शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

..तर ‘स्वाभिमानी’ला विदर्भात ‘अच्छे दिन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:36 IST

विदर्भातील शेतकरी नेतृत्वविहीन झाले आहेत. दुष्काळी स्थिती, नापिकी, कर्जमाफीचा बोजवारा, वाढत्या आत्महत्या असे अनेक मुद्दे आहेत; पण ते हाती घ्यायला नेताच नाही! उत्तम बांधणी केल्यास ‘स्वाभिमानी’ विदर्भात प्रभाव निर्माण करू शकते.

विदर्भातील शेतकरी नेतृत्वविहीन झाले आहेत. दुष्काळी स्थिती, नापिकी, कर्जमाफीचा बोजवारा, वाढत्या आत्महत्या असे अनेक मुद्दे आहेत; पण ते हाती घ्यायला नेताच नाही! उत्तम बांधणी केल्यास ‘स्वाभिमानी’ विदर्भात प्रभाव निर्माण करू शकते.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भारतीय जनता पक्षासोबतचा बहुप्रतीक्षित काडीमोड अखेर झालाच! ‘स्वाभिमानी’चे सर्वेसर्वा असलेल्या खासदार राजू शेट्टींनी केंद्रीय मंत्री पदाचा प्रस्ताव नाकारून, विरोधकाची भूमिका बजावण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो खरोखरच धाडसी म्हणायला हवा. आपापल्या राज्यात मजबूत असलेले जनता दल (युनायटेड) आणि अण्णाद्रमुकसारखे पक्षही भाजपाच्या वळचणीला गेले असताना राजू शेट्टींनी हा निर्णय घेतला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.राजू शेट्टींचा हा निर्णय जुगारासारखा आहे. तो त्यांच्या अंगलटही येऊ शकतो किंवा प्रचंड लाभदायीही ठरू शकतो. भाजपाचे चवताळलेले नेतृत्व आता राजू शेट्टींना लगाम लावण्यासाठी सदाभाऊ खोत यांना ताकद देणार हे उघड आहे. त्यामुळे राजू शेट्टींसाठी पुढील प्रवास सोपा नाही; पण त्यांनी त्यांच्या पुढील खेळी काळजीपूर्वक केल्यास, ‘स्वाभिमानी’साठी भविष्यकाळ उज्ज्वल असू शकतो, हेदेखील निश्चित!विदर्भापुरते बोलायचे झाल्यास, ‘स्वाभिमानी’चे विदर्भातील सर्वात मोठे नेते असलेल्या रविकांत तुपकर यांनी शेट्टी व खोत यांच्या लढाईत शेट्टींचा पक्ष घेतला आहे. त्यासाठी राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्ष पदावर त्यांनी पाणी सोडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुपकरांना २०१९ मधील निवडणुकीच्या वेळी योग्य तो विचार करण्याचे आश्वासन दिले होते, अशी माहिती आहे; मात्र कोणत्याही आमिषास बळी न पडता राजू शेट्टींना साथ देण्याचा निर्णय तुपकरांनी घेतला.राजू शेट्टींचा निर्णय जसा धाडसी आहे, तसाच त्यांना साथ देण्याचा तुपकरांचा निर्णयही धाडसीच म्हणावा लागेल. वास्तविक तुपकरांचे शेट्टी अन् खोत या दोघांसोबतही मधूर संबंध होते. खोत यांचा पदर धरला असता, तर सत्तासुख उपभोगता आले असते; पण शेट्टींच्या सोबतीने विरोधाचे राजकारण करण्याचा निर्णय घेऊन, आपली नजर भविष्यावर असल्याचे तुपकरांनी दाखवून दिले आहे.विदर्भात सध्या विरोधकच शिल्लक नाहीत, अशी परिस्थिती आहे. कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या विदर्भात काँग्रेसला नेतृत्वाची पोकळी जाणवत आहे. सक्षम नेतृत्व नसल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांच्या काही बिनीच्या शिलेदारांच्या प्रभावाखालील भाग वगळता, विदर्भात पाय रोवताच आले नाहीत. आता तर बरेचसे शिलेदारच साहेबांची साथ सोडून ‘नमस्ते सदा वत्सले’ करू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससारखीच शिवसेनेचीही स्थिती आहे. स्थानिक नेत्यांमुळे काही मतदारसंघांपुरता तेवढा प्रभाव टिकून आहे.या परिस्थितीमुळे विदर्भात विरोधकांची मोठीच पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचा प्रदेश अशी ओळख निर्माण झालेल्या विदर्भात, योग्य पावले उचलल्यास ‘स्वाभिमानी’ला चांगली संधी आहे. कधीकाळी स्व. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेने विदर्भात भक्कम स्थान निर्माण केले होते. त्या चळवळीतून विदर्भात बरेच शेतकरी नेते उदयास आले. त्यापैकी काहींनी पुढे राजकारणातही प्रभाव निर्माण केला. आज ते नेते मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेल्या आहेत किंवा उतरणीला लागले आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकरी नेतृत्वविहीन झाला आहे. दुष्काळी परिस्थिती, नापिकी, आॅनलाईन कर्जमाफीचा बोजवारा, आत्महत्यांचे वाढते प्रमाण असे अनेक मुद्दे आहेत; पण ते हाती घ्यायला नेताच नाही, अशी स्थिती आहे.या पार्श्वभूमीवर, अभ्यासू युवा शेतकरी कार्यकर्ते हेरून त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली आणि उत्तम संघटना बांधणी केली, तर ‘स्वाभिमानी’ विदर्भात प्रभाव निर्माण करू शकते. अर्थात, त्यासाठी राजू शेट्टींना विदर्भात भरपूर वेळ द्यावा लागेल. विदर्भातील शेतकºयांचे प्रश्न हाती घ्यावे लागतील. रविकांत तुपकरांना झपाटल्यागत काम करावे लागेल. उभय नेत्यांनी ती तयारी ठेवल्यास, विदर्भातील शेतकºयांना नेतृत्व आणि ‘स्वाभिमानी’ला विदर्भात ‘अच्छे दिन’ लाभू शकतात.- रवी टाले

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी