शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कळवळ्यापोटी ही धडपड आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 00:41 IST

मिलिंद कुलकर्णी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याचा आक्षेप १०० ...

मिलिंद कुलकर्णी

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याचा आक्षेप १०० दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी नोंदविला आहे. खासगीकरणाला महत्त्व देत असताना सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या बाजार समित्यांचे कंबरडे मोडण्याचे हे प्रयत्न असल्याचे काही कृषी तज्ज्ञांचेदेखील म्हणणे आहे. महाराष्ट्रात बाजार समित्यांचे जाळे मजबूतपणे विणले गेले असून त्या काही अपवाद वगळता चांगले काम करीत आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी राजकारण कसे प्रभावी ठरते, हे बाजार समितीच्या लांबलेल्या निवडणुका आणि प्रशासक नियुक्तीच्या मुद्यावरून स्पष्ट झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात १२ बाजार समित्या कार्यरत आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये या बाजार समितीच्या संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला. परंतु, कोरोना महासाथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका दोनदा पुढे ढकलल्या. त्यात बाजार समित्यांचादेखील समावेश होता. निवडणुका पुढे ढकलल्याने बाजार समितीच्या संचालक मंडळाविषयी काय करायचे याविषयी राज्य शासनाचे स्पष्ट धोरण दिसून आले नाही. जे सरपंचपदाच्या रिक्त जागांच्यावेळी झाले, तसेच याठिकाणी झाले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी आहेत, त्या बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली. मात्र भाजपच्या ताब्यातील समित्या बरखास्त करून त्यासाठी एकतर सहकार विभागाच्या सहायक निबंधकाची प्रशासक म्हणून निवड केली. आणि पुढे जाऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समावेश असलेल्या अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली. थेट निवडणुका होत नसल्याने मागील दाराने बाजार समितीत सत्ता हस्तगत करण्याचा हा प्रयत्न होता. अमळनेर, चाळीसगाव व पाचोरा येथे असे अशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हा अन्याय असल्याचे सांगत उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने प्रशासक मंडळाऐवजी जुन्या पदाधिकाऱ्यांकडे पदभार देण्याचा निकाल दिला. तिन्ही ठिकाणी पुन्हा जुने मंडळ अस्तित्वात आले. जामनेरात शासकीय प्रशासकांकडून पदभार स्वीकारला गेला, तर अमळनेरात उच्च न्यायालयाच्या निकालाचा अन्वयार्थ लावण्यावरून मतभिन्नता दिसून आली. दोन्ही मंडळे कार्यालयात येत आहेत. आता कायदेशीर मार्गदर्शन मागविले आहे.शेतकरी केंद्रबिंदू आहे काय?जळगाव जिल्ह्यातील यावल, जळगाव, रावेर, बोदवड, पारोळा, भुसावळ व चोपडा या ७ बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. तेथील पदाधिकाऱ्यांना दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. धरणगावात भाजपच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ बरखास्त झाले आहे. निवडणुकीला सामोरे न जाता सत्ता उपभोगायला मिळत आहे. यात शेतकऱ्याचा विचार कोठे आहे काय? त्याच्या प्रश्नांसंबंधी या सत्ताधारी मंडळींनी काही प्रयत्न केले आहेत काय? याचे उत्तर समाधानकारक येत नाही. शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडी यांचे प्रतिनिधी संचालक मंडळात आहेत, आदर्श अशी व्यवस्था आहे. पण बाजार समितीच्या बैठकांमध्ये कृषी उत्पादनाचे बााजारभाव, शेतकऱ्यांचा माल लवकर मोजणे, त्याला सुविधा मिळणे, फसवणूक टाळणे यासंबंधी चर्चेपेक्षा समितीच्या जागेवर व्यापारी संकुल, पेट्रोल पंप या आर्थिक विषयांमध्ये अधिक रस असल्याचे दिसून आले. हितसंबंधाला बाधा पोहोचविणाऱ्या सभापतीवर अविश्वास नाट्यसुध्दा अनेक ठिकाणी रंगले. हे सगळे शेतकऱ्यांच्या कळवळ्यासाठी आहे काय, असा प्रश्न पडतो.केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याचे समर्थक करताना भाजपचे नेते, मंत्री हे बाजार समित्यांमध्ये ई लिलाव योजना म्हणजे ई-नाम सुरू असून त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला कुठेही माल विकता येत असल्याचे ठासून सांगत होते. खान्देशात ही योजना पहिल्या टप्प्यात नंदुरबार व धुळे बाजार समित्यांमध्ये कार्यान्वित झाली. दुसऱ्या टप्प्यात शिरपूर, दोंडाईचा, चोपडा, शहादा व अमळनेर या पाच बाजार समित्यांमध्ये कार्यान्वित आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे काय? याविषयी आंदोलनाच्या १०० दिवसात समर्थक भाजप तर विरोधक महाविकास आघाडी, डावे पक्ष व शेतकरी संघटनांनी चित्र स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे जागतिक बँकेचा असलेला हा प्रकल्प खरोखर शेतकऱ्यांसाठी लाभाचा आहे किंवा नाही, हे शेतकऱ्यांना कळत नाही. या आंदोलनाला महाराष्ट्रात मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता बाजार समित्यांच्या कारभाराविषयी, कृषी व्यापाराविषयी शेतकरी समाधानी आहेत, असा अर्थ काढायचा का? आणि याच कळवळ्यापोटी आघाडीचे नेते बाजार समिती ताब्यात ठेवण्यासाठी धडपडत आहे, असे समजायचे काय?(लेखक हे लोकमतच्या जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)

 

टॅग्स :Jalgaonजळगाव