शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

नक्षलविरोधी रणनीतीचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:28 AM

गडचिरोली जिल्हा हा नक्षलवाद्यांचा गड मानला जातो. राज्यात सर्वाधिक नक्षली उपद्रव हा याच जिल्ह्यात होत असतो. परंतु यंदा मात्र चित्र बदलले आहे.

गडचिरोली जिल्हा हा नक्षलवाद्यांचा गड मानला जातो. राज्यात सर्वाधिक नक्षली उपद्रव हा याच जिल्ह्यात होत असतो. परंतु यंदा मात्र चित्र बदलले आहे. या वर्षभरात नक्षल चळवळीची नांगी ठेचण्यात पोलिसांना लक्षणीय यश मिळाले आहे. विशेष म्हणजे पोलीस दलाच्या कारवाईसोबतच त्या भागातील लोकांनी नक्षल्यांविरुद्ध पुकारलेल्या एल्गाराने ही चळवळ निष्प्रभ करण्याच्या प्रयत्नांना बळ प्राप्त होत आहे. यावर्षी आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ६५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून तब्बल ४० चकमकींमध्ये ९ नक्षलवादी ठार झाले आहेत. याशिवाय २० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणही केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत नक्षल्यांकडून आदिवासींच्या हत्येचे प्रमाणही निम्म्यावर आले आहे. याबद्दल पोलीस दलाचे अभिनंदन करायला हवे. तसेच नक्षल्यांच्या हिंसाचारात होरपळलेल्या आदिवासी बांधवांच्या हिमतीलाही दाद द्यावी लागेल. गडचिरोली जिल्ह्यात १९८० साली नक्षलवादाने आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली होती. या काळात शेजारील आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येत नक्षलवादी गडचिरोलीत शिरले आणि हळूहळू तेथील जंगलांमध्ये त्यांनी आपले बस्तान बांधले. या काळात प्रचंड हिंसाचार, जाळपोळ आणि हत्याकांडांसोबतच या क्षेत्रातील तरुणतरुणींची दिशाभूल करून त्यांना चळवळीत खेचण्यासही ते बºयाच अंशी यशस्वी झाले. नक्षल्यांच्या रक्तपातात अनेक निष्पाप आदिवासींचा बळी गेला. परंतु आता परिस्थिती बदलत चालली आहे. तसे बघता नक्षलवाद्यांच्या तुलनेत शासकीय यंत्रणेकडे असलेले मनुष्यबळ आणि शस्त्रबळही जास्त आहे. असे असतानाही नक्षलवाद चिरडून काढण्यात आजवर अपयशच पदरी पडले. कारण नक्षली ध्येयाने प्रेरित होते आणि त्यांना स्थानिक लोकांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा होता. निष्पाप आदिवासी त्यांच्यावर विश्वास ठेवत होते. परंतु त्यांचा हा विश्वास नक्षल्यांनी आता गमावला आहे. गेल्या महिन्यातील नक्षल सप्ताहादरम्यान याची प्रचिती आली. हा आठवडा नक्षलविरोधी सप्ताह म्हणूनच अधिक गाजला. लोक उघडपणे कुठल्याही भयाविना नक्षलवाद्यांविरुद्ध रस्त्यावर उतरले होते. शासनाच्या नक्षल आत्मसमर्पण योजनेला मिळणारा प्रतिसादही तेच सांगतो. नक्षल्यांच्या रक्तपाताने लोक त्रस्त झाले असून त्यांची शांतीपूर्ण जीवन जगण्याची इच्छा आहे आणि नक्षल्यांचा बीमोड करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. ही चळवळ उखडून काढायची असल्यास जनजागरुकता आणि जनआंदोलन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात हे दोन्ही घटक प्रभावी झाले आहेत. हा सकारात्मक बदल नक्षलवाद नक्की संपणार असा विश्वास देतो.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी