शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मसापचे आश्वासक परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 03:33 IST

महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्य संस्थांची मातृसंस्था आहे. १ एप्रिल २०१६ रोजी परिषदेत परिवर्तन झाले आणि नव्या मंडळींनी गेल्या दीड वर्षांत केलेले काम 'परिवर्तना'ची साक्ष पटवून देणारे आहे, असे म्हणायला हरकत नाही

- विजय बाविस्करमहाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्य संस्थांची मातृसंस्था आहे. १ एप्रिल २०१६ रोजी परिषदेत परिवर्तन झाले आणि नव्या मंडळींनी गेल्या दीड वर्षांत केलेले काम 'परिवर्तना'ची साक्ष पटवून देणारे आहे, असे म्हणायला हरकत नाही. ही मंडळी केवळ सभागृहाचे नूतनीकरण किंवा इमारतीला बाहेरून रंगकाम करून थांबली नाहीत. परिषद आतून-बाहेरून बदलावी यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, ते अभिनंदनास पात्र ठरावेत.कार्यक्रमांचे बदललेले रूप, मसाप गप्पा, कथासुगंध, एक कवयित्री, एक कवी, लेखक तुमच्या भेटीला यासारखे सुरू झालेले नवे उपक्रम, त्यामुळे लोकांचा वाढलेला राबता, साहित्यविषयक काम करणाºया संस्थांना बरोबर घेऊन जाण्याची दाखविलेली तयारी, साहित्यातील सर्व प्रवाहांसाठी असलेली स्वागतशील भूमिका यामुळे परिषदेविषयी पूर्वी सर्वसामान्यांना वाटणारी तिरस्काराची भावना आणि हितचिंतकांना तिथे जाताना येणारे दडपण आता अनुभवायला येत नाही, अशी चर्चा साहित्यिक आणि साहित्यरसिक करतात तेव्हा परिषद योग्य मार्गाने चालली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये .विद्यमान पदाधिकाºयांनी परिषदेचे पुणे शहर परिसरापुरते मर्यादित असलेले काम ग्रामीण भागापर्यंत पोहचवून ग्रामीण भागातील वाङ्मयीन कार्यकर्ते आणि साहित्यिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले. संमेलनापर्यंत रसिकांना पोहचणे शक्य नसेल तर रसिकांपर्यंत संमेलनांनी पोहचले पाहिजे, या भूमिकेतून साहित्य परिषदेने अजनुज (ता. खंडाळा जि. सातारा ) येथे घेतलेले परिषदेच्या इतिहासातले पहिले शिवार साहित्य संमेलन लक्षणीय ठरले.न्या. रानडे यांनी पहिल्या ग्रंथकार संमेलनाचे महात्मा फुले यांना निमंत्रण पाठविले होते, ते त्यांनी नाकारताना या संमेलनात शेतकरी, शेतमजुरांना स्थान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या अपेक्षेची पूर्तता १११ वर्षांनंतर होताना दिसते आहे, हे शुभचिन्ह आहे. कारण याच शिवारातल्या माणसांनी मराठी भाषा जिवंत ठेवली आहे. विभागीय साहित्य संमेलन, समीक्षा संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन, शाखा मेळावा हे उपक्रम ग्रामीण भागात घेण्याचा परिषदेचा निर्णयही स्वागतार्ह आहे. आजच्या बालकुमारांची साहित्याशी असलेली नाळ तुटत चालली आहे. जिल्हावार एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलने घेण्याचा परिषदेचा निर्णय स्वागतार्ह आहे. पदाधिकाºयांनी अल्पावधीतच लोणावळ्यात धुंवाधार पाऊस असतानाही मनशक्ती केंद्राच्या सहकार्याने अनिल अवचट यांच्या अध्यक्षतेखाली जे बालकुमार साहित्य संमेलन घेतले, ते कमालीचे यशस्वी झाले. अंदरमावळातल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले होते. आता परिषदेने ग्रंथालयाचा कायापालट करण्याची गरज आहे. दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनसाठी युद्धपातळीवर प्रयत्न हवेत. समृद्ध परंपरा असलेल्या म. सा. पत्रिका या मुखपत्राकडे अधिक गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. ही पत्रिका त्याच त्या लेखकांना सतत लिहिण्याची संधी देते किंवा त्याच त्या लेखकांवर पुन्हा पुन्हा लिहून येते, अशी चर्चा साहित्य वर्तुळात आहे. संपादकांनी कल्पकता दाखवून पत्रिकेचे संदर्भमूल्य कसे वाढेल, याकडे लक्ष द्यावे. परिषदेच्या तरुण नेतृत्वाची कार्यतत्परता, उत्साह भविष्यातही टिकायला हवा.

टॅग्स :Puneपुणे