शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नियतीच्या फे-यात तेज झाकोळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 03:20 IST

एखाद्याचे जीवन संघर्षपूर्ण असले तरी दुर्दम्य इच्छाशक्ती, कुटुंबीयांचे पाठबळ आणि गुरूंचे मार्गदर्शन याआधारे त्यावर मात करीत स्वत:ची वाट धुंडाळणा-या व्यक्ती भोवताली दिसून येतात. पण त्यापैकी काहींना नियतीच्या फे-यापुढे पराभव स्वीकारावा लागतो.

- मिलिंद कुलकर्णीगायन आणि प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगणारा प्रज्ञाचक्षू तेजस हा नियतीपुढे पराभूत झाला.एखाद्याचे जीवन संघर्षपूर्ण असले तरी दुर्दम्य इच्छाशक्ती, कुटुंबीयांचे पाठबळ आणि गुरूंचे मार्गदर्शन याआधारे त्यावर मात करीत स्वत:ची वाट धुंडाळणा-या व्यक्ती भोवताली दिसून येतात. पण त्यापैकी काहींना नियतीच्या फे-यापुढे पराभव स्वीकारावा लागतो. त्यातून ‘पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा...’ या महाकवी गदिमांच्या काव्यपंक्तीची यथार्थता जाणवते. जळगावच्या अवघ्या २० वर्षांच्या प्रज्ञाचक्षू उदयोन्मुख गायक तेजस नाईक याच्या अकाली निधनाने मानवी संघर्ष आणि नियतीपुढील हतबलता पुन्हा प्रत्ययास आली.जळगावातील शाळेत शिक्षक असलेल्या नितीन आणि गृहिणी सुवर्णा या दाम्पत्याच्या तेजस या मुलाला बालपणापासून वेगवेगळ्या आजारांनी घेरले. तीन महिन्यांचा असताना दम्याचा आजार बळावला. नऊ वर्षाचा होईपर्यंत सुमारे ३५ ते ४० वेळा त्याला दवाखान्यात दाखल करावे लागले, यावरून त्याच्या प्रकृतीअस्वास्थ्य, प्रतिकारक्षमतेच्या अभावाची कल्पना यावी. चौथीत असताना त्याला चिकुनगुनिया झाला. आजार बळावून अर्धांगवायूचा झटका आला. पुण्यात २२ दिवस कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. या जीवघेण्या आजारात त्याची दृष्टी गेली. आई-वडिलांवर आभाळ कोसळले. परंतु त्यांनी तेजसला भक्कम आधार दिला. तेजसने अभ्यास आणि गायनात मन गुंतवले. दहावीत ८५ टक्के तर बारावीत ७७ टक्के गुण मिळविले. गायनाचा अभ्यास आणि रियाज नियमितपणे करणाºया तेजसची जिद्द आणि आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. महाराष्टÑातील प्रमुख शहरांमध्ये आयोजित गायन स्पर्धेत तो आवर्जून सहभागी व्हायचा. शंभराहून अधिक बक्षिसे त्याने मिळविली. मू.जे. महाविद्यालयात बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला असलेला तेजस विद्यार्थी व प्राध्यापकांचा लाडका होता. विद्यापीठाच्या युवक महोत्सवात त्याने तीन सुवर्णपदके मिळविली. प्रांजल पाटील या मूळ जळगावकर प्रज्ञाचक्षू मुलीने केंद्रीय लोकसेवा आयोगात यश मिळविले. बहुदा तिचा आदर्श समोर ठेवत तेजसदेखील या परीक्षेच्या तयारीला लागला. दीपस्तंभ मनोबल केंद्रात तो दोन वर्षे तयारी करीत होता. या केंद्रातील काही तरुणांना कृत्रिम पाय बसविल्यावर पुढील दिवाळीपर्यंत आपल्यालाही दृष्टी मिळेल, अशी आस त्याला होती.गायन आणि प्रशासकीय सेवेचे तेजसचे स्वप्न पूर्ण करण्याच्यादृष्टीने आई-वडील प्रयत्नशील होते. सुमधूर गायनामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्याला आवर्जून बोलाविले जाई. कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमात गायलेले गाणे हे त्याचे सार्वजनिक कार्यक्रमातील बहुदा शेवटचे गाणे असावे. डेंग्यू झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. कावीळ, न्यूमोनियाची भर पडल्याने प्रकृती ढासळली. औरंगाबादला हलविण्यात आले. १० दिवसांची झुंज अपयशी ठरली आणि नियतीपुढे तेज झाकोळले. तेजसवर जळगावकरांचे निस्सीम प्रेम होते. श्रद्धांजलीपर तीन मोठे कार्यक्रम झाले. त्याच्या आठवणी सांगताना शिक्षक, कलाकार, विद्यार्थी ढसाढसा रडले. त्याच्या स्मरणार्थ दीपस्तंभच्या मनोबल केंद्रात संगीत कक्ष आणि संगीत पुरस्काराची घोषणा झाली. तेजसविषयी जळगावकर हळवे झालेले असताना महापालिका प्रशासनाची असंवेदनशीलता दिसून आली. तेजसच्या मृत्यूचे डेंग्यू हे एक कारण असताना त्याच्या घराचा परिसर मृत्यूनंतरही चार दिवस तसाच अस्वच्छ होता. कलावंताची मृत्यूनंतरही उपेक्षा वेदनादायक आहे.

टॅग्स :Deathमृत्यू