शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

एका वादळाला घर हवं होतं..!

By admin | Updated: December 10, 2014 23:32 IST

शब्दांचा वापर इतक्या झंझावती पद्धतीने करता येतो आणि एक तथाकथित, सुसंस्कारित आयुष्यापलीकडे एक धगधगतं जीवन असतं, याचं महाकाय दर्शन खोतांच्या लेखणीने घडविलं.

तरुण पिढीतील माङयासारख्या लेखकांना एक दिशा देण्याचे काम आणि स्वप्नांच्या पलीकडे वास्तवात नेण्याचे काम खोतांसारखे साहित्यिक आणि त्यांची योग्य ती पाठराखण करणा:या दुर्गा भागवत करीत होत्या, हे आज सांगावसं वाटतं.
साधारण 1972-73 साली महाविद्यालयीन वर्ष वा्मयीन उत्साहात आम्ही जगत होतो. एकीकडे ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, पु. भा. भावे, अरविंद गोखले यांची त्या मानाने ‘रोमँटिक’ पुस्तके वाचताना आमचे मध्यमवर्गीय मन सुखावत होते आणि शब्दांच्या -सौंदर्याच्या गुळगुळीत कल्पना मनात रुजत पडल्या होत्या. अशाच वेळी चेंडूने लगोरीच्या फरशा उद्ध्वस्त व्हाव्यात असं भन्नाट नाव वाचनात आलं ते म्हणजे चंद्रकांत खोत..! माङया मध्यमवर्गीय सुखवस्तू विश्वाला हे सगळंच चकित करणारं होतं. शब्दांचा वापर इतक्या झंझावती पद्धतीने करता येतो आणि एक तथाकथित, सुसंस्कारित आयुष्यापलीकडे एक धगधगतं जीवन असतं, याचं महाकाय दर्शन खोतांच्या लेखणीने घडविलं.
एकाच वेळी किरण नगरकर, भाऊ पाध्ये अशी तेवढय़ाच ताकदीने लिहिणारी नावंही ‘त्या’ लेखणीच्या कुटुंबातली होती. ‘उभयान्वयी अव्यय’ असो वा ‘बिनधास्त’ यांच्यातल्या अश्लीलतेबद्दल जे मनात असते, पण शब्दांत लिहिण्याचीही गरज असते, असे कातडीखालच्या वासनांचे जग याचे वस्तुनिष्ठ दर्शन सर्वप्रथम माङया पिढीला कळले ते चंद्रकांत खोत, भाऊ पाध्ये यांच्यामुळेच. मनात गोंधळ उडायचा, कारण आम्ही तेव्हा 17 ते 18 वर्षाचे डोक्यात स्वप्न आणि मनात मोरपिस घेणारे. परंतु त्या स्वप्नांचा फिजूलपणा दाखविणारे रेडलाइट एरिया, स्त्री-पुरुष नात्यांमधील अलिखित ‘अधोरेखिते’ मांडण्याचे धाडस खोतांचे लेखन करीत होते.
एकीकडे या साहित्यातील वा्मयीन विश्वावर प्रश्नचिन्ह करणारे लेखक आणि दुसरीकडे विशेष आश्चर्याची गोष्ट अशी दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंत, लेखिका खोतांच्या लेखणीची पाठराखण करताना दिसत होत्या. चंद्रकांत खोत हे अनेक कारणांनी ‘वादळी’ होत गेले, हे मला जाणवून गेलं. कारण ते जीवनच भन्नाट जगत होते, याचा अनुभव मी घेतला. ‘बिनधास्त’, ‘विषयांतर’ इ. पुस्तकांमुळे त्यांच्याबद्दल निर्माण झालेले वा्मयीन आकर्षण त्यांच्या भेटीत रूपांतरित झाले. जेव्हा मी लालबाग-परळमधील त्यांच्या घरी गेलो, तेव्हा लेखक असा जगू शकतो, राहू शकतो हे पाहूनच मी आश्चर्यात बुडालो. कारण जेमतेम अर्धी खोली, हात लागेल तिथे पुस्तक, झोपण्यापुरतीही जागा नाही आणि हिमालयात एखाद्या भटकणा:या अवलियाप्रमाणो अत्यंत उन्मुक्त प्रवाही व्यक्तिमत्त्व, दिसायला अत्यंत आकर्षक, रंग गौर आणि वर्षानुवर्षे मैत्री असावी असा मोकळेपणा. त्यांच्या आसपास आणखी एक वादळ घोंगावत होतं. एका प्रसिद्ध सिनेनाटय़-अभिनेत्रीची त्यांच्याशी असलेल्या नात्याची चर्चा हे एक गूढ आकर्षण होतं. नखशिखान्त प्रेम केलेला आणि प्रेमासाठी सर्वस्व उधळून देऊन अक्षरश: ‘कफल्लक’ झालेला एक लोकविलक्षण एकाकी प्रियकर मला त्यांच्यात दिसला. म्हणजे खोतांचे चाळ, झोपडपट्टी, दारिद्रय़, स्त्री-पुरुष संबंध, पुरुषी नजरांचे आक्रमक आडाखे टिपणारं धगधगते लेखन हे त्यांचे वा्मयीन जग एकीकडे, तर नंतर बदलत गेलेले जगण्याचे उन्हाळे-पावसाळे सोसून हलकेच सखोल विरक्त झालेले खोत मी पाहिले.
