शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

ब्रिज कोर्ससाठी अद्याप ८ ते १० दिवसांची प्रतीक्षा; काम अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 08:32 IST

पुढील वर्गात प्रवेश करताना आणि नवीन अभ्यासक्रम शिकताना विद्यार्थ्याच्या मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का, हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकविण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करेल असे टेमकर यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आता आठवडा पूर्ण व्हायला आला, मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातील विद्यार्थ्यांचा लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळांना उपलब्ध करून देण्यात येणार असलेला ब्रीज कोर्स अद्यापही उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे या दिवसांत विद्यार्थ्यांची उजळणी नेमकी कशी करून घ्यायची, याच संभ्रमात मुख्याध्यापक आणि शिक्षक आहेत. दरम्यान ब्रीज कोर्सचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या ८ ते १० दिवसांत दुसरीपासूनच्या विद्यार्थ्यांना ब्रीज कोर्स अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एससीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

पुढील वर्गात प्रवेश करताना आणि नवीन अभ्यासक्रम शिकताना विद्यार्थ्याच्या मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का, हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकविण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करेल असे टेमकर यांनी स्पष्ट केले.लॉकडॉऊन काळात ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक फटका बसल्याचे दिसून आले. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादेमुळे निर्माण झालेली शैक्षणिक पोकळी भरून काढण्यासाठी हा ब्रिज कोर्स तयार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक इयत्तेचा विषयनिहाय असणारा हा ब्रिज कोर्स ४५ दिवसांचा असणार असून १ ऑगस्टपासून शिक्षक हे विद्यार्थ्यांना पुढील वर्गातील अभ्यासक्रम शिकवायला घेऊ शकतील. यामध्ये गणित आणि विज्ञान या दोन विषयांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

nहा ब्रिज कोर्स सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा सर्व शाळांसाठी असेल. राज्य शिक्षण मंडळाच्या प्रत्येक शैक्षणिक व्यवस्थापनाला ब्रिज कोर्स शिकवण्याच्या सूचना शिक्षण विभाग देणार असल्याचे दिनकर टेमकर यांनी सांगितले.

जुनी पुस्तके ठेवायची की परत करायची ?पुढील दीड महिना ब्रिज कोर्समार्फत उजळणी होणार असेल तर जुनी पुस्तके शाळांमध्ये द्यायची का, असा संभ्रम पालक, विद्यार्थ्यांमध्ये आहे. मात्र ब्रिज कोर्स मार्फत घेतल्या जाणाऱ्या उजळणीसाठी पुस्तकांची गरज असेलच असे नाही. शिक्षक विविध संकल्पना व शिकवण्यांतून विद्यार्थ्यांची उजळणी घेऊ शकणार असल्याचे टेमकर यांनी स्पष्ट केले.