेचे असते. अशाच व्यक्तींपैकी एक आहेत, लाल बहादूर शास्त्री. आपण महात्मा गांधींच्या जयंती दिनी २ आॅक्टोबरला त्यांचेही स्मरण करीत असतो.ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अनेकांनी जशी प्रेरणा घेतली, तशी प्रेरणा घेत लाल बहादूर शास्त्री यांनीही स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून दिले. त्यांच्यात जो निर्धार होता, देशाप्रती जी भावना होती त्यासह त्यांच्यात प्रामाणिकपणाही होता. साधेपणा आणि मूल्याधारित राजकारणाचे ते प्रतीक होते. ६० वर्षांपूर्वी शास्त्रीजींनी देशाविषयी बांधिलकी काय असते हे दाखवून दिले. तामिळनाडू राज्यात अदियालूर येथे झालेल्या रेल्वे अपघातात १४० जणांचे प्राण गेल्याची रेल्वेमंत्री या नात्याने जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. घटनात्मक गरजेचे उदाहरण दाखवून देण्यासाठी आपण तो राजीनामा स्वीकारत आहोत, असे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्या वेळी म्हणाले होते. वास्तविक, त्या अपघाताला शास्त्रीजी अजिबात जबाबदार नव्हते.आपल्या साधेपणाने आणि मानवतावादी दृष्टिकोनाने त्यांनी लोकांची मने जिंकून घेतली होती. त्यांच्या जीवनातील दोन घटनातून ते कसे तत्त्वनिष्ठ होते याचे प्रत्यंतर येते. त्यांची दृष्टी विशाल होती, म्हणून त्यांनी ते सातवीत असताना आपले जात सुचविणारे आडनाव टाकून दिले होते. आपल्या विवाहात त्यांनी हुंडा म्हणून वधूपक्षाकडून काही वार खादीचा कपडा आणि चरखा मागितला होता!देशाचे पंतप्रधान झाल्यावर १५ आॅगस्ट १९६४ ला लाल किल्ल्यावरून भाषण देताना त्यांनी देशाच्या ऐक्याविषयी जे विचार मांडले होते, ते आजही सुसंगत वाटतात. शास्त्रीजी म्हणाले होते, ‘सारे जग आपल्याकडे आदराने तेव्हा बघेल, जर आपण अंतर्गत मजबूत असू व देशातून दारिद्र्य आणि बेरोजगारीचा नायनाट करू शकू. जातीयवादी, प्रादेशिक आणि भाषिक वादाने देश दुबळा होऊ शकतो. त्यामुळे आपण राष्ट्रीय ऐक्य अबाधित ठेवायला हवे. सामाजिक क्रांतीतूनच हे राष्ट्र मजबूत होईल.’ त्यांचा भर चारित्र्य निर्मितीवर आणि नैतिकतेवर होता. आज सर्वत्र मूल्याची घसरण होत असताना त्यांच्या विचारांची देशाला खरी गरज आहे.१९६५ साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या वेळी त्यांनी दिलेली ‘जय जवान, जय किसान’ ही अजरामर घोषणा आजही देशवासीयांना प्रेरणा देते. काही वर्षांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्या घोषणेत ‘जय विज्ञान’ हा नाराही समाविष्ट केला. शांततेच्या धोरणाशी त्यांची बांधिलकी होती, पण देशाच्या एकात्मतेबाबत ते कठोर होते. पाकिस्तानच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी सैन्याला सज्ज केले. गुरुद्वारा बांगला साहिब, दिल्ली येथे३ आॅक्टोबर, १९६५ ला भाषण देताना ते म्हणाले, ‘कोणतेही आक्रमण देशवासी माफ करणार नाहीत. त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ.’ त्यांची पंतप्रधानपदाची कारकिर्द त्यांच्या अकाली मृत्यूने खंडित झाली खरी, पण त्यांच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानवर विजय संपादन केला होता. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ८३ व्या पुण्यतिथीनिमित्त २४ आॅक्टोबर १९६५ रोजी दिल्लीत दिलेल्या भाषणातते म्हणाले होते, ‘आपण विश्रांती घेऊन भागणार नाही. आपल्या देशाचे भविष्य काय राहील हे आज सांगता येणार नाही. पाकिस्तानने आपल्याविरुद्ध आक्रमणाचे धोरण सोडलेले नाही. अशा स्थितीत आपली सुरक्षा व्यवस्था आपण मजबूत करायला हवी.’ त्यांचा कृतीवर विश्वास होता हे दर्शविणारी एक घटना सांगतो, देशात अन्नधान्याचा तुटवडा असताना त्यांनी स्वत: एक वेळच्या भोजनाचा त्याग करून आदर्श घालून दिला होता. त्याचा परिणाम साऱ्या देशभर दिसून आला. उत्तर प्रदेशात पोलीस विभागाचे मंत्री असताना त्यांनी पोलिसांना काठ्यांऐवजी पाण्याचा मारा करण्यास सांगितले होते.‘आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत आपण शिक्षक, अभियंते आणि अन्यांचा समावेश करून विचारात ताजेपणा आणायला हवा,’ असे मत त्यांनी १९६४ साली ग्रामीण प्रकल्पाच्या बैठकीत मांडले होते. सध्याच्या सरकारने १० संयुक्त सचिव बाहेरून भरती करण्याचे जे ठरवले आहे ते याच सूत्रानुकूल आहे. तेव्हा प्रत्येक भारतीयाने त्यांचा साधेपणा, मानवता, कष्ट व समर्पण भाव शिकला पाहिजे. त्यांच्या आदर्शानुसार चालणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. त्यांच्यासह पं. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचेही आपण स्मरण ठेवायला हवे.(उपराष्ट्रपती)

टॅग्स :Lal Bahadur Shastriलाल बहादूर शास्त्री