शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

सुभाष देशमुखांचा सात-बारा फंडा

By admin | Updated: July 22, 2016 04:42 IST

राजकारणात सोयीचा त्यालाच सभासदत्व हा पायंडा आता मोडीत निघणार

राजकारणात सोयीचा त्यालाच सभासदत्व हा पायंडा आता मोडीत निघणार. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी काढलेल्या सात-बाराच्या फंड्याचे परिणाम गावोगावी दिसणार...एखाद्या क्षेत्रात अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवले की त्या क्षेत्रातील बारकावे लगेचच उमजतात. अगदी तसाच अनुभव नव्याने सहकार खात्याचा कार्यभार स्वीकारलेल्या सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी परवा दिला.शेतकरी, ग्रामीण विकासाची संधी आणि सहकारी सोसायट्या यांचा असलेला जवळचा संबंध त्यांनी गेल्या २०-२५ वर्षांत अनुभवला. गावातली सोसायटी ही केवळ राजकारणाचा अड्डा बनते व तिच्यापासून आपल्याला सोयीच्या नसलेल्या शेतकरी बांधवांना सदस्यत्वापासून दूर राखले जाते. केवळ मतांच्या राजकारणात जे सोयीचे त्यांनाच सदस्यत्व बहाल करण्याची राजकीय प्रवृत्ती वाढीस लागते. त्याच प्रवृत्तीवर घाव घालणारा निर्णय देशमुख यांनी घेतला. गावातल्या विकास सोसायटीचे सदस्यत्व सर्वांनाच खुले करण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. जमिनीच्या सात-बारावर ज्याचे नाव असेल त्याला गावातल्या विकास सोसायटीचे सभासद करण्याचे आदेशच त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यांची ही भूमिका ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार आहे. सहकार क्षेत्रातील अनेक सत्तास्थानांची दारे ही गावातल्या विविध विकास सोसायटीच्या सभासदत्वाच्या माध्यमातून खुली होतात. राजकारणात जो आपल्या गटाचा असेल त्यालाच सभासदत्व देण्याची प्रथा मोडीत निघेल आणि सभासदांची संख्याही वाढेल. खरे तर सहकार चळवळ आपल्या देशात गावातल्या विकास सोसायटीच्या माध्यमातूनच सुरू झाली. १९०४ सालच्या सहकार कायद्याने विकास सोसायट्यांना जन्म दिला. बळीराजाला शेती करीत असताना पैशाची निकड पडते. ती भागविण्यासाठी त्याला खात्रीचा मार्ग सापडावा तसेच सावकारी पाशात तो अडकू नये, असाच त्यामागे त्यावेळीही उद्देश होता. लोकशाही पद्धतीने प्रत्येकाला कर्ज मिळविण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, सोसायटीचे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळविण्याचा हक्क प्राप्त व्हावा आणि ग्रामीण विकासाला चालना मिळावी, हाच त्या कायद्याचा उद्देश होता. त्याच उद्देशाला हरताळ फासून केवळ राजकारणासाठी सोसायट्या आणि त्यांच्या सभासदांचा वापर वर्षानुवर्षे होत राहिला.साखर कारखानदारीपासून छोट्या सहकारी सोसायटीपर्यंत स्वत: काम केलेल्या मंत्री सुभाष देशमुख यांना सोसायटीचे आणि तिच्या सभासदत्वाचे महत्त्व गावात काय असते हे चांगलेच माहीत आहे. त्याच कारणाने त्यांनी सात-बाराचा फंडा जाहीर केला. देशमुख यांची ही कृती येत्या काळात गावोगावच्या राजकारणात नवे रंग भरणार आहे. ग्रामपंचायतीला ज्याप्रमाणे मतदानाचा अधिकार असतो त्याप्रमाणे शेतकऱ्याला सोसायटीलाही मतदानाचा अधिकार मिळेल. शेतीसाठी कर्ज उपलब्ध होण्याबरोबरच अनेक गावांमध्ये सोसायटीचे राजकारणही जिवंत होणार आहे. ‘शुगर लॉबी’ म्हणून सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीला वेगळ्या नजरेने नेहमीच पाहिले गेले. मागच्या काही वर्षांत तर सहकार क्षेत्रातील घोटाळ्यांमुळे सहकार क्षेत्र आणि साखर कारखानदारी बदनाम झाली. सहकार क्षेत्र अधिक मजबूत व शुद्ध होणे हे ग्रामीण विकासासाठी आवश्यक आहे. त्या आवश्यकतेची जाण सुमारे दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि सुमारे पाच हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकमंगल समूहा’चे जनक सुभाष देशमुख यांना नक्कीच आहे. त्याच कारणाने सोलापूर जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या पतसंस्थांमधील ठेवीच्या रकमा ठेवीदारांना परत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम घेतली आहे. संबंधित संस्थांच्या थकबाकीदारांकडून त्या सक्षमपणे वसूल करण्याची यंत्रणाही उभी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यात ५४ हजार सहकारी संस्था या कागदोपत्री आहेत व त्यांचे कामकाज एका पिशवीतून चालते, हे सिद्ध झाल्यानंतर शासनाने त्या संस्था कायमच्या गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू केली. सहकाराच्या शुद्धीकरणासाठी सुभाष देशमुखही आपला सहकार क्षेत्रातील अनुभव कामी आणतील, असेच आजचे चित्र आहे. त्याच चित्राची साक्ष त्यांचा सात-बाराचा फंडा देतो आहे. - राजा माने