शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीश्रींची ‘अध्यात्मिक’ ताकद अधोरेखित झाली!

By admin | Updated: March 22, 2016 02:58 IST

शरीर, मन आणि बुद्धी यावरचं नियंत्रण सुटलं की एखादी व्यक्ती कशी वागू-लिहू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचा ‘डोळे दीपवून टाकणारे

शरीर, मन आणि बुद्धी यावरचं नियंत्रण सुटलं की एखादी व्यक्ती कशी वागू-लिहू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचा ‘डोळे दीपवून टाकणारे श्रीश्रींचे जनसंपर्क प्रदर्शन’ हा लेख! (लोकमत दिनांक १८ मार्च) केंद्रीय मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोध विसरून यमुनातीरावर एकत्र आले, ही या लेखाची सुरुवात आहे. मुळात जगातील लोकांनी आपापसातील वाद, संघर्ष, भांडणं आणि विरोध विसरून एकत्र यावे आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना साथ द्यावी, हीच तर आर्ट आॅफ लिव्हिंगची व सांस्कृतिक महोत्सव आयोजनामागची भूमिका आहे. महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले व समारोप राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झाला. त्यामुळे ‘या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दांडगा जनसंपर्क बाळगणारे मोठे स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू असल्याचे श्री श्री रविशंकर यांनी अधोरेखित केले आहे’, असे श्री. सरदेसाई यांचे म्हणणे आहे. वस्तुत: ज्या जागतिक महोत्सवाला जगातील १५५ देशांतील कलाकार, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, बॅँकींग अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी तीन दिवस उपस्थिती दर्शवितात यात श्रीश्रींच्या ठायी असलेली अध्यात्मिक ताकद अधोरेखित होते, जनसंपर्क नव्हे! दुसरा मुद्दा स्वयंघोषितपणाचा. जेव्हा जगातील अमेरिका, रशिया, चीन, जपान, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सुरिनाम, नेपाळ यासारख्या देशातील करोडो जनता श्रीश्रींना अध्यात्मिक गुरू मानते, ‘यूएसए’सारखा देश आपला नवा ध्वज गुरूजींना सन्मानाप्रित्यर्थ भेट म्हणून देतो तेव्हा अध्यात्मिक गुरू हे संबोधन त्यामध्ये अनुस्यूतच असते.या महोत्सवाचे आयोजन ‘डोळे दीपवून टाकणारेच’ असायला हवे होते. दुसरे म्हणजे अशा प्रकारचे आयोजन, जे आजