शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

आजचा अग्रलेख: सुपरकॉप की सुपरफ्लॉप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 11:44 IST

कारवाई करताना कोणाचाही मुलाहिजा न ठेवण्याबद्दल ओळखले जाणारे संजय पांडे हे कायमच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले. 

ब्रिटिशकालीन परंपरा असलेले मुंबई पोलीस आयुक्तपद भूषविलेल्या संजय पांडे यांना ‘ईडी’ने अटक केल्याने पोलीस वर्तुळाला धक्का बसला आहे. निवृत्त होताच अटकेची कारवाई होणारे संजय पांडे हे दुसरे पोलीस आयुक्त आहेत. याआधी मुद्रांक शुल्क घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी रणजित शर्मा यांना अटक करण्यात आली होती. खरगपूर आयआयटीतून सुवर्णपदक मिळविणारे पांडे आयपीएस सेवेत आले. कारवाई करताना कोणाचाही मुलाहिजा न ठेवण्याबद्दल ओळखले जाणारे संजय पांडे हे कायमच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले. 

१९९२ साली उसळलेल्या ऐन दंगलीत संजय पांडे यांची मुंबईत नियुक्ती झाली होती. दंगलीत पेटलेला धारावीसारखा परिसर शांत केल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले. नंतर त्याच परिमंडळात पोलीस उपायुक्त म्हणून काम करताना त्यांनी गुन्हेगारीचे आरोप असलेल्या अनेक नगरसेवकांना गजाआड गेले. त्यानंतर आर्थिक गुन्हेविरोधी विभागातही त्यांच्या कामाची चर्चा होत राहिली. ते चर्मोद्योग घोटाळा तसेच दहावी पेपरफुटी प्रकरणाचा तपास हाताळत असताना अनेकजण दुखावले गेले. पोलीस अधिकारी म्हणजे त्याने केवळ वरिष्ठांनी ठरवून दिलेल्या चौकटीतच तपास करावा, या तेव्हापर्यंतच्या रूढीला पांडे यांनी आपल्या कार्यपद्धतीने छेद दिला. त्यांच्या तपासपद्धतीमुळे अस्वस्थ झालेले तत्कालीन पोलीस आयुक्त रामदेव त्यागी यांनी तर दहावी पेपरफुटीच्या प्रकरणाच्या फायलीच त्यांच्याकडून काढून घेतल्या होत्या. वरिष्ठांपासून ते सत्ताधारी पक्षांतील काही नेत्यांशी बिनसल्याने सतत धुमसणाऱ्या पांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला. तो मंजूर होण्याचीही प्रतीक्षा न करता त्यांनी ‘आयसेक’ कंपनी स्थापन केली.  

खाकी वर्दीतील संजय पांडे सुटबूट घालून कॉर्पोरेट वातावरणात रमल्याचे दिसू लागले. काही काळाने पांडे यांनी राजीनामा मागे घेत पुन्हा खाकी वर्दी चढविली. दरम्यानच्या काळात संजय पांडे निवडणूक लढणार असल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. पुन्हा पोलिसी सेवेत परतल्यानंतर राज्यकर्त्यांशी असलेले त्यांचे मतभेद पराकोटीला गेले. आपल्या हक्कांसाठी ते सरकारविरोधात न्यायालयातही गेले; पण तेव्हापासून ते कायमच महत्त्वाच्या पदांपासून दूर राहिल्याने त्यांना जनतेची सहानुभूती होती. निवृत्तिकाळ जवळ येत असतानाच महाविकास आघाडी सरकारने त्यांना पोलीस आयुक्तपदी नेमले. अलीकडील तपासात राष्ट्रीय शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग पांडे यांच्या कंपनीने केल्याचे उघडकीस आल्याचा दावा करीत ‘ईडी’ने त्यांना अटक केली. 

राजकीय धामधुमीच्या काळात विरोधी पक्षांतील नेत्यांचे फोन बेकायदेशीररीत्या टॅप केल्याच्या आरोपावरून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधातही काही महिन्यांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले. परमबीर सिंह यांच्यापासून सचिन वाझे, प्रदीप शर्मा या कनिष्ठ अधिकाऱ्यांचे नेत्यांशी हितसंबंध असल्याचे आरोप नेहमीच होत राहिले. मोक्याचे पद मिळविण्यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे.  विरोधकांना नामोहरम करीत आपले इप्सित साध्य करण्यासाठी कोणताही सत्ताधारी पक्ष अशा पोलिसांचा वापर करतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे. पोलिसांना बेकायदेशीर कामे करण्याचे ताेंडी आदेश देणारे नेते नंतर मात्र नामानिराळे राहतात. राजशकट बदलले की सत्तेवर येणारा पक्ष त्या अधिकाऱ्यांवर डूख ठेवून त्याच्यामागे बदली, कारवाईचे शुक्लकाष्ठ लावतो. असे प्रकार वर्षानुवर्षे घडत आहेत. हे केवळ महाराष्ट्रातच घडते आहे असे नव्हे. 

गुजरात, हरयाणा, पंजाब अशा अन्य राज्यांतही असे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी पोलीस-नेत्यांची हातमिळवणी पाहावयास मिळते, तर काही ठिकाणी पोलिसांचेच  दमन होते. राजकीय वरदहस्त असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांकडून बनावट चकमकी, हत्या झाल्याचे आरोप होत अनेक प्रकरणे न्यायालयापर्यंतही पोहोचली. त्यांतून अनेक धक्कादायक बाबीही वेळोवेळी उघडकीस आल्या. वरिष्ठांचे आदेश आंधळेपणाने पाळत आपले पद शाबूत ठेवण्याच्या नादात असे प्रकार पोलिसांकडून घडतात. त्यामुळे आपला खांदा कुणाला वापरायला द्यायचा का, याचाही विचार पोलिसांनी करावा, असे म्हटले जाते. कुणाला सुपरकॉप ठरवायचे आणि कुणाला सुपरफ्लाॅप करायचे, हे केवळ सत्ताधाऱ्यांच्याच हातात आहे, असा समज पोलीस वर्तुळात पसरणे धोक्याचे आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय