शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

विद्यार्थ्यांहून सरकार ठरले ‘ढ’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:46 IST

विद्यार्थ्यांना सवलत देण्यासाठी शासनाकडून मोठ्या मनाने नियम केले जातात, पण त्याचा अंमल अभ्यासपूर्वक होतो की नाही याकडे कोण लक्ष देणार?

- अजित गोगटेकोणताही कायदा किंवा नियमाची अंमलबजावणी पश्चातलक्षी परिणामाने मानली जाते. मात्र जेव्हा एखाद्या जुन्या कायद्याच्या किंवा नियमाच्या बदल्यात पूर्णपणे नवा कायदा किंवा नवा नियम केला जातो तेव्हा मात्र वरील सर्वमान्य गृहितकास अपवाद ठरतो. याचे कारण जुन्या नियमाचे अस्तित्व संपुष्टात येते आणि नवा नियम लागू होतो. वरकरणी हा फरक लहान वाटत असला तरी त्याचा परिणाम मूलगामी होतो. खास करून शिक्षणाच्या क्षेत्रात तर विद्यार्थ्यांचे मोठे ेनुकसान होऊ शकते. राज्यातील विविध दंतवैद्यक महाविद्यालयांमध्ये ‘बीडीएस’चे शिक्षण घेत असलेल्या पाच विद्यार्थ्यांना याचाच जाचक अनुभव आला. डेंटल कौन्सिल आॅफ इंडिया आणि केंद्र सरकारने चुकीचा अर्र्थ लावल्याने या पाचही विद्यार्थ्यांना ‘बीडीएस’चे शिक्षण सोडून घरी बसण्याची पाळी येणार होती. परंतु उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्याय दिल्याने आता त्यांना बीडीएस पूर्ण करण्यासाठी आणखी पाच वर्षांची उसंत मिळाली आहे.संजीवनी मोहन राठोड (पुसद, यवतमाळ), योगेश अनिरुद्ध धरपडे (दत्तनगर, परभणी), प्रियंका अशोक पाटील (मेहकर, बुलढाणा) , प्राजक्ता प्रभू सुरवसे (औंधा नागनाथ, हिंगोली) आणि भक्ती मनोजकुमार गग्गड (पूर्णा, परभणी) या विद्यार्थ्यांनी १ सप्टेंबर २०१४ रोजी विविध दंतमहाविद्यालयांमध्ये बीडीएसला प्रवेश घेतला. त्यावेळी असा नियम होता की, प्रथम वर्ष बीडीएसचे सर्व विषय तीन वर्षांत ‘क्लिअर’ केले नाहीत तर विद्यार्थ्यास अभ्यासक्रम पुढे सुरू ठेवता येणार नाही. हे पाचही विद्यार्थी बºयापैकी ‘ढ’ असल्याने सन २०१४ ते २०१७ या तीन शैक्षणिक वर्षांत त्यांना प्रथम वर्ष बीडीएसच्या एकाही विषयात उत्तीर्ण होता आले नाही. दरम्यान, २७ एप्रिल २०१५ पासून डेंटल कौन्सिलने नवा नियम केला आणि तीनऐवजी नऊ वर्षांचा कालावधी ठरविला. परंतु या पाच विद्यार्थ्यांची तीन वर्षांची मुदत आधीच संपली असल्याने नोव्हेंबर २०१७ च्या परीक्षेस त्यांना बसू दिले गेले नाही. मात्र प्रस्तुत प्रकरणात जुन्याच्या बदल्यात पूर्णपणे नवा नियम लागू केला गेला आहे त्यामुळे त्या नियमाच्या तारखेला शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तो लागू होतो, असा निकाल देऊन उच्च न्यायालयाने या पाचही विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्याचा दिलासा दिला.याआधी पशुवैद्यक पदवी अभ्यासक्रमाच्या बाबतीत नवा नियम करून १० वर्षांची मुदत ठरविली गेली तेव्हाही व्हेटर्नरी कौन्सिल व केंद्र सरकारने असाच घोळ घातला होता. थोडक्यात, ‘ढ’ विद्यार्थ्यांना सवलत देण्यासाठी मोठ्या मनाने नियम केले जातात, पण त्यांची अंमलबजावणी करणारे अधिकारी हे त्याहूनही अधिक ‘ढ’ असावेत, असे दिसते.

टॅग्स :Courtन्यायालयStudentविद्यार्थीGovernmentसरकार