शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा घर घर की कहानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 03:47 IST

बिल्डर, राजकारणी आणि पालिका अधिकाºयांच्या संगनमतातून फोफावलेली अनधिकृत बांधकामे पुन्हा सर्वसामान्य नागरिकांच्या गळ््याला नख लावत आहेत.

धीरज परबबिल्डर, राजकारणी आणि पालिका अधिकाºयांच्या संगनमतातून फोफावलेली अनधिकृत बांधकामे पुन्हा सर्वसामान्य नागरिकांच्या गळ््याला नख लावत आहेत. आधी सुनावणी घेऊन १२ वर्षांनी बांधकाम अनधिकृत असल्याचे जाहीर करून पालिकेने काही रहिवाशांच्या डोक्यावरील छप्पराला हात घातला आहे. एखाद्या प्रभागात साधी भिंत उभारली तरी हप्ता मागायला येणारे एवढ्या इमारती उभ्या राहीपर्यंत, त्यांना सर्व सुविधा मिळेपर्यंत अनभिज्ञ होते यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यामुळे जर अनधिकृत इमारत पाडायचीच असेल तर ती उभी राहताना त्या प्रभागात असलेले अधिकारी, मुख्यालयातून या विभागाचा भार सांभाळणारे अधिकारी, बिल्डर, वास्तुविशारदांवर आणि त्यांच्या पाठिशी उभ्या राहिलेल्या राजकारण्यांवर आधी गुन्हे नोंदवायला हवेत...डोक्यावरचे छप्परच बेकायदा ठरवून ते तोडण्याची नोटीस आली तर रहिवाशांची काय, अवस्था होत असेल याची कल्पनाही करवत नाही. भार्इंदरच्या हंसा ‘बी’ इमारतीतील रहिवाशीही १२ वर्षांनी आलेल्या पालिकेच्या अशाच नोटिशीमुळे हादरले आहेत. मीरा-भार्इंदरमध्ये या आधीही इमारती, चाळींमधून रहिवाशांना बेघर करण्याचे प्रकार घडले आहेत. पण बेकायदा बांधकामांमध्ये कोट्यवधींचा मलिदा खाणाºया राजकारणी व पालिका अधिकाºयांना सर्वामान्य नागरिक उद््ध्वस्त होण्याचे दुख: अजिबात नाही. मुळात बेकायदा बांधकामे सुरू होण्यापासून त्याला संरक्षण देत सर्व सुविधा पुरवण्याची कामे हीच मंडळी करतात. आमदार, नगरसेवकांच्या बेकायदा बांधकामांना साधे भोकही कोणी पाडत नाही. पण सामान्य माणसांच्या बांधकामांवर निर्दयीपणे बुलडोझर चालवला जातो. त्यामुळे बेकायदा इमारती, चाळींमध्ये राहणाºयांवर बेघर होण्याची टांगती तलवार कायम आहे.बेकायदा बांधकामांचे शहर अशी मीरा-भार्इंदरची ओळख आजही कायम आहे. सत्ता कोणाचीही असो बेकायदा बांधकामे काही थांबलेली नाहीत. आता तर उलट बेकायदा बांधकामे एकीकडे वाढत असताना कारवाईचे प्रमाण मात्र नगण्य आहे. एक मात्र नक्की की स्वत:च्या राजकीय व आर्थिक सोयींनुसार अगदी ग्रामपंचायत काळातील काही जुनी बांधकामे मात्र मनमानीपणे तोडण्यात आली. वर्षांनुवर्षांची जुनी बांधकामे तोडताना अगदी इमारतीच्या कुंपणभिंतीही सोडल्या नाहीत. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडलेली बांधकामे तर दुप्पट व तिप्पट आकाराने वाढवण्यात आली.भार्इंदरच्या गोडदेव भागातील हंसा ‘ए’ या एकाच इमारतीला पालिकेची परवानगी असताना आरजीच्या जागेत हंसा ‘बी’ ही चार मजली इमारत उभी राहिली. २००५ मध्ये काम सुरू झालेल्या व २००६ मध्ये रहिवासी रहायला येईपर्यंत या बेकायदा इमारतीकडे पालिकेच्या एकाही अधिकाºयाचे तसेच नगरसेवकाचे लक्षच गेले नाही, हे कोणालाही पटणार नाही. बेकायदा बांधकाम असताना पालिकेने नळजोडणी दिली, वीजपुरवठा मिळाला, करआकारणी झाली, सर्व आवश्यक सुविधा मिळाल्या.तब्बल आठ वर्षांनी म्हणजेच २०१३ मध्ये अचानक ही इमारत बेकायदा असल्याचा पालिकेला साक्षात्कार झाला. नोटीस बजावून सुनावणी झाली. पण त्याचा निर्णय मात्र जानेवारी २०१७ मध्ये दिला गेला. १२ वर्षांनी इमारत बेकायदा असल्याचे घोषित करून रहिवाशांना ती १५ दिवसांत स्वत: पाडा अन्यथा, आम्ही तोडतो, असा आदेश पालिकेने दिला आहे.मात्र, बेकायदा बांधकाम करणारा बिल्डर, वास्तूविशारद मोकाटच आहे. त्या काळात त्या प्रभागात असलेल्या आणि मुख्यालयातून हा विभाग सांभाळतबेकायदा बांधकामाला संरक्षण देणाºया तसेच वीज, पाणी आदी पुरवणाºया पालिका व रिलायन्सच्या अधिकाºयांवर काहीच कारवाई होणार नाही. सदनिका खरेदीसाठी आयुष्याची कमाई रहिवाशांनी ओतली आहे. कोणी ३० लाख, कोणी २५ लाख अशी कर्जे माथ्यावर घेऊन त्याचे हप्ते फेडत आहेत. साडेसहा कोटींचे एकूण कर्ज या सदनिकाधारकांवर आहे.हा काही शहरातील पहिलाच प्रकार नाही. या आधी बेकायदा बांधकामांचा माफिया म्हणून ओळखल्या जाणाºया ओस्तवाल बिल्डरची शिवार उद्यानासमोरील ओस्तवाल पॅरेडाईज ही भली मोठी ७ मजली बेकायदा इमारतही रहिवाशांना सक्तीने बाहेर काढून तोडण्यात आली. त्यात राहणाºया रहिवाशांनीही लाखोंचे कर्ज घेतले होते. पालिकेने सर्व सुविधा तर रिलायन्सने वीजपुरवठा केला होता. परंतु, प्रशासनात एकमेकांचे उट्टे काढण्याच्या नादात इमारतीवर हातोडा मारण्यात आला. मात्र, इमारतीचा सांगाडा आजतागायत तसाच उभा आहे.घर अधिकृत आहे का अनधिकृत? हे कळायला कोणताच मार्गच नसतो. फ्लॅट खरेदी करताना बिल्डरने दिलेल्या कागदपत्रांवर कर्ज मंजूर झाले की इमारत अधिकृत, असा भाबडा समज लोकांचा झालेला आहे. बिल्डरकडून कागदपत्रे मागवून त्याची पडताळणी करण्याची सोयच नाही. बँकाही त्याची शहानिशा करत नाहीत. पालिकेत माहिती घ्यायला गेले की अधिकारी केवळ सर्व्हे क्रमांक विचारतात. पण नागरिकांना त्याचीच माहितीच नसते. पालिकाही बेकायदा बांधकामांची माहिती त्याचवेळी जाहीर करण्याचे टाळते. इमारतीवरही तसा फलक लावला जात नाही. हे सर्वकाही संगनमतानेच झालेलेअसते.शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली व आजही राजरोस सुरू आहेत. इमारती, चाळी, झोपड्या, अनैतिक व्यवसाय चालणारे बार- लॉज, व्यावसायिक गाळे, बंगले आदी मोठ्या प्रमाणात बेकायदा आहेत. सरकारी व पालिकेच्या मालकी जागेत तसेच आरक्षणांच्या जागेतही अगदी झोपड्या- चाळींपासून इमारतीच्या इमारती उभ्या आहेत.बांधकाम करायचे असेल तसेच त्याच्यावर कारवाई टाळायची, असेल अगदी चौरस फुटाने पैसे खाणारेही आहेत. राजकारणी, अधिकारी या शिवाय तथाकथित समाजसेवकांनाही बेकायदा बांधकामे म्हणजे बक्कळ पैसा कमावण्याचा सहज सुलभ मार्गच बनलेला आहे. बेकायदा बांधकामप्रकरणी लाच घेताना काही नगरसेवक, अधिकारी रंगेहाथ पकडले गेले आहेत. परंतु, त्यांना चाप बसवला जात नाही. कारण सारेच बरबटलेले, मग कोण कुणाच्या अंगावरचा चिखल साफ करणार?खटले रेंगाळण्यातच अनेकांचे हितअनेक बांधकामे तर न्यायालयाचा ‘जैसे थे’ वा ‘स्थगिती आदेश’ या नावाखाली भराभर बांधून पूर्ण केली जातात. पालिकेचा विधी विभाग बेकायदा बांधकामांचे खटले निकाली काढण्यापेक्षा, रेंगाळत ठेवण्याचे काम करतो. बेकायदा बांधकामे उभारून ती विकून बिल्डर, माफिया मोकळे होतात. पण विधी विभाग मात्र तारीख पे तारीख ढकलत राहतो. कारण बेकायदा बांधकामांचा मलिदा तेथेही पोचवला जातो.मग काही वर्षांनी न्यायालयाचा आदेश अनधिकृत बांधकामांविरोधात लागतो आणि पुन्हा नोटिसा बजावण्याची खानापूर्ती केली जाते. रहिवाशांच्या मानगुटीवर मग अनधिकृत बांधकामाचे भूत कायमचे राहते. त्यात त्यांचे लाखो रुपये खर्ची पडतात. न्यायालयाने अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले तरी त्यावर सोयीनुसार कारवाई केलीच जात नाही. अशा बांधकामांमध्ये घरे किंवा गाळा खरेदी करणाºयांना राजकारण्यांकडे धाव घ्यावी लागते. आणि मतांसाठी पुन्हा अनधिकृत बांधकामांना राजकीय संरक्षणही मिळत राहते. राजकारण्यांचा तर अनधिकृत बांधकाम बांधताना आर्थिक फायदा होतोच, शिवाय अनधिकृत बांधकाम वाचवण्यात हक्काची वोट बँकदेखील तयार होते.सत्ताधाºयांना वेगळा न्यायसत्ताधारी नेत्याचा राजाश्रय लाभलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई तर सोडा; पालिका अधिकारी कितीही तक्रारी आल्या तरीसुद्धा त्याकडे ढुंकून पहात नाहीत. पण त्याच नेत्याने फर्मान सोडले, की पालिका अधिकारी त्याचे लागलीच पालन करत फर्मानानुसार इतरांवर कारवाई करतात. निवडणुकीच्या काळात विकास आराखड्याचा ढोल बडवण्याचे काम पालिका व सत्ताधारी करत असले; तरी शहराच्या नियोजनबध्द विकासाचा बट्ट्याबोळ करणाºया अनधिकृत बांधकामांकडे मात्र सर्रास डोळेझाक केली जाते. कारण अनधिकृत बांधकामांमधून झटपट व मोठ्या प्रमाणात काळा पैसा मिळतो. त्यामुळे असल्याने शहराचे वाटोळे झाले तरी चालेल, सर्वसामान्य नागरिक उद््ध्वस्त झाला तरी पर्वा नाही. पण आमच्या तिजोºया ओसंडून वाहायला हव्यात, हाच फंडा राजकारणी व पालिका अधिकाºयांचा आहे. अनधिकृत बांधकामांमध्ये घरे, गाळे घेऊन फसगत झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना डोक्यावर कायम कारवाईची टांगती तलवार घेऊन जगावे लागत आहे.