शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

यशाचा चढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 04:50 IST

कोणत्याही खेळाडूने जेतेपद पटकावले की त्याच्या खेळातील सातत्याची कायम चर्चा होते. मुळात जेतेपद पटकावल्यानंतर ते टिकवून ठेवणे हेच मोठे आव्हान असते.

कोणत्याही खेळाडूने जेतेपद पटकावले की त्याच्या खेळातील सातत्याची कायम चर्चा होते. मुळात जेतेपद पटकावल्यानंतर ते टिकवून ठेवणे हेच मोठे आव्हान असते. भारताच्या वैयक्तिक खेळातील खेळाडूंचा विचार केल्यास अशा बाबतीत विश्वनाथन आनंद, पंकज अडवाणी, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, लिएंडर पेस अशा खेळाडूंची नावे आघाडीवर घेता येतील. क्रिकेटमध्ये सध्या विराट कोहलीचे नाव सातत्यपूर्ण कामगिरीसाठी सर्वांत आघाडीवर आहे. असेच सातत्य राखून आज देशभरात आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात मुंबईच्या सुनीत जाधवला यश आले आहे. शरीरसौष्ठवसारख्या महागड्या आणि अत्यंत कठीण अशा खेळामध्ये त्याने सलग पाचवेळा ‘महाराष्ट्र श्री’ किताब पटकावला. विशेष म्हणजे आता २३-२५ मार्चला तो पुण्यात सलग तिसºयांदा ‘भारत श्री’ पटकावण्यास सज्ज होईल.कोणत्याही खेळातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सलग पाच वर्षे जेतेपद पटकावणे सहजसोपी गोष्ट नाही आणि शरीरसौष्ठवसारख्या खेळात तर अजिबात नाही. एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या सुनीतने आर्थिक अडचणींना तोंड देत आपला ठसा उमटविला. या खेळासाठी सर्वप्रथम त्याला आपल्या कुटुंबीयांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. सुरुवातीच्या काळात विभागीय स्पर्धांमध्ये यश मिळविल्यानंतर त्याने राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही आपले वर्चस्व राखले; यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. स्पर्धा कोणतीही असो एका बाजूला सुनीत आणि एका बाजूला इतर सर्व प्रतिस्पर्धी खेळाडू असे एक समीकरणच तयार होऊ लागले. ठरविलेले लक्ष्य गाठण्याचा तुमचा निर्धार पक्का असेल आणि त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल, तर तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा संदेश सुनीतने आज आपल्या कामगिरीतून युवा खेळाडूंना दिला आहे. आज अनेक शरीरसौष्ठवपटू असे आहेत जे यश मिळविल्यानंतरही आर्थिक बाजू सक्षम नसल्याने खेळ सोडतात. सुनीतनेही अशाच परिस्थितीला तोंड दिले आहे. पण त्याने कधीही खेळ सोडण्याचा निर्णय घेतला नाही. यासाठी त्याने अनेक ठिकाणी अर्धवेळ नोकरी केली, अतिरिक्त वेळ व्यायामशाळेत घालवून दुसºयांना टेÑनिंग देत स्वत:चाही सराव केला. सुनीतने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या शरीरयष्टीकडे दुर्लक्ष केले नाही. त्यामुळेच आज आपल्याला सलग पाचव्या वर्षी तो ‘महाराष्ट्र श्री’च्या रूपाने कायम दिसला. हीच मेहनत तो यापुढेही कायम ठेवेल यात शंका नाही; आणि याच जोरावर आता आपल्यापुढे सलग तिसºयांदा ‘भारत श्री’च्या रूपाने सुनीत दिसेल.