शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

एकारणारे संस्कार थांबवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 00:16 IST

ज्या वयात धार्मिक व सामाजिक सलोख्याचा व एकोप्याचा संस्कार घडवायचा त्या वयात मुला-मुलींवर आपापले धर्म व सामाजिक प्रथांचे वेगवेगळे संस्कार लादण्याचा उद्योग समाजात ऐक्य निर्माण करील की दुरावा?

ज्या वयात धार्मिक व सामाजिक सलोख्याचा व एकोप्याचा संस्कार घडवायचा त्या वयात मुला-मुलींवर आपापले धर्म व सामाजिक प्रथांचे वेगवेगळे संस्कार लादण्याचा उद्योग समाजात ऐक्य निर्माण करील की दुरावा? राज्यातील शाळांमधून भगवद्गीतेचे वाटप करण्याचा काही संस्थांनी सरकारच्या मदतीने चालविलेला प्रयत्न अशा प्रश्नांना जाग आणणारा आहे. गीता हा हिंदूधर्माचा पवित्र ग्रंथ आहे आणि त्यावर गेल्या अनेक शतकांच्या ज्ञानाच्या परंपरा विकसित झाल्या आहेत. या ग्रंथाविषयी हिंदू मुला-मुलींना प्रेम, भक्ती व आपलेपणा वाटावा ही गोष्टही स्वाभाविक आहे. मात्र धार्मिक शिक्षण न देण्याच्या आपल्या घटनेच्या धर्मनिरपेक्ष संकेतांशी हा प्रकार जुळणारा नाही. सरकारी शाळांमधून धर्म शिकविला जाणार नाही आणि सरकारच्या मदतीने चालणाऱ्या शाळांमध्ये त्याविषयीची सक्ती केली जाणार नाही असे वचन घटनेतील धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराने जनतेला दिले आहे. या स्थितीत सरकारच एका, तो मग बहुसंख्याकांचा धर्म का असेना, धर्माच्या ग्रंथाचे वाटप विद्यार्थ्यांत करीत असेल तर तो प्रकार घटनाविरोधी व स्वातंत्र्याच्या अधिकाराला बाधा पोहचविणारा ठरेल की नाही? त्याहून महत्त्वाचा प्रश्न हा की उद्या एखाद्या मुस्लीम संघटनेने किंवा काश्मीरच्या प्रशासनाने आपल्या शाळांमधून पवित्र कुराणाच्या प्रतींचे असे वाटप केलेले सरकारला चालेल काय? अरुणाचल, मेघालय, नागालॅण्ड, मणिपूर व त्रिपुरा ही ख्रिश्चनबहुल राज्ये आहेत. त्यातील शाळांमधून उद्या बायबलचे असे वाटप झाले तर सरकार काय करील? हा निर्णय केंद्राचा की महाराष्ट्राचा? तो जर केंद्राचा असेल तर त्याचा अंमल मणिपूर व नागालॅन्डमधील सरकारांनाही करावा लागेल व तेथील राज्ये ते करणारच नाहीत याची खात्री कोण देईल? प्रत्यक्ष महाराष्ट्रात मुस्लीम धर्माच्या संस्थांनी शाळा व कॉलेजेस काढली आहेत. त्यात कुराणाचे वाटप झालेले महाराष्ट्र सरकारला चालेल काय? जगातील अनेक प्रगत देशांनी त्यांच्या शिक्षण संस्था भारतात आणायला सुरुवात केली आहे. त्या संस्थांनी बायबल, तोराह किंवा कुराण यांचे वाटप केले तर ते भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाला चालेल काय? सरकारमार्फत अशा ग्रंथांचे वाटप होत नाही असे याबाबत सांगितले जात असले तरी त्या या वाटपाला सरकारची परवानगी आहे की नाही? हे ग्रंथ संस्थांच्या संचालकांकडे दिले जातात व त्यांनीच त्याचे योग्य ते वाटप करून त्याविषयीचा अहवाल सादर करावा ही बाबही सरकारी सहभाग दाखविणारी आहे की नाही? प्रश्न गीतेचा आहे म्हणून याची चर्चा नाही व कदाचित पुढेही ती होणार नाही. मात्र ही सुरुवात बायबल व कुराणापासून झाली असती तर आपल्यातल्या बहुबोल्या व भांडखोर संघटना गप्प राहिल्या असत्या काय? आपल्यातील हवे ते चालू द्या. त्यावर कुणी आक्षेप घेत नाही तोवर गप्प बसा आणि उद्या कुणी याविषयी बोलू लागले तर आम्ही आहोतच हा अशा संघटनांचा पवित्रा आता साºयांच्या परिचयाचा झाला आहे. त्यामुळे असे प्रयत्न मुळातच थांबविले पाहिजेत. ते सरकारनेच थांबविले पाहिजे. एखादी बाहेरची संस्था सरकारी वा निमसरकारी संस्थांमध्ये येऊन आज अशी पुस्तके वा ग्रंथ वितरित करू लागली तर ती उद्या प्रचारी साहित्याचे वाटपही करील की नाही? ज्या वयात मुलांवर सर्वसमावेशकतेचा व राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार करायचा त्या काळात एका धर्माचा, पंथाचा वा विचाराचा प्रचार त्यांच्यात करणे ही बाब एकात्मतेला बाधा आणणारी आहे. गीता आहे म्हणून तिला कदाचित कुणी विरोध करणार नाही. कारण मग अशा विरोधकांना धर्मविरोधी ठरविता येईल हा राजकीय फायदाही अशा प्रयत्नांमागे नसेलच असे कोण खात्रीने सांगू शकेल? तात्पर्य, हा विस्तवाशी खेळ आहे. तो कोण सुरू करतो व त्याकडे कोण दुर्लक्ष करतो त्या साºयांना याबाबतचा जाब सरकारने व सर्व संबंधित जबाबदार व्यवस्थांनी मागितला पाहिजे. ही सुरुवात आहे. ती येथेच थांबली पाहिजे. अन्यथा अशा व्यवहारांचा काळ सोकावत जातो व तो देशव्यापी होतो. तसे होणे या देशाच्या ऐक्याला घातक आहे हे येथे लक्षात घ्यायचे.