शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

अण्णांशी भेट हा प्रारंभ ठरावा!

By यदू जोशी | Updated: November 6, 2017 02:52 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परवा राळेगण सिद्धीला जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटले. तेथील सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परवा राळेगण सिद्धीला जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटले. तेथील सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांनी केले. महाराष्ट्रात समाजसेवेची अखंड ऊर्जाकेंद्रे असलेल्या काही संस्था आणि स्वकर्तृत्वाने स्वत:च एक संस्था बनलेल्या मान्यवर व्यक्तीदेखील आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटून त्यांच्या कार्याचा पॅटर्न शासनाच्या सहकार्याने अन्यत्र राबविता येईल का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले सातारा जिल्ह्याचे. त्यांनी आपल्या संस्थेत विदर्भ, मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या मुलांचे संगोपन चालविले आहे. नागपूरचे रामभाऊ इंगोले या फकिराने वेश्यांच्या मुलांसाठी प्रचंड कार्य उभे केले. कुष्ठरोग्यांची अव्याहत सेवा करणारे आमटे कुटुंब आणि आदिवासींच्या सेवेत हयात व्यतित करीत असलेले बंग कुटुंबीय तर दीपस्तंभ आहेतच. शेकडो रुग्णांना मुंबईत आश्रय देणाºया गाडगेबाबा धर्मशाळेचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख आहेत. मेळघाटच्या आदिवासींसाठी देवदूत असलेले डॉ.रवींद्र कोल्हे, स्मिता कोल्हे, ‘सेवांकुर’ चालविणारे डॉ.अविनाश सावजी, पारधी मुलांसाठी ‘प्रश्नचिन्ह’ ही शाळा चालविणारे मतिन भोसले, जळगाव जिल्ह्यातील मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा. कष्टकºयांच्या उन्नतीसाठी झटणारे डॉ.बाबा आढाव, मुक्तांगणचे अनिल अवचट, आधारवड बनलेले शांतिलाल मुथ्था, अहमदनगर जिल्ह्यातील स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, सांगली, सातारा, कोल्हापुरात एचआयव्हीबाधितांसाठी कार्यरत मीना शेषू, वृद्धाश्रम चालविणारे माजी आमदार शरद पाटील, परभणी व आजूबाजूच्या परिसरात मातंगांसाठी झटणारे गणपत भिसे असे एक ना अनेक लोक आहेत. सगळ्यांचा उल्लेख शक्य नसला तरी सत्ताधाºयांना आव्हान देण्याच्या भानगडीत न पडता स्वत:ची समाजसेवेची चौकट समृद्ध करणाºया या व्यक्ती व संस्थांच्या पायाशी सरकारने नतमस्तक व्हावे. त्यांना राजाश्रयाची आवश्यकता नाही पण त्यांच्या उत्तुंग कार्याची व्याप्ती सरकारच्या पुढाकाराने वाढली तर त्यातून सरकारची प्रतिमा उंचावेलच पण वंचित समाजाला त्याचा मोठा फायदा होऊ शकेल. कला, साहित्य, संस्कृती, सामाजिक कार्य, अर्थकारण, संशोधन, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील दिग्गजांशी वैयक्तिक स्नेह निर्माण करण्याचे काम यशवंतरावजी, पवारसाहेब करीत असत. ते स्नेहबंधन वैचारिक भिंतींपलीकडचे असे. सध्याच्या गढूळ वातावरणात तसे पुन्हा एकदा घडण्याची आवश्यकता वाटत आहे. आजच्या सुविद्य आणि सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून तीच अपेक्षा आहे. हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. सीएसआर फंडाच्या मदतीने एक हजार गावांचा एका वर्षात कायापालट करण्याच्या शासनाच्या योजनेत तसेच अन्य उपक्रमांशी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. ‘उद्या कुठला पुरस्कार घेतला तर माऊलींच्या चरणावरील हात हटतील ना!’ असे म्हणून पुरस्कार नाकारणारे शेगाव संस्थानचे शिवशंकरभाऊ पाटील आहेत. अशा सर्वांच्या कार्याचा प्रकाश राज्यभर पोहोचविण्याची मायबाप सरकार अन् मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस