शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

दुर्दैवी घटना घडल्यानंतरच राज्यकर्त्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तात्पुरते लक्ष जाते वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 03:06 IST

पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारण्यात येत असलेल्या कीटकनाशकाने घेतलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील १८ शेतक-यांच्या बळींची अखेर सरकारने उशिरा का होईना दखल घेतली.

पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारण्यात येत असलेल्या कीटकनाशकाने घेतलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील १८ शेतक-यांच्या बळींची अखेर सरकारने उशिरा का होईना दखल घेतली. एरवी हेच सरकार अशा काही दुर्दैवी घटना घडल्या की तत्काळ टिष्ट्वट करून आपली कार्यतत्परता दाखवते. मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी लागलीच घटनास्थळाला भेट देतात. नुकसानभरपाई जाहीर करतात.परंतु या घटनेत ज्यांचा जीव गेला ते शेतकरी आणि त्यातही बहुसंख्य आदिवासी असल्याने राज्यकर्त्यांचे मन विदीर्ण व्हायला वेळ लागला. ज्या कीटकनाशकामुळे या गरीब शेतकºयांचा नाहक बळी गेला आहे त्या कंपनीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी आहे. तरीही त्याचा वापर भारतात होत असेल तर ही बाब अतिशय गंभीर अशीच आहे. संतापाची गोष्ट अशी की सरकारने अद्यापही या कीटकनाशक कंपनीवर बंदी घातलेली नाही. खरे तर पिकांवर फवारणी करीत असताना सरकारच्या कृषी विभागाकडून शेतकºयांना वारंवार मार्गदर्शन मिळायला हवे. पण, तसे होत नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील संशोधकही अशावेळी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे या शेतक-यांचा झालेला मृत्यू हा केवळ विषारी कीटकनाशकामुळे नव्हे तर त्यामागे सरकारी अनास्थाही तेवढीच कारणीभूत आहे. या कीटकनाशकामुळे मरण पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली असली तरी ती पुरेशी नाही. सरकार आता कीटकनाशकाची फवारणी करणा-या शेतक-यांना मास्क पुरविणार आहे. पण या कीटकनाशक कंपनीवरील बंदीचे काय? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. शेतक-यांना एकीकडे कर्जमाफी द्यावी, पण त्याचवेळी १८ शेतकरी आपला जीव नाहक गमावत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करावे, हा राज्यकर्त्यांचा दुतोंडीपणा साºयांच्याच लक्षात यावा असा आहे. आता या दुर्दैवी घटनेचेसुुद्धा राजकारण होईल. सर्वच राजकीय पक्ष आणि शेतकºयांच्या संघटनांचे नेते या दिवंगत शेतकºयांच्या घरी येतील, त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतील, नंतर आरोेपांच्या फैरी सुरू होतील. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष रान उठवतील. पण नंतर हा विषय सा-यांच्याच विस्मरणात जाईल. शेतकºयांच्या नष्टचर्याबद्दल सरकार कुणाचेही असो हीच अनास्था बाळगली जाते. पण, या सर्व नौटंकीत मूळ प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे. एखादा अपघात किंवा दुर्दैवी घटना घडल्यानंतरच राज्यकर्त्यांचे त्या प्रश्नांकडे तात्पुरते लक्ष वेधले जाते. एरवी ते बुलेट ट्रेनच्या उभारणीत व्यस्त असतात.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार