शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी घटना घडल्यानंतरच राज्यकर्त्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तात्पुरते लक्ष जाते वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 03:06 IST

पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारण्यात येत असलेल्या कीटकनाशकाने घेतलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील १८ शेतक-यांच्या बळींची अखेर सरकारने उशिरा का होईना दखल घेतली.

पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारण्यात येत असलेल्या कीटकनाशकाने घेतलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील १८ शेतक-यांच्या बळींची अखेर सरकारने उशिरा का होईना दखल घेतली. एरवी हेच सरकार अशा काही दुर्दैवी घटना घडल्या की तत्काळ टिष्ट्वट करून आपली कार्यतत्परता दाखवते. मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी लागलीच घटनास्थळाला भेट देतात. नुकसानभरपाई जाहीर करतात.परंतु या घटनेत ज्यांचा जीव गेला ते शेतकरी आणि त्यातही बहुसंख्य आदिवासी असल्याने राज्यकर्त्यांचे मन विदीर्ण व्हायला वेळ लागला. ज्या कीटकनाशकामुळे या गरीब शेतकºयांचा नाहक बळी गेला आहे त्या कंपनीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी आहे. तरीही त्याचा वापर भारतात होत असेल तर ही बाब अतिशय गंभीर अशीच आहे. संतापाची गोष्ट अशी की सरकारने अद्यापही या कीटकनाशक कंपनीवर बंदी घातलेली नाही. खरे तर पिकांवर फवारणी करीत असताना सरकारच्या कृषी विभागाकडून शेतकºयांना वारंवार मार्गदर्शन मिळायला हवे. पण, तसे होत नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील संशोधकही अशावेळी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे या शेतक-यांचा झालेला मृत्यू हा केवळ विषारी कीटकनाशकामुळे नव्हे तर त्यामागे सरकारी अनास्थाही तेवढीच कारणीभूत आहे. या कीटकनाशकामुळे मरण पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली असली तरी ती पुरेशी नाही. सरकार आता कीटकनाशकाची फवारणी करणा-या शेतक-यांना मास्क पुरविणार आहे. पण या कीटकनाशक कंपनीवरील बंदीचे काय? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. शेतक-यांना एकीकडे कर्जमाफी द्यावी, पण त्याचवेळी १८ शेतकरी आपला जीव नाहक गमावत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करावे, हा राज्यकर्त्यांचा दुतोंडीपणा साºयांच्याच लक्षात यावा असा आहे. आता या दुर्दैवी घटनेचेसुुद्धा राजकारण होईल. सर्वच राजकीय पक्ष आणि शेतकºयांच्या संघटनांचे नेते या दिवंगत शेतकºयांच्या घरी येतील, त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतील, नंतर आरोेपांच्या फैरी सुरू होतील. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष रान उठवतील. पण नंतर हा विषय सा-यांच्याच विस्मरणात जाईल. शेतकºयांच्या नष्टचर्याबद्दल सरकार कुणाचेही असो हीच अनास्था बाळगली जाते. पण, या सर्व नौटंकीत मूळ प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे. एखादा अपघात किंवा दुर्दैवी घटना घडल्यानंतरच राज्यकर्त्यांचे त्या प्रश्नांकडे तात्पुरते लक्ष वेधले जाते. एरवी ते बुलेट ट्रेनच्या उभारणीत व्यस्त असतात.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार