शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांशी भेट हा प्रारंभ ठरावा!

By यदू जोशी | Updated: November 6, 2017 02:52 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परवा राळेगण सिद्धीला जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटले. तेथील सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परवा राळेगण सिद्धीला जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटले. तेथील सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांनी केले. महाराष्ट्रात समाजसेवेची अखंड ऊर्जाकेंद्रे असलेल्या काही संस्था आणि स्वकर्तृत्वाने स्वत:च एक संस्था बनलेल्या मान्यवर व्यक्तीदेखील आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटून त्यांच्या कार्याचा पॅटर्न शासनाच्या सहकार्याने अन्यत्र राबविता येईल का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले सातारा जिल्ह्याचे. त्यांनी आपल्या संस्थेत विदर्भ, मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या मुलांचे संगोपन चालविले आहे. नागपूरचे रामभाऊ इंगोले या फकिराने वेश्यांच्या मुलांसाठी प्रचंड कार्य उभे केले. कुष्ठरोग्यांची अव्याहत सेवा करणारे आमटे कुटुंब आणि आदिवासींच्या सेवेत हयात व्यतित करीत असलेले बंग कुटुंबीय तर दीपस्तंभ आहेतच. शेकडो रुग्णांना मुंबईत आश्रय देणाºया गाडगेबाबा धर्मशाळेचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख आहेत. मेळघाटच्या आदिवासींसाठी देवदूत असलेले डॉ.रवींद्र कोल्हे, स्मिता कोल्हे, ‘सेवांकुर’ चालविणारे डॉ.अविनाश सावजी, पारधी मुलांसाठी ‘प्रश्नचिन्ह’ ही शाळा चालविणारे मतिन भोसले, जळगाव जिल्ह्यातील मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा. कष्टकºयांच्या उन्नतीसाठी झटणारे डॉ.बाबा आढाव, मुक्तांगणचे अनिल अवचट, आधारवड बनलेले शांतिलाल मुथ्था, अहमदनगर जिल्ह्यातील स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, सांगली, सातारा, कोल्हापुरात एचआयव्हीबाधितांसाठी कार्यरत मीना शेषू, वृद्धाश्रम चालविणारे माजी आमदार शरद पाटील, परभणी व आजूबाजूच्या परिसरात मातंगांसाठी झटणारे गणपत भिसे असे एक ना अनेक लोक आहेत. सगळ्यांचा उल्लेख शक्य नसला तरी सत्ताधाºयांना आव्हान देण्याच्या भानगडीत न पडता स्वत:ची समाजसेवेची चौकट समृद्ध करणाºया या व्यक्ती व संस्थांच्या पायाशी सरकारने नतमस्तक व्हावे. त्यांना राजाश्रयाची आवश्यकता नाही पण त्यांच्या उत्तुंग कार्याची व्याप्ती सरकारच्या पुढाकाराने वाढली तर त्यातून सरकारची प्रतिमा उंचावेलच पण वंचित समाजाला त्याचा मोठा फायदा होऊ शकेल. कला, साहित्य, संस्कृती, सामाजिक कार्य, अर्थकारण, संशोधन, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील दिग्गजांशी वैयक्तिक स्नेह निर्माण करण्याचे काम यशवंतरावजी, पवारसाहेब करीत असत. ते स्नेहबंधन वैचारिक भिंतींपलीकडचे असे. सध्याच्या गढूळ वातावरणात तसे पुन्हा एकदा घडण्याची आवश्यकता वाटत आहे. आजच्या सुविद्य आणि सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून तीच अपेक्षा आहे. हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. सीएसआर फंडाच्या मदतीने एक हजार गावांचा एका वर्षात कायापालट करण्याच्या शासनाच्या योजनेत तसेच अन्य उपक्रमांशी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. ‘उद्या कुठला पुरस्कार घेतला तर माऊलींच्या चरणावरील हात हटतील ना!’ असे म्हणून पुरस्कार नाकारणारे शेगाव संस्थानचे शिवशंकरभाऊ पाटील आहेत. अशा सर्वांच्या कार्याचा प्रकाश राज्यभर पोहोचविण्याची मायबाप सरकार अन् मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस