शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांहून सरकार ठरले ‘ढ’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:46 IST

विद्यार्थ्यांना सवलत देण्यासाठी शासनाकडून मोठ्या मनाने नियम केले जातात, पण त्याचा अंमल अभ्यासपूर्वक होतो की नाही याकडे कोण लक्ष देणार?

- अजित गोगटेकोणताही कायदा किंवा नियमाची अंमलबजावणी पश्चातलक्षी परिणामाने मानली जाते. मात्र जेव्हा एखाद्या जुन्या कायद्याच्या किंवा नियमाच्या बदल्यात पूर्णपणे नवा कायदा किंवा नवा नियम केला जातो तेव्हा मात्र वरील सर्वमान्य गृहितकास अपवाद ठरतो. याचे कारण जुन्या नियमाचे अस्तित्व संपुष्टात येते आणि नवा नियम लागू होतो. वरकरणी हा फरक लहान वाटत असला तरी त्याचा परिणाम मूलगामी होतो. खास करून शिक्षणाच्या क्षेत्रात तर विद्यार्थ्यांचे मोठे ेनुकसान होऊ शकते. राज्यातील विविध दंतवैद्यक महाविद्यालयांमध्ये ‘बीडीएस’चे शिक्षण घेत असलेल्या पाच विद्यार्थ्यांना याचाच जाचक अनुभव आला. डेंटल कौन्सिल आॅफ इंडिया आणि केंद्र सरकारने चुकीचा अर्र्थ लावल्याने या पाचही विद्यार्थ्यांना ‘बीडीएस’चे शिक्षण सोडून घरी बसण्याची पाळी येणार होती. परंतु उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्याय दिल्याने आता त्यांना बीडीएस पूर्ण करण्यासाठी आणखी पाच वर्षांची उसंत मिळाली आहे.संजीवनी मोहन राठोड (पुसद, यवतमाळ), योगेश अनिरुद्ध धरपडे (दत्तनगर, परभणी), प्रियंका अशोक पाटील (मेहकर, बुलढाणा) , प्राजक्ता प्रभू सुरवसे (औंधा नागनाथ, हिंगोली) आणि भक्ती मनोजकुमार गग्गड (पूर्णा, परभणी) या विद्यार्थ्यांनी १ सप्टेंबर २०१४ रोजी विविध दंतमहाविद्यालयांमध्ये बीडीएसला प्रवेश घेतला. त्यावेळी असा नियम होता की, प्रथम वर्ष बीडीएसचे सर्व विषय तीन वर्षांत ‘क्लिअर’ केले नाहीत तर विद्यार्थ्यास अभ्यासक्रम पुढे सुरू ठेवता येणार नाही. हे पाचही विद्यार्थी बºयापैकी ‘ढ’ असल्याने सन २०१४ ते २०१७ या तीन शैक्षणिक वर्षांत त्यांना प्रथम वर्ष बीडीएसच्या एकाही विषयात उत्तीर्ण होता आले नाही. दरम्यान, २७ एप्रिल २०१५ पासून डेंटल कौन्सिलने नवा नियम केला आणि तीनऐवजी नऊ वर्षांचा कालावधी ठरविला. परंतु या पाच विद्यार्थ्यांची तीन वर्षांची मुदत आधीच संपली असल्याने नोव्हेंबर २०१७ च्या परीक्षेस त्यांना बसू दिले गेले नाही. मात्र प्रस्तुत प्रकरणात जुन्याच्या बदल्यात पूर्णपणे नवा नियम लागू केला गेला आहे त्यामुळे त्या नियमाच्या तारखेला शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तो लागू होतो, असा निकाल देऊन उच्च न्यायालयाने या पाचही विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्याचा दिलासा दिला.याआधी पशुवैद्यक पदवी अभ्यासक्रमाच्या बाबतीत नवा नियम करून १० वर्षांची मुदत ठरविली गेली तेव्हाही व्हेटर्नरी कौन्सिल व केंद्र सरकारने असाच घोळ घातला होता. थोडक्यात, ‘ढ’ विद्यार्थ्यांना सवलत देण्यासाठी मोठ्या मनाने नियम केले जातात, पण त्यांची अंमलबजावणी करणारे अधिकारी हे त्याहूनही अधिक ‘ढ’ असावेत, असे दिसते.

टॅग्स :Courtन्यायालयStudentविद्यार्थीGovernmentसरकार