शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

सुशीलकुमार शिंदे ही निव्वळ व्यक्ती नव्हे, तर समाजाची संपत्ती !

By राजा माने | Updated: September 4, 2017 11:21 IST

काही काही माणसं आपल्याला मनापासून का आवडतात,या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही ! त्या माणसाला आपण आवडत असू का ? अशा तकलादू प्रश्नांच्याही फंदात मन पडत नाही. पण त्या माणसाच्या सदैव प्रेमात राहावे असेच मन म्हणत राहते. अशी व्यक्ती म्हणजे सुशीलकुमारजी !

काही काही माणसं आपल्याला मनापासून का आवडतात,या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही ! त्या माणसाला आपण आवडत असू का ? अशा तकलादू प्रश्नांच्याही फंदात मन पडत नाही. पण त्या माणसाच्या सदैव प्रेमात राहावे असेच मन म्हणत राहते. अशी व्यक्ती म्हणजे सुशीलकुमारजी ! मी शाळकरी असताना आमच्या बार्शीच्या जवाहर हॉस्पिटलच्या प्रांगणात कुठला तरी कार्यक्रम होता. तो कार्यक्रम मी हॉस्पिटल परिसरातल्या एका झाडाच्या बुंध्यावर बसून बघितला होता. त्या कार्यक्रमात काहीशा तलवार कटच्या पीळदार मिशा अन् कपाळावर काही जुल्फे असलेल्या हसमुख, रुबाबदार राज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जीवनात पहिल्यांदा पाहिले. त्यावेळी आपल्या जीवनात कधी तरी या माणसाशी फक्त भेटच होणार नाही तर आपली चांगली नाळही जुळणार आहे,असं कधी स्वप्नातही नव्हतं. पण माझं भाग्य बघा तसंच घडलं ! या माणसाला मी मंत्री म्हणून पाहिलं, मुखमंत्री म्हणून पाहिलं, राष्ट्रीय नेता म्हणून पाहिलं, कलाकारांच्या सहवासात रमणारा आणि काव्य मैफिली सजवणारा साहित्यप्रेमी म्हणून पाहिलं,गरिबीतल्या दोस्तांच्या कुटुंबात रमून जाताना पाहिलं, " हन्सो का जोडा " मुख्यमंत्रिपदाची शर्यत चालू असतानाही जोडा अलग न होवू देणारा एक मित्र म्हणून पाहिलं, मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिल्यानंतर आम्ही मध्यमवर्गीय घर बदलल्या नंतर सामानाची जशी " बांधा-बांधी" करतो तशीच "वर्षा" बंगल्यावर पुस्तकांची बांधा-बांधी करणारा आंध्र प्रदेशचा भावी राज्यपाल म्हणून पाहिलं,संसदेतील सर्वोच्च पदावर पोहोचूनही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेला पराभूत नेता म्हणून पाहिलं. कित्ती कित्ती म्हणून सांगावं? अशा असंख्य रुपात मी त्यांना पहिलं. पण मला भावला तो त्यांच्यातील  संवेदनशील "सच्चा हळवा माणूस" ! दिल्ली असो वा गल्ली सुशीलकुमारांनी त्यांच्यातल्या त्या सच्चा हळव्या माणसाला कधीही हरवू दिले नाही,उलट दिवसागणिक अधिक सशक्त आणि मजबूतच बनवलं ! त्यामुळेच त्यांच्यातील सहजता आजही शाबूत आहे.ज्या ज्या वेळी कुठे त्यांचा विषय निघतो त्या त्या वेळी मी आवर्जून म्हणत असतो की सुशीलकुमार शिंदे ही केवळ राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेली व्यक्ती नाही तर संपूर्ण समाजाची संपत्ती आहे ! अशी वयक्तिमत्व तयार होण्यासाठी ४०-५० वर्षे लागतात ... अशा संपत्तीची जपणूक करणे ही समाजाची जबाबदारी असते. हळव्या मनाच्या या सच्चा माणसाला आपण जतन करुया..  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर सोलापूर जिल्ह्याची ओळख निर्माण करणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा  !                                          

(लेखक ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे