शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाध्यक्षांची अशीही लोकप्रियता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 08:14 IST

Marathi Sahitya Sammelan: दिल्ली येथे भरणाऱ्या आगामी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. तारा भवाळकर यांचं छायचित्रं असलेली शुभेच्छापत्रं किंवा मग, कुणी तयार करत असेल तर... याला काय म्हणायचं? अर्थात, हा ताराबाईंबद्दल महाराष्ट्राच्या जनमानसात असलेला आदरच होय!

- डॉ. मुकुंद कुळे(मुक्त पत्रकार)

सण-उत्सवांच्या निमित्ताने टी-शर्ट, चहा-कॉफीचे मग किंवा शुभेच्छापत्रांवर वेगवेगळ्या प्रकारचे संदेश वा छायाचित्र प्रिंट करून घेणं आता नवीन राहिलेलं नाही. किंबहुना तरुणाईची ती ओळखच बनली आहे, कारण त्यातून त्यांची कल्पकताच प्रतीत होत असते. पण दिल्ली येथे भरणाऱ्या आगामी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. तारा भवाळकर यांचं छायचित्रं असलेली शुभेच्छापत्रं किंवा मग, कुणी तयार करत असेल तर... याला काय म्हणायचं? अर्थात, हा ताराबाईंबद्दल महाराष्ट्राच्या जनमानसात असलेला आदरच होय!

वास्तविक गेल्या काही वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद, हे एक समीकरणच झालेलं आहे. अगदी स्थळनिवडीपासून ते अध्यक्षनिवडीपर्यंत कुठलाही विषय या वादाला वर्ज्य नसतो. अशा वेळी दिल्ली येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आणि सर्वच प्रकारच्या वादांना जणू विराम मिळाला. अर्थात, ही किमया डॉ. तारा भवाळकर यांच्या कणखर तरी ऋजू व्यक्तिमत्त्वाची. त्यांच्या लेखनात आणि वक्तृत्वात रोखठोकपणा-ठामपणा आहेच, मात्र अनावश्यक ताठरता-काठिन्य नाही. त्यामुळेच संमेलनाध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड झाल्यावर पक्षीय राजकारणाच्या पल्याड जाऊन साऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं, अगदी घरी जाऊन केलं. परंतु यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या निवडीने कोणत्याही प्रकारची वैचारिक-बौद्धिक मिरासदारी मानणाऱ्यांपेक्षा मातीशी-निसर्गाशी इमानदारी राखणाऱ्या बहुजनांना त्यांच्या या निवडीचा आनंद अधिक झाला. त्यामुळेच तर जात-धर्माच्या आणि कोणत्याही सामाजिक स्तराच्या पल्याड जाऊन प्रत्येकाने त्यांच्या निवडीचा आनंद साजरा केला. हा आनंद साजरा करण्यात त्यांच्या सांगली जिल्ह्यातील राजकारणी, समाजकारणी यांच्यापासून ते त्या राहत असलेल्या मार्गावरील दुकानदार-भाजीवाले साऱ्यांचा समावेश होता. आपण गेली अनेक वर्षे ज्या बाईंना बघतोय त्या दिल्ली येथे भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्याचं समजल्यावर त्यांच्या घरासमोरच्या दुकानदार-भाजीविक्रेत्यांनी अगदी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला.

एखादा साहित्यिक संमेलनाध्यक्ष झाल्यावर साहित्य विश्वात त्याचं होणारं कौतुक हा एकप्रकारे उपचाराचाच भाग असतो. परंतु यंदा, समाजाच्या सर्व स्तरातून ताराबाईंचं होत असलेलं स्वागत ही लक्षणीय बाब आहे. किंबहुना लोकसाहित्याच्या निर्मितीमागे ज्याप्रकारे लोकमानसाची प्रेरणा असते, तसंच काहीसं यावेळी झालंय, ताराबाईंच्या निवडीमुळे संपूर्ण लोकमानस आनंदून गेलंय... आणि त्यामुळेच त्यांचं कौतुक करण्याच्या, अभिनंदन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जात आहेत. कुणी ताराबाईंचा फोटो असलेल्या शुभेच्छापत्रिका तयार केल्यात, तर कुणी ताराबाईंचा फोटो असलेले चहा-कॉफीचे मग तयार केलेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदावर कित्येक वर्षांनी अशा साहित्यिकाची वर्णी लागलेली आहे, ज्याच्याकडे विद्वत्ता आहे, प्रतिभा, विचार आहे आणि ज्याचे पाय इथल्या मातीत घट्ट रोवलेले आहेत. डॉ. तारा भवाळकर यांना महाराष्ट्राच्या सर्व स्तरांतून मिळत असलेली स्वीकारार्हता याचंच तर द्योतक आहे!

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन