शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

साहित्य संमेलनाध्यक्षांची अशीही लोकप्रियता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 08:14 IST

Marathi Sahitya Sammelan: दिल्ली येथे भरणाऱ्या आगामी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. तारा भवाळकर यांचं छायचित्रं असलेली शुभेच्छापत्रं किंवा मग, कुणी तयार करत असेल तर... याला काय म्हणायचं? अर्थात, हा ताराबाईंबद्दल महाराष्ट्राच्या जनमानसात असलेला आदरच होय!

- डॉ. मुकुंद कुळे(मुक्त पत्रकार)

सण-उत्सवांच्या निमित्ताने टी-शर्ट, चहा-कॉफीचे मग किंवा शुभेच्छापत्रांवर वेगवेगळ्या प्रकारचे संदेश वा छायाचित्र प्रिंट करून घेणं आता नवीन राहिलेलं नाही. किंबहुना तरुणाईची ती ओळखच बनली आहे, कारण त्यातून त्यांची कल्पकताच प्रतीत होत असते. पण दिल्ली येथे भरणाऱ्या आगामी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. तारा भवाळकर यांचं छायचित्रं असलेली शुभेच्छापत्रं किंवा मग, कुणी तयार करत असेल तर... याला काय म्हणायचं? अर्थात, हा ताराबाईंबद्दल महाराष्ट्राच्या जनमानसात असलेला आदरच होय!

वास्तविक गेल्या काही वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद, हे एक समीकरणच झालेलं आहे. अगदी स्थळनिवडीपासून ते अध्यक्षनिवडीपर्यंत कुठलाही विषय या वादाला वर्ज्य नसतो. अशा वेळी दिल्ली येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आणि सर्वच प्रकारच्या वादांना जणू विराम मिळाला. अर्थात, ही किमया डॉ. तारा भवाळकर यांच्या कणखर तरी ऋजू व्यक्तिमत्त्वाची. त्यांच्या लेखनात आणि वक्तृत्वात रोखठोकपणा-ठामपणा आहेच, मात्र अनावश्यक ताठरता-काठिन्य नाही. त्यामुळेच संमेलनाध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड झाल्यावर पक्षीय राजकारणाच्या पल्याड जाऊन साऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं, अगदी घरी जाऊन केलं. परंतु यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या निवडीने कोणत्याही प्रकारची वैचारिक-बौद्धिक मिरासदारी मानणाऱ्यांपेक्षा मातीशी-निसर्गाशी इमानदारी राखणाऱ्या बहुजनांना त्यांच्या या निवडीचा आनंद अधिक झाला. त्यामुळेच तर जात-धर्माच्या आणि कोणत्याही सामाजिक स्तराच्या पल्याड जाऊन प्रत्येकाने त्यांच्या निवडीचा आनंद साजरा केला. हा आनंद साजरा करण्यात त्यांच्या सांगली जिल्ह्यातील राजकारणी, समाजकारणी यांच्यापासून ते त्या राहत असलेल्या मार्गावरील दुकानदार-भाजीवाले साऱ्यांचा समावेश होता. आपण गेली अनेक वर्षे ज्या बाईंना बघतोय त्या दिल्ली येथे भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्याचं समजल्यावर त्यांच्या घरासमोरच्या दुकानदार-भाजीविक्रेत्यांनी अगदी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला.

एखादा साहित्यिक संमेलनाध्यक्ष झाल्यावर साहित्य विश्वात त्याचं होणारं कौतुक हा एकप्रकारे उपचाराचाच भाग असतो. परंतु यंदा, समाजाच्या सर्व स्तरातून ताराबाईंचं होत असलेलं स्वागत ही लक्षणीय बाब आहे. किंबहुना लोकसाहित्याच्या निर्मितीमागे ज्याप्रकारे लोकमानसाची प्रेरणा असते, तसंच काहीसं यावेळी झालंय, ताराबाईंच्या निवडीमुळे संपूर्ण लोकमानस आनंदून गेलंय... आणि त्यामुळेच त्यांचं कौतुक करण्याच्या, अभिनंदन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जात आहेत. कुणी ताराबाईंचा फोटो असलेल्या शुभेच्छापत्रिका तयार केल्यात, तर कुणी ताराबाईंचा फोटो असलेले चहा-कॉफीचे मग तयार केलेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदावर कित्येक वर्षांनी अशा साहित्यिकाची वर्णी लागलेली आहे, ज्याच्याकडे विद्वत्ता आहे, प्रतिभा, विचार आहे आणि ज्याचे पाय इथल्या मातीत घट्ट रोवलेले आहेत. डॉ. तारा भवाळकर यांना महाराष्ट्राच्या सर्व स्तरांतून मिळत असलेली स्वीकारार्हता याचंच तर द्योतक आहे!

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन