शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष देशमुखांचा सात-बारा फंडा

By admin | Updated: July 22, 2016 04:42 IST

राजकारणात सोयीचा त्यालाच सभासदत्व हा पायंडा आता मोडीत निघणार

राजकारणात सोयीचा त्यालाच सभासदत्व हा पायंडा आता मोडीत निघणार. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी काढलेल्या सात-बाराच्या फंड्याचे परिणाम गावोगावी दिसणार...एखाद्या क्षेत्रात अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवले की त्या क्षेत्रातील बारकावे लगेचच उमजतात. अगदी तसाच अनुभव नव्याने सहकार खात्याचा कार्यभार स्वीकारलेल्या सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी परवा दिला.शेतकरी, ग्रामीण विकासाची संधी आणि सहकारी सोसायट्या यांचा असलेला जवळचा संबंध त्यांनी गेल्या २०-२५ वर्षांत अनुभवला. गावातली सोसायटी ही केवळ राजकारणाचा अड्डा बनते व तिच्यापासून आपल्याला सोयीच्या नसलेल्या शेतकरी बांधवांना सदस्यत्वापासून दूर राखले जाते. केवळ मतांच्या राजकारणात जे सोयीचे त्यांनाच सदस्यत्व बहाल करण्याची राजकीय प्रवृत्ती वाढीस लागते. त्याच प्रवृत्तीवर घाव घालणारा निर्णय देशमुख यांनी घेतला. गावातल्या विकास सोसायटीचे सदस्यत्व सर्वांनाच खुले करण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. जमिनीच्या सात-बारावर ज्याचे नाव असेल त्याला गावातल्या विकास सोसायटीचे सभासद करण्याचे आदेशच त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यांची ही भूमिका ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार आहे. सहकार क्षेत्रातील अनेक सत्तास्थानांची दारे ही गावातल्या विविध विकास सोसायटीच्या सभासदत्वाच्या माध्यमातून खुली होतात. राजकारणात जो आपल्या गटाचा असेल त्यालाच सभासदत्व देण्याची प्रथा मोडीत निघेल आणि सभासदांची संख्याही वाढेल. खरे तर सहकार चळवळ आपल्या देशात गावातल्या विकास सोसायटीच्या माध्यमातूनच सुरू झाली. १९०४ सालच्या सहकार कायद्याने विकास सोसायट्यांना जन्म दिला. बळीराजाला शेती करीत असताना पैशाची निकड पडते. ती भागविण्यासाठी त्याला खात्रीचा मार्ग सापडावा तसेच सावकारी पाशात तो अडकू नये, असाच त्यामागे त्यावेळीही उद्देश होता. लोकशाही पद्धतीने प्रत्येकाला कर्ज मिळविण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, सोसायटीचे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळविण्याचा हक्क प्राप्त व्हावा आणि ग्रामीण विकासाला चालना मिळावी, हाच त्या कायद्याचा उद्देश होता. त्याच उद्देशाला हरताळ फासून केवळ राजकारणासाठी सोसायट्या आणि त्यांच्या सभासदांचा वापर वर्षानुवर्षे होत राहिला.साखर कारखानदारीपासून छोट्या सहकारी सोसायटीपर्यंत स्वत: काम केलेल्या मंत्री सुभाष देशमुख यांना सोसायटीचे आणि तिच्या सभासदत्वाचे महत्त्व गावात काय असते हे चांगलेच माहीत आहे. त्याच कारणाने त्यांनी सात-बाराचा फंडा जाहीर केला. देशमुख यांची ही कृती येत्या काळात गावोगावच्या राजकारणात नवे रंग भरणार आहे. ग्रामपंचायतीला ज्याप्रमाणे मतदानाचा अधिकार असतो त्याप्रमाणे शेतकऱ्याला सोसायटीलाही मतदानाचा अधिकार मिळेल. शेतीसाठी कर्ज उपलब्ध होण्याबरोबरच अनेक गावांमध्ये सोसायटीचे राजकारणही जिवंत होणार आहे. ‘शुगर लॉबी’ म्हणून सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीला वेगळ्या नजरेने नेहमीच पाहिले गेले. मागच्या काही वर्षांत तर सहकार क्षेत्रातील घोटाळ्यांमुळे सहकार क्षेत्र आणि साखर कारखानदारी बदनाम झाली. सहकार क्षेत्र अधिक मजबूत व शुद्ध होणे हे ग्रामीण विकासासाठी आवश्यक आहे. त्या आवश्यकतेची जाण सुमारे दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि सुमारे पाच हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकमंगल समूहा’चे जनक सुभाष देशमुख यांना नक्कीच आहे. त्याच कारणाने सोलापूर जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या पतसंस्थांमधील ठेवीच्या रकमा ठेवीदारांना परत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम घेतली आहे. संबंधित संस्थांच्या थकबाकीदारांकडून त्या सक्षमपणे वसूल करण्याची यंत्रणाही उभी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यात ५४ हजार सहकारी संस्था या कागदोपत्री आहेत व त्यांचे कामकाज एका पिशवीतून चालते, हे सिद्ध झाल्यानंतर शासनाने त्या संस्था कायमच्या गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू केली. सहकाराच्या शुद्धीकरणासाठी सुभाष देशमुखही आपला सहकार क्षेत्रातील अनुभव कामी आणतील, असेच आजचे चित्र आहे. त्याच चित्राची साक्ष त्यांचा सात-बाराचा फंडा देतो आहे. - राजा माने