शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

नक्षलविरोधी रणनीतीचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:28 IST

गडचिरोली जिल्हा हा नक्षलवाद्यांचा गड मानला जातो. राज्यात सर्वाधिक नक्षली उपद्रव हा याच जिल्ह्यात होत असतो. परंतु यंदा मात्र चित्र बदलले आहे.

गडचिरोली जिल्हा हा नक्षलवाद्यांचा गड मानला जातो. राज्यात सर्वाधिक नक्षली उपद्रव हा याच जिल्ह्यात होत असतो. परंतु यंदा मात्र चित्र बदलले आहे. या वर्षभरात नक्षल चळवळीची नांगी ठेचण्यात पोलिसांना लक्षणीय यश मिळाले आहे. विशेष म्हणजे पोलीस दलाच्या कारवाईसोबतच त्या भागातील लोकांनी नक्षल्यांविरुद्ध पुकारलेल्या एल्गाराने ही चळवळ निष्प्रभ करण्याच्या प्रयत्नांना बळ प्राप्त होत आहे. यावर्षी आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ६५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून तब्बल ४० चकमकींमध्ये ९ नक्षलवादी ठार झाले आहेत. याशिवाय २० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणही केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत नक्षल्यांकडून आदिवासींच्या हत्येचे प्रमाणही निम्म्यावर आले आहे. याबद्दल पोलीस दलाचे अभिनंदन करायला हवे. तसेच नक्षल्यांच्या हिंसाचारात होरपळलेल्या आदिवासी बांधवांच्या हिमतीलाही दाद द्यावी लागेल. गडचिरोली जिल्ह्यात १९८० साली नक्षलवादाने आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली होती. या काळात शेजारील आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येत नक्षलवादी गडचिरोलीत शिरले आणि हळूहळू तेथील जंगलांमध्ये त्यांनी आपले बस्तान बांधले. या काळात प्रचंड हिंसाचार, जाळपोळ आणि हत्याकांडांसोबतच या क्षेत्रातील तरुणतरुणींची दिशाभूल करून त्यांना चळवळीत खेचण्यासही ते बºयाच अंशी यशस्वी झाले. नक्षल्यांच्या रक्तपातात अनेक निष्पाप आदिवासींचा बळी गेला. परंतु आता परिस्थिती बदलत चालली आहे. तसे बघता नक्षलवाद्यांच्या तुलनेत शासकीय यंत्रणेकडे असलेले मनुष्यबळ आणि शस्त्रबळही जास्त आहे. असे असतानाही नक्षलवाद चिरडून काढण्यात आजवर अपयशच पदरी पडले. कारण नक्षली ध्येयाने प्रेरित होते आणि त्यांना स्थानिक लोकांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा होता. निष्पाप आदिवासी त्यांच्यावर विश्वास ठेवत होते. परंतु त्यांचा हा विश्वास नक्षल्यांनी आता गमावला आहे. गेल्या महिन्यातील नक्षल सप्ताहादरम्यान याची प्रचिती आली. हा आठवडा नक्षलविरोधी सप्ताह म्हणूनच अधिक गाजला. लोक उघडपणे कुठल्याही भयाविना नक्षलवाद्यांविरुद्ध रस्त्यावर उतरले होते. शासनाच्या नक्षल आत्मसमर्पण योजनेला मिळणारा प्रतिसादही तेच सांगतो. नक्षल्यांच्या रक्तपाताने लोक त्रस्त झाले असून त्यांची शांतीपूर्ण जीवन जगण्याची इच्छा आहे आणि नक्षल्यांचा बीमोड करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. ही चळवळ उखडून काढायची असल्यास जनजागरुकता आणि जनआंदोलन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात हे दोन्ही घटक प्रभावी झाले आहेत. हा सकारात्मक बदल नक्षलवाद नक्की संपणार असा विश्वास देतो.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी