शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

यशाचा चढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 04:50 IST

कोणत्याही खेळाडूने जेतेपद पटकावले की त्याच्या खेळातील सातत्याची कायम चर्चा होते. मुळात जेतेपद पटकावल्यानंतर ते टिकवून ठेवणे हेच मोठे आव्हान असते.

कोणत्याही खेळाडूने जेतेपद पटकावले की त्याच्या खेळातील सातत्याची कायम चर्चा होते. मुळात जेतेपद पटकावल्यानंतर ते टिकवून ठेवणे हेच मोठे आव्हान असते. भारताच्या वैयक्तिक खेळातील खेळाडूंचा विचार केल्यास अशा बाबतीत विश्वनाथन आनंद, पंकज अडवाणी, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, लिएंडर पेस अशा खेळाडूंची नावे आघाडीवर घेता येतील. क्रिकेटमध्ये सध्या विराट कोहलीचे नाव सातत्यपूर्ण कामगिरीसाठी सर्वांत आघाडीवर आहे. असेच सातत्य राखून आज देशभरात आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात मुंबईच्या सुनीत जाधवला यश आले आहे. शरीरसौष्ठवसारख्या महागड्या आणि अत्यंत कठीण अशा खेळामध्ये त्याने सलग पाचवेळा ‘महाराष्ट्र श्री’ किताब पटकावला. विशेष म्हणजे आता २३-२५ मार्चला तो पुण्यात सलग तिसºयांदा ‘भारत श्री’ पटकावण्यास सज्ज होईल.कोणत्याही खेळातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सलग पाच वर्षे जेतेपद पटकावणे सहजसोपी गोष्ट नाही आणि शरीरसौष्ठवसारख्या खेळात तर अजिबात नाही. एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या सुनीतने आर्थिक अडचणींना तोंड देत आपला ठसा उमटविला. या खेळासाठी सर्वप्रथम त्याला आपल्या कुटुंबीयांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. सुरुवातीच्या काळात विभागीय स्पर्धांमध्ये यश मिळविल्यानंतर त्याने राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही आपले वर्चस्व राखले; यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. स्पर्धा कोणतीही असो एका बाजूला सुनीत आणि एका बाजूला इतर सर्व प्रतिस्पर्धी खेळाडू असे एक समीकरणच तयार होऊ लागले. ठरविलेले लक्ष्य गाठण्याचा तुमचा निर्धार पक्का असेल आणि त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल, तर तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा संदेश सुनीतने आज आपल्या कामगिरीतून युवा खेळाडूंना दिला आहे. आज अनेक शरीरसौष्ठवपटू असे आहेत जे यश मिळविल्यानंतरही आर्थिक बाजू सक्षम नसल्याने खेळ सोडतात. सुनीतनेही अशाच परिस्थितीला तोंड दिले आहे. पण त्याने कधीही खेळ सोडण्याचा निर्णय घेतला नाही. यासाठी त्याने अनेक ठिकाणी अर्धवेळ नोकरी केली, अतिरिक्त वेळ व्यायामशाळेत घालवून दुसºयांना टेÑनिंग देत स्वत:चाही सराव केला. सुनीतने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या शरीरयष्टीकडे दुर्लक्ष केले नाही. त्यामुळेच आज आपल्याला सलग पाचव्या वर्षी तो ‘महाराष्ट्र श्री’च्या रूपाने कायम दिसला. हीच मेहनत तो यापुढेही कायम ठेवेल यात शंका नाही; आणि याच जोरावर आता आपल्यापुढे सलग तिसºयांदा ‘भारत श्री’च्या रूपाने सुनीत दिसेल.