शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अभिनेता सुनील शेट्टी सुनावतो, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 11:18 IST

सिनेमा एका नट-नटीचा नसतो. प्रत्येक जाती-धर्माचे कित्येक लोक काम करतात. सिनेमांवर बंदी घालून काय मिळवणार आहात, असा थेट सवाल सुनील शेट्टीने केला!

- अतुल कुलकर्णी

‘मन तडपत हरी दर्शन को आज..’ हे अजरामर भजन. गीतकार शकील बदायुनी, संगीतकार नौशाद, गायक मोहम्मद रफी ! ‘इन्साफ का मंदिर है, ये भगवान का घर है’.. गायक मोहम्मद रफी, संगीतकार नौशाद, गीतकार शकील, अभिनेता दिलीप कुमार, निर्माता दिग्दर्शक मेहबूब खान ! - हे सगळे कलावंत लोक धर्माने मुस्लीम होते. त्यांच्या मनात ही गाणी करताना चुकुनतरी धर्माचा विचार आला असणे शक्य आहे का? भारतीय चित्रपटसृष्टी ही अशी ऐक्याची महती सांगणारी आहे. मात्र हल्ली हे ऐक्यच धोक्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीचीच नाही तर देशाची जगभरात बदनामी होत आहे. ‘बॉयकॉट बॉलिवूड’ असा हॅशटॅग करून अमुक अभिनेत्यांचे चित्रपट बघू नका, असे सांगत वादंग निर्माण करण्याने संपूर्ण इंडस्ट्री अडचणीत आली आहे.

एकीकडे राजकोटमध्ये सोहिल बलूज हा मुस्लीम गायक, पाकिस्तानी तबलावादक वाजिद अली यांना घेऊन शिवभजन तयार करतो, तर दुसरीकडे इंडियन आयडॉलमध्ये गाणारी फरमानी नाज ही मुस्लीम मुलगी हर हर शंभो हे भजन गायलं म्हणून तिच्याच समाजातून टीकेची धनी होते. लाल सिंग चढ्ढा, विक्रम वेधा, ब्रह्मास्त्र, रक्षा बंधन, लायगर, सम्राट पृथ्वीराज चौहान हे चित्रपटही बॉयकॉट बॉलिवूडचे बळी ठरले. या आधी भगव्या रंगाच्या बिकिनी पडद्यावर अनेकींनी घातल्या. मात्र शाहरुख खानच्या ‘पठाण’ सिनेमात दीपिकाने त्या रंगाची बिकिनी घातली, म्हणून गहजब सुरू झाला आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील ही सगळी खदखद अभिनेते सुनील शेट्टी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर बोलून दाखवली. उत्तर प्रदेशमध्ये जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्यासाठी मुंबईत आदित्यनाथ यांनी सिनेसृष्टीतल्या तमाम दिग्गजांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सुनील शेट्टी या सगळ्यांचा आवाज बनला. इथे तुमच्याकडे कोणी जमीन, सबसिडी, घर मागेल; मला यातले काहीही नको. मात्र ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा ट्रेंड थांबवा. सिनेमा एका नट किंवा नटीचा नसतो. त्यामागे वेगवेगळ्या जाती-धर्माचे हजारो लोक काम करतात. त्यांचे संसार या इंडस्ट्रीवर उभे आहेत. सिनेमांना बंदी घालून काय मिळवणार आहात, असा थेट सवाल करत सुनील शेट्टीने, हजारो लोकांच्या मेहनतीवर पाणी टाकू नका, तुमचे पंतप्रधानांकडे वजन आहे, त्यांच्या लक्षात या गोष्टी आणून द्या. तुम्ही ते करू शकता.. अशी भावनिक सादही योगी आदित्यनाथ यांना घातली.  

शाहरुख खानने स्वदेश, फिर भी दिल है हिन्दुस्तानी, सलमानने बजरंगी भाईजान, आमिरने लगान, थ्री एडियटसारखे चित्रपट केले. सलमान दरवर्षी त्याच्या घरी गणपती बसवतो. गोरगरीब रुग्णांना  लाखोंची मदत करतो. आजही कोणाच्या घरी मंगलकार्य असले तर बिस्मिल्ला खान यांची शहनाई वाजते. झाकीर हुसेन यांचा तबला थिरकतो. भारतीय सिनेमा आपल्या देशाचा खूप मोठा ठेवा आहे. त्याला सामाजिक बदलाचा इतिहास आहे. आजच्या काळात ‘जाने भी दो यारो’सारखा सिनेमा आला असता तर लोकांनी दंगलीच केल्या असत्या, असे वाटण्याइतपत परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच हे थांबायला हवे. 

जाता जाता : 

मकाऊ येथे एका पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन उपस्थित होते. तुमचे सिनेमे आमच्याकडे आणून इथे त्याचे मार्केटिंग का करता? असा प्रश्न  एका चिनी पत्रकाराने त्यांना विचारला. त्यावर अमिताभ यांनी उत्तर दिले, “अंधाऱ्या चित्रपटगृहात तुमच्या मागे पुढे, आजूबाजूला कोण बसले आहे हे तुम्हाला माहिती नसते. मात्र पडद्यावर दिसणाऱ्या एखाद्या दुःखद प्रसंगात तुम्हा सगळ्यांचे डोळे ओले होतात. विनोदी प्रसंगात तुम्ही सगळे हसता. त्यावेळी पाहणारे कोणत्या जाती-धर्माचे, कोणत्या रंगाचे आहेत हे तिथे महत्त्वाचे ठरत नाही. तिथे भावना महत्त्वाच्या ठरतात. जगातला कुठलाही सिनेमा याच भावना जपण्याचे काम करतो...” - या उत्तरानंतर उपस्थित पत्रकारांनी टाळ्यांच्या गजरात अमिताभला दाद दिली होती. आपण या भावना कधी जपणार आहोत... हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथSunil Shettyसुनील शेट्टी