शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ताईचा सल्ला!

By admin | Updated: October 7, 2016 02:35 IST

भारतीय कुटुंब व्यवस्थेतील ताई या नात्याचे (की पात्राचे?) अनन्यसाधारण महत्व कोण कसे नाकारु शकेल बरे? तरीही जे नाकारु इच्छितात त्यांनी बाळ कोल्हटकरांच्या ‘वाहतो

भारतीय कुटुंब व्यवस्थेतील ताई या नात्याचे (की पात्राचे?) अनन्यसाधारण महत्व कोण कसे नाकारु शकेल बरे? तरीही जे नाकारु इच्छितात त्यांनी बाळ कोल्हटकरांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’मधील प्रत्येक दुर्वेइतकी त्या नाटकाची वाचिक आणि देखिक पारायणे करावीत हे त्यांच्याच भल्याचे. माय मरो आणि मावशी जगो अशी म्हण उगाचच रुढ झालेली. प्रत्यक्षात आई मरो आणि ताई जगो अशीच म्हण आकाराला यावयास हवी होती. अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही. हे नाते मुळातच आत्यंतिक सोज्वळ आणि त्यामुळेच अनेक दैनिके, साप्ताहिके आणि मासिके यात प्रसिद्ध होणाऱ्या विशिष्ट सदरांतर्गत कौटुंबिक अडीअडचणी मांडून जो सल्ला किंवा मार्गदर्शन मागितले जाते, त्या सदराचे नावदेखील प्राय: ताईचा सल्ला असेच असते. इतके या नात्याचे महात्म्य आणि थोरवी. परिणामी कोणत्याही सद्गृहस्थाला ताई असणे यापरते अन्य भाग्य असू शकत नाही. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस इतके भाग्यवान आहेत वा नाहीत, हे आम्हास ज्ञात नाही. त्यांना ताई असेलच तर ते तिचा सल्ला मागतात वा नाही हे ठाऊक नाही. त्यांनी सल्ला मागितला आणि मग ताईने तो दिला किंवा नाही याचेही आम्हास ज्ञान नाही. कदाचित त्यांना ताई असेल, तिचा सल्ला ते मागत असतील, तीदेखील त्यांना तो देत असेल पण हे सारे होतच असेल तर ते चार भिंतींच्या आतमध्ये. मुख्यमंत्री खरा जनसेवक. त्याचे सारे बोलणे, वागणे, चालणे पूर्ण पारदर्शक असले पाहिजे व ते साऱ्या जगाला समजलेही पाहिजे अशी लोकशाहीचीच अपेक्षा. गेल्या दीडेक वर्षात ती काही पुरी झाली नाही. पण आता ती उणीव दूर झाली आहे. त्यांच्या एकतर्फी मुँहबोल्या ताईने त्यांना गुपचूप नव्हे तर जाहीर सल्ला देऊन टाकला आहे, ‘फार चिडचीड होत असेल तर सोडून द्या ती सत्ता’! कोणत्याही व्यक्तीविषयी आणि त्याहून महत्वाचे म्हणजे तिच्या प्रकृतीविषयी इतकी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि काळजी ताईखेरीज करुन दुसरे कोणी व्यक्तवू शकेल का बरे? त्यामुळे दिवाळी जवळच आली आहे. तेव्हां देवेन्द्रभाऊ यांनी भाऊबीजेच्या दिवशी आपल्या या ताईला, सुप्रियाताई सुळे यांना घसघशीत ओवाळणी घालणे हे त्यांचे भाऊकर्तव्यच ठरते. एकदा ते केले की मग या ताईचा सल्ला मानायचा वा नाही हे ठरवायला ते मोकळे! पण तरीही ताईने हा सल्ला का आणि कशापायी दिला हे त्यांनी उत्सुकतेपोटी का होईना जाणून घ्यायला काहीच हरकत नाही. सुप्रियाताईंचा हा लाडका भाऊ अंमळ अधिकच बोलतो हे सारेच जाणतात. रामाची सीता कोण होती या साध्या, सोप्या आणि वस्तुनिष्ठ प्रश्नाचे एक वाक्यातील किंवा खरे तर एका शब्दातील उत्तर देण्याऐवजी तो थेट इक्ष्वाकू वंशापासून सुरुवात करतो, हे सत्य सारेच जाणतात. पण सुप्रियाताईंचा हा भाऊ चिडचीड करतो, हे सत्य मात्र फारच थोडे लोक जाणतात. कारण व्यवहारात तसे काही दिसत नाही. उलट महाराष्ट्राचा हा प्रथम पुरुष सपत्नीक आपल्याला लाभलेले पद भजतो आहे असेच सर्वसामान्य लोक गृहीत धरुन चालतात. सर्वसामान्य लोक आणि सुप्रियाताई यांच्यात हाच तर फरक आहे. राजकारणात वावरणाऱ्या लोकाना नेहमीच एक मुखवटादेखील सोबत घेऊन वावरावे लागते (ती वाजपेयी-अडवाणी यांची मक्तेदारी नव्हे!) याची चांगलीच जाण सुप्रियाताईंना असणार, नव्हे ती असलीच पाहिजे. कोण कुठले वसंतदादा आणि कोण कुठले नाशिकराव तिरपुडे मुख्य आणि उपमुख्य होतात म्हणजे काय, त्यावरुन झालेली चिडचीड त्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी घरातच पाहिली आहे. इंदिरा गांधी यांनी हळूच बाबा किंवा पप्पा (जे काही असेल ते) यांच्या पायाखालचे सत्तेचे जाजम हिसकावून घेतल्यानंतर, नरसिंहराव नावाच्या अर्धसिंहाने पंतप्रधानपदाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यानंतर, त्यांनीच दिल्लीत आव्हान नको म्हणून मुंबईत धाडून दिल्यानंतर, राजीव गांधी यांनी जवळपास फिरकू न दिल्यानंतर अशा अनेक प्रसंगात झालेली घरातली चिडचीड आणि तिचे दुष्परिणाम ताईंनी स्वत: पाहिले व अनुभवलेही आहेत. पण त्या काळातील या चिमुरडीला कोण विचारणार आणि कोण सल्ला मागणार? पण चिडचीड म्हणजे काय हे ताईला चांगलेच ठाऊक असल्याने तिने सद्हेतून देवेन्द्र भाऊना आपुलकीचा सल्ला दिला आहे. तो या भावाने मानला तर एकाचवेळी नितीनभाऊ, विनोदभाऊ, नाथाभाऊ अशा अनेक भावांनाही आनंदच होणार आहे. पण सारे काही त्या नरेन्द्रभाऊंच्या हाती एकवटलेले. अर्थात ताई त्यांच्या पप्पांमार्फत आपल्या मनातली कळकळ तिथपर्यंतही पोहोचवू शकतात. पण त्यात कदाचित कालहरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात देवेन्द्रभाऊ यांनी कोपर्डीतल्या बलात्कारी संशयितांविरुद्ध खटले दाखल केले नाहीत तर त्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा इशाराही ताईनी दिला आहे. त्यात हेतू त्रास देण्याचा नसून बाहेर पडल्यावर उगा डेग्यू बिंग्यू व्हायला नको हाच हेतू आहे!