शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
नागपंचमी २०२५: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

उत्थानाचा मार्ग दाखवणारे वादळ शमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 02:40 IST

डॉ. गंगाधर पानतावणे गेल्याचे वृत्त ऐकले आणि मॉरिस कॉलेजच्या प्रांगणात शोधमग्न अवस्थेत बसलेल्या विद्यार्थीदशेतील गंगाधरपासून तर विद्रोहाच्या वाटेने उत्थानाचा मार्ग दाखवणाऱ्या

डॉ. गंगाधर पानतावणे गेल्याचे वृत्त ऐकले आणि मॉरिस कॉलेजच्या प्रांगणात शोधमग्न अवस्थेत बसलेल्या विद्यार्थीदशेतील गंगाधरपासून तर विद्रोहाच्या वाटेने उत्थानाचा मार्ग दाखवणाऱ्या प्रगल्भ पानतावणेंपर्यंतचा त्यांचा संपूर्ण प्रवास नजरेखालून तरळून गेला. पानतावणेंबाबतच्या सर्व आठवणी इतक्या ताज्या आहेत, वाटतं हे सर्व काल-परवाच घडलंय. आताची वसंतराव नाईक शिक्षण संस्था म्हणजे तेव्हाचे मॉरिस कॉलेज. मी या कॉलेजात शिकत असताना पानतावणे मला दोन वर्षे ज्युनिअर होते. नवमतवादी तरुणांच्या सामाजिक, सांस्कृतिक चळवळींमध्ये सहभागाचा तो भारावलेला काळ होता. त्यातही मॉरिस कॉलेज या चळवळीचे जणू केंद्रबिंदू झाले होते. वि.भि. कोलते, कवी अनिल देशपांडे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या मराठी विभागाच्या शारदा मंडळाचा मोठा बोलबाला होता. कवी गे्रस, पानतावणे हे एकाच वर्गात शिकणारे. महाराष्ट्रातील मोठमोठ्या साहित्यिक-विचारवंतांना बोलावून त्यांचे व्याख्यान आयोजित करणे, विविध सामाजिक विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद आयोजित करणे असे उपक्रम या शारदा मंडळात नियमित सुरू असायचे. यात पानतावणेंचा पुढाकार हमखास असायचा. या विविध उपक्रमातूनच पानतावणेंंच्या विचारांची दिशा स्पष्ट होत गेली. पानतावणे मूळचे नागपूरचेच. पाचपावलीतील बारसेनगरात त्यांचा जन्म झाला. वर्णव्यवस्थेने जातीधर्माच्या आधारावर जी सामाजिक उतरंड निर्माण करून ठेवली होती, त्या उतरंडीचा फटका त्यांनाही सोसावा लागला. मानसिक गुलामगिरीतून दलित समाज मुक्त होऊ पाहत असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून तो तेजस्वी होत असताना ज्या तरुण दलित पिढीने वैचारिक अस्पृश्यतेचा अंधार नाकारला त्या तरुण पिढीचा एक भाग पानतावणेही होते. त्यामुळे वरून अतिशय शांत, संयमी दिसणाºया पानतावणेंच्या हृदयातही विद्रोहाचे विचार आकार घ्यायला लागले. पुुढे त्यांना नोकरीच्या निमित्ताने औरंगाबादला जावे लागले. मिलिंद महाविद्यालयात असताना अस्मितादर्श नियतकालिकाचा विचार त्यांच्या मनात आला. एकेक व्यक्ती सुसंगत व्हावी आणि त्यातून सुसंगत व्यक्तींचा समूह तयार व्हावा; म्हणजे त्या त्या गणसमाजाची उन्नती होईल, हा तो विचार होता. पानतावणेंच्या विचारांचे अधिष्ठानच मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते आणि बाबासाहेबांनाही असाच उन्नत गणसमाज अपेक्षित होता. असा समाज घडविण्यासाठीचे समर्थ माध्यम म्हणून पानतावणेंनी अस्मितादर्श जन्माला घातले. आमच्यासारख्या अनेकांच्या लेखन्यांना अस्मितादर्शने मोठे बळ दिले. मला अजूनही चांगले आठवते. अमेरिकन संशोधक एलिनॉर झेलिएट, गेल आॅमवेट, अनुपमा राव काही खास विषयांवरील अस्मितादर्शतील लेखनाचा अभ्यास करण्यासाठी नागपूरला वसंत मून यांच्या ग्रंथालयात येते होते. अस्मितादर्श हे शुद्रातिशुद्रांच्या मुक्ती चळवळीचा दस्तऐवज ठरले असून, हा दस्तऐवज जन्माला घालण्याचे महान कार्य डॉ. पानतावणे यांनी केले. त्यांंच्या जाण्याने जे नुकसान झाले ते कशानेही भरून निघणारे नाही, हे खरे पण, त्यांच्या चळवळीचा वेग मात्र थांबायला नको याची काळजी पानतावणेंचा वैचारिक वारसा पुढे चालविणाºया पिढीने घेणे गरजेचे आहे. पण, त्यासाठी सर्वात आधी परस्परातील हेवेदावे-व्यक्तिगत अहंकार बाजूला ठेवावा लागेल. नवीन पिढीने पुढे यावे आणि पानतावणेंची वैचारिक पताका आपल्या खांद्यावर घेऊन समाजातील शेवटच्या माणसाची अस्मिता जागविण्यासाढी पुढाकार घ्यावा; कारण हीच खरी पानतावणेंना श्रद्धांजली ठरेल.- कुमुद पावडे(सामाजिक कार्यकर्त्या)

टॅग्स :Dr.Gangadhar Pantawaneडॉ. गंगधर पानतावणे