त्यानंतर खोतांचे जीवन आणि साहित्य फार बदलून गेले आणि हे बदल त्यांच्या पूर्ण कलाकृतीत दिसून आले. समाजाशी नाळ जोडलेला एक लेखक, दरिद्री, उपेक्षित समाजाशी रक्ताचे नाते जोडलेला लेखक, हातात एकही पैसा नसताना एकीकडे लघू अनियतकालिकांची चळवळ चालवत होता. ‘अबकडई’सारखा दिवाळी अंक जो वा्मयीन विश्वाला दिशा देणारा अंक हा लेखक संपादित करीत राहिला. त्याचवेळी ‘घर देता का घऱ़़’ असे म्हणत शासनदरबारी उंबरठे ङिाजवत राहिला. सगळ्य़ात असूनही कुणातही नसलेला हा लेखक, माणूस खरंतर आरती प्रभू यांच्या कवितेसारखा ‘कधी कुणाला कळलाच नाही..’
सनातन दु:खाशी असलेले त्यांचे नाते आपल्या रक्तामांसात तो पचवत राहिला. उपेक्षेचा लाव्हा सोसत हा एक भन्नाट अवलिया चक्क ‘रामकृष्ण परमहंस’ आणि ‘स्वामी विवेकानंद’  यांच्यासारख्या विरक्त ज्वालांचा शोध घेत राहिला. ‘बिंब-प्रतिबिंब’, ‘दोन डोळे शेजारी’ या शोधयात्रेचा महोत्सव आहे. या कलाकृतींवर आधारित चित्रपट मालिकेच्या स्वरूपात लेखन करावे, म्हणून मी व दिग्दर्शक राजदत्त यांच्यासह त्या काळात अनेक प्रकारचे परिश्रम केले. त्यानिमित्ताने भगिनी निवेदिता आणि स्वामी विवेकानंद यांच्यातील एक आध्यात्मिक मैत्र कसे शब्दांपलीकडे जाऊ शकते, याचे जे अनोखे दर्शन खोत यांनी घडवले, त्याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. खरोखर ‘बिनधास्त’ लिहिणारे खोत कुठे आणि अनुभूतीचा लंबक आसक्तीच्या पलीकडे नेऊन ठेवणारे खोत कुठे? एका माणसामधील लेखकाचा प्रवास आधुनिक मराठी साहित्यात असा दुर्मीळ आहे.
खोतांनी वादळाप्रमाणो जीवन अंगावर ङोलले. सर्व जगाशी नाते जोडले, पण तरीही खोलवर ते एकाकीच राहिले. अगदी महिना-दीड महिन्यापूर्वी त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवशी त्यांची ‘ग्रंथतुला’ होताना ग्रंथांच्या पलीकडे, स्वत: वजन म्हणून बसलेले खोत पाहिले तेव्हा ‘साहित्याचे वजन मोठेच, पण शरीराचे वजनही मोठे झालेले’ दिसले. पांढरी शुभ्र दाढी, गो:या गालाचा लाल रंग आणि व्यासपीठावर ताजेतवाने, टिप्पणी करणारे चंद्रकांत खोत आम्ही अनुभवले. दु:ख याचे वाटते, आयुष्याच्या उत्तरार्धात इतक्या महान साहित्यिकाला ज्या महाराष्ट्रात मराठीचा आणि साहित्याचा सन्मान होतो, त्यात एक भिंतीचे घर मिळावे म्हणून प्रयत्न यशस्वी होत असतानाच या वादळाने डोळे मिटले आणि वेगळ्य़ा अर्थाने हे वादळ विश्वाच्या घरात विलीन झाले. 
आज हुरहुर वाटते, जे वादळ मराठी साहित्याच्या भिंती हादरून टाकणारे ठरले, ते वादळ असं चुपचाप का बरं निघून गेलं? जणू चंद्रकांत खोत नावाच्या झंझावाताला कुशीत घेणो घरालाच परवडणारे नव्हते का? हा प्रश्न  धुमसतच राहील आणि विचारत राहील ‘एका वादळाला घर हवं होतं, पण त्या घराचंच आता वादळ झालं..’
 
प्रवीण दवणो
ज्येष्ठ साहित्यिक