शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मसापचे आश्वासक परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 03:33 IST

महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्य संस्थांची मातृसंस्था आहे. १ एप्रिल २०१६ रोजी परिषदेत परिवर्तन झाले आणि नव्या मंडळींनी गेल्या दीड वर्षांत केलेले काम 'परिवर्तना'ची साक्ष पटवून देणारे आहे, असे म्हणायला हरकत नाही

- विजय बाविस्करमहाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्य संस्थांची मातृसंस्था आहे. १ एप्रिल २०१६ रोजी परिषदेत परिवर्तन झाले आणि नव्या मंडळींनी गेल्या दीड वर्षांत केलेले काम 'परिवर्तना'ची साक्ष पटवून देणारे आहे, असे म्हणायला हरकत नाही. ही मंडळी केवळ सभागृहाचे नूतनीकरण किंवा इमारतीला बाहेरून रंगकाम करून थांबली नाहीत. परिषद आतून-बाहेरून बदलावी यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, ते अभिनंदनास पात्र ठरावेत.कार्यक्रमांचे बदललेले रूप, मसाप गप्पा, कथासुगंध, एक कवयित्री, एक कवी, लेखक तुमच्या भेटीला यासारखे सुरू झालेले नवे उपक्रम, त्यामुळे लोकांचा वाढलेला राबता, साहित्यविषयक काम करणाºया संस्थांना बरोबर घेऊन जाण्याची दाखविलेली तयारी, साहित्यातील सर्व प्रवाहांसाठी असलेली स्वागतशील भूमिका यामुळे परिषदेविषयी पूर्वी सर्वसामान्यांना वाटणारी तिरस्काराची भावना आणि हितचिंतकांना तिथे जाताना येणारे दडपण आता अनुभवायला येत नाही, अशी चर्चा साहित्यिक आणि साहित्यरसिक करतात तेव्हा परिषद योग्य मार्गाने चालली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये .विद्यमान पदाधिकाºयांनी परिषदेचे पुणे शहर परिसरापुरते मर्यादित असलेले काम ग्रामीण भागापर्यंत पोहचवून ग्रामीण भागातील वाङ्मयीन कार्यकर्ते आणि साहित्यिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले. संमेलनापर्यंत रसिकांना पोहचणे शक्य नसेल तर रसिकांपर्यंत संमेलनांनी पोहचले पाहिजे, या भूमिकेतून साहित्य परिषदेने अजनुज (ता. खंडाळा जि. सातारा ) येथे घेतलेले परिषदेच्या इतिहासातले पहिले शिवार साहित्य संमेलन लक्षणीय ठरले.न्या. रानडे यांनी पहिल्या ग्रंथकार संमेलनाचे महात्मा फुले यांना निमंत्रण पाठविले होते, ते त्यांनी नाकारताना या संमेलनात शेतकरी, शेतमजुरांना स्थान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या अपेक्षेची पूर्तता १११ वर्षांनंतर होताना दिसते आहे, हे शुभचिन्ह आहे. कारण याच शिवारातल्या माणसांनी मराठी भाषा जिवंत ठेवली आहे. विभागीय साहित्य संमेलन, समीक्षा संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन, शाखा मेळावा हे उपक्रम ग्रामीण भागात घेण्याचा परिषदेचा निर्णयही स्वागतार्ह आहे. आजच्या बालकुमारांची साहित्याशी असलेली नाळ तुटत चालली आहे. जिल्हावार एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलने घेण्याचा परिषदेचा निर्णय स्वागतार्ह आहे. पदाधिकाºयांनी अल्पावधीतच लोणावळ्यात धुंवाधार पाऊस असतानाही मनशक्ती केंद्राच्या सहकार्याने अनिल अवचट यांच्या अध्यक्षतेखाली जे बालकुमार साहित्य संमेलन घेतले, ते कमालीचे यशस्वी झाले. अंदरमावळातल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले होते. आता परिषदेने ग्रंथालयाचा कायापालट करण्याची गरज आहे. दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनसाठी युद्धपातळीवर प्रयत्न हवेत. समृद्ध परंपरा असलेल्या म. सा. पत्रिका या मुखपत्राकडे अधिक गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. ही पत्रिका त्याच त्या लेखकांना सतत लिहिण्याची संधी देते किंवा त्याच त्या लेखकांवर पुन्हा पुन्हा लिहून येते, अशी चर्चा साहित्य वर्तुळात आहे. संपादकांनी कल्पकता दाखवून पत्रिकेचे संदर्भमूल्य कसे वाढेल, याकडे लक्ष द्यावे. परिषदेच्या तरुण नेतृत्वाची कार्यतत्परता, उत्साह भविष्यातही टिकायला हवा.

टॅग्स :Puneपुणे