शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साखर कडू करण्याचा उद्योग

By admin | Updated: October 7, 2016 02:26 IST

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा हंगाम कधी सुरू करायचा, यावरही राज्य सरकारचे नियंत्रण आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्री समिती आहे.

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा हंगाम कधी सुरू करायचा, यावरही राज्य सरकारचे नियंत्रण आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्री समिती आहे. त्या समितीच्या बैठकीत दर वर्षी साखर कारखान्यांना ऊस गाळपाचा परवाना केव्हापासून द्यायचा, याचा निर्णय होतो. पाऊसमान, ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्र (म्हणजे उपलब्ध ऊस) आणि इतर अनुषंगिक घटकांचा विचार करून गळीत हंगामाच्या प्रारंभाचा मुहूर्त काढला जातो. चालू वर्षी हा हंगाम १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, सहकार मंत्री यांच्यासह साखर कारखाना संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.वास्तविक, दर वर्षी हा हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येतो. त्या दरम्यान दिवाळीचा सण असेल, तर दोन-चार दिवस तारखा पुढे-मागे करण्यात येतात. कारण दिवाळी सणामुळे मराठवाड्यातील ऊसतोडणी मजूर येत नाहीत. शिवाय परतीचा पाऊस लांबला तर ऊसतोडणी शक्य होत नाही. या दोन कारणांशिवाय इतर कोणतेही ठोस कारण पुढे येत नाही. चालू वर्षी यात ऊस टंचाईच्या कारणाची भर पडली आहे. गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होते. परिणामी, उसाच्या लागवडीवर परिणाम झाला. गतवर्षी (२०१५-१६) राज्यात १७७ साखर कारखान्यांनी ७४३ लाख टन ऊसाचे गाळप करून ८४ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. चालू गळीत हंगामासाठी ऊसाची उपलब्धता कमी आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे लागवड कमी झाल्याने उपलब्धता ५०० लाख टनच होईल आणि साखरेचे उत्पादन ६० लाख टन होईल, असा अंदाज आहे. म्हणजे राज्यात दोन कोटी ४३ लाख टन ऊसाचे उत्पादन कमी असेल तर साखरेचे उत्पादन २४ लाख टनांनीे घटेल.आपल्याकडील साखर कारखाने सरासरी १५० ते १८० दिवस चालतात. राज्यातील सर्व साखर कारखान्यांची दररोजची गाळप क्षमता साडेपाच लाख टनांची आहे. ऊसाची उपलब्धता ५०० लाख टन असेल, तर या सर्व ऊसाचे गाळप १०० दिवसांतच होईल. कारखान्यांच्या क्षमतेइतका ऊस या हंगामात उपलब्ध नसेल म्हणून गळीत हंगामच लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.या वर्षी दिवाळीचा सण १ नोव्हेंबरला संपणार असल्याने १५ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा होती. याच काळात थंडीही सुरू होते. ऊसाचा उतारा आणि वजन वाढलेले असते. शिवाय पश्चिम महाराष्ट्रात आडसाली उसाचे क्षेत्र मोठे असते. त्या ऊसाला १४ महिने उलटलेले असतात. वाढ पूर्ण झालेली असते. हा ऊस लवकर तुटला की रान मोकळे होते. काहींना इतर पिके घेता येतात. शिवाय तोडणी लवकर होताच पैसे लवकर मिळतात. यासाठी ऊस लवकर तुटावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. ऊसाचे वजन पुढे घटते; मात्र उतारा डिसेंबर, जानेवारीत वाढतो. त्याचा शेतकऱ्यांना तोटा आणि साखर कारखान्यांना फायदा होतो. त्यामुळेच काही शेतकरी संघटनांनी गळीत हंगाम लांबवण्यास विरोध केला आहे. हा साखरेचा धंदा कडू करण्याचा निर्णय असल्याची कडवट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने साखर साठ्यावर मर्यादा आणल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात साखर येऊन दर उतरू लागले आहेत. अशा स्थितीत हंगामही लांबणीवर टाकणे अयोग्य वाटते. दक्षिण महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांना कर्नाटकातील सीमा भागातून ऊसाचा पुरवठा होतो. कर्नाटकने १५ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी चांगल्या ऊसाचे लवकर गाळप केले, तर सीमेवरील जिल्ह्यांतील अनेक कारखान्यांना ऊसाची टंचाई भासणार आहे. त्यामुळे गळीत हंगामाचा मुहूर्त काढताना साखरेच्या उद्योगात कडवटपणा निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्यायला हवी!- वसंत भोसले