शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

... हा तर राजकीय आत्मघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 16:41 IST

भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर डॉ.संजीव पाटील यांची त्या पदावर झालेली निवड हा घटनाक्रम अनपेक्षित नसला तरी सत्ताधारी बनलेल्या पक्षातील अंतर्गत खळबळ दर्शविणारा आहे

मिलिंद कुलकर्णीभाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर डॉ.संजीव पाटील यांची त्या पदावर झालेली निवड हा घटनाक्रम अनपेक्षित नसला तरी सत्ताधारी बनलेल्या पक्षातील अंतर्गत खळबळ दर्शविणारा आहे. वाघांची शिकार केल्याचा आव कुणी आणत असले तरी मुळात वाघ यांचा हा राजकीय आत्मघात आहे, असेच म्हणावे लागेल.राजकीय पक्षांमध्ये सदासर्वकाळ एका नेत्याची सत्ता अबाधीत राहत नाही. काळ, परिस्थिती बदलत जाते, तसे नेतृत्वाचेही होत जाते. चाणाक्ष नेते परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊन हालचाली करतात, स्वत: बदलतात किंवा बंडाचा झेंडा हाती घेऊन परिस्थिती अनुकूल बनवितात. हल्ली बंडाचा झेंडा घेऊन परिस्थिती बदलण्याएवढी ताकद नेत्यांमध्ये राहिलेली नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथराव खडसे या नेत्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला, पण फारसे यश हाती लागले नाही. ही पार्श्वभूमी पाहता स्मिता आणि उदय वाघ या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या उच्चशिक्षित दाम्पत्याकडून मोठ्या अपेक्षा असताना असे घडणे दुर्देवी आहे. मूळात राजकारणात एखाद्या दाम्पत्याची यशस्वी वाटचाल हा दुर्मिळ योग असतो. स्व. शरद्चंद्रिकाआक्का व डॉ.सुरेश पाटील, स्व.गोजरताई व रामरावदादा पाटील, प्रतिभाताई पाटील व डॉ.देवीसिंह शेखावत ही सन्माननीय उदाहरणे खान्देशात आहेत. महिलांसाठी आरक्षणाची तरतूद नसताना या महिला नेत्यांनी स्वकर्तृत्वाने राजकारणात स्वत:चा ठसा उमटविला. त्यांच्या यशात पतीसह संपूर्ण कुटुंबियांचेही मोठे योगदान होते, हे नाकारुन चालणार नाही.अलिकडे महिलांसाठी आरक्षणाची तरतूद झाल्यानंतर अनेक महिला नेत्यांनी राजकारणात सक्रीय सहभाग नोंदविला असला तरी त्यात राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील महिलांची संख्या मोठी आहे. वाघ दाम्पत्यामध्ये आमदार स्मिता वाघ यांचे तसे नाही. उदय आणि स्मिता वाघ या दोघांनी विद्यार्थी चळवळीपासून सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. स्वकर्तुत्वावर दोघांनी यश मिळविले. स्मिता या भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांपासून प्रदेशाध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, विधान परिषद सदस्य अशी वाटचाल राहिली. उदय वाघ यांनी ग्रामपंचायत, जिल्हा बँक संचालक, बाजार समिती सभापती या पदांपासून जिल्हाध्यक्षपदाची दुसरी कारकिर्द अशा चढत्या भाजणीने यश मिळविले.विद्यार्थी परिषद, रा.स्व.संघ यांची पार्श्वभूमी असल्याने या दोन्ही नेत्यांनी उत्तम जनसंपर्क आणि नेत्यांशी ऋणानुबंध जोडले. त्यामुळे विधान परिषदेची उमेदवारी असो की, लोकसभेची...अनेकांना मागे सारत त्यांनी ही कामगिरी बजावली होती. विशेषत: एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष या नात्याने उदय वाघ यांनी संघटनेची सूत्रे यशस्वीपणे हाताळली. जिल्हा बैठकांमधील वादळी चर्चा, प्रशिक्षण कार्यशाळांवर मुक्ताईनगर, बोदवड शाखांचा बहिष्कार अशा प्रसंगातून वाट काढत वाघ यांनी संघटनात्मक कार्यावर परिणाम होऊ दिला नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पालिका आणि आता लोकसभा निवडणुकीत भाजपच्या यशाची कमान चढती ठेवण्यात जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचे योगदान नजरेआड करता येणार नाही.परंतु, एकीकडे यश मिळत असतानाच संघटनेत एकाधिकारशाही, घराणेशाही, आरोप यांची मालिकादेखील सुरु झाली. विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रिपद आल्यानंतर वाघ दाम्पत्याचे वजन स्वाभाविकपणे वाढले. पाटील यांच्याशी घनिष्टता असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यापासून मात्र दुरावा निर्माण होऊ लागला. महाजन यांचे मुख्यमंत्र्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, संकटमोचक म्हणून निर्माण झालेली प्रतिमा, पक्षातील वाढलेले वजन लक्षात घेता हा दुरावा ठेवणे अयोग्य होते. आधी खडसे दुरावले असताना जिल्ह्यातील महाजन गटापासून अंतर राखणे हे वाघ दाम्पत्याला महागात पडले. लोकसभेची उमेदवारी मिळविताना महाजन यांना विश्वासात न घेतल्याने त्याचे परिणाम दिसून आले. अमळनेरात माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांना झालेली मारहाण वाघ यांच्या राजकीय आत्मघाताला कारणीभूत ठरली. पक्षसंघटनेत काम करताना प्रत्येकवेळी मनासारखे होतेच असे नाही, श्रध्दा आणि सबुरी हे गुण दीर्घकाळाच्या राजकारणाच्यादृष्टीने यशाचे गमक असतात. पक्षाने यापूर्वी भरभरुन दिलेले असताना काहीवेळा दिलेला नकार पचविण्याची ताकद, मनाचा मोठेपणा ठेवायचा असतो. तसे न घडल्याने अशी वेळ येते. राजकारण किती निर्दयी असते याचा अनुभव या प्रकाराने अधोरेखीत झाला. उमेदवारी कापली गेल्यानंतर ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ असे जे वर्णन वाघ दाम्पत्याने केले होते, त्याची प्रचिती त्यांच्या राजीनाम्याने पुन्हा एकदा आली.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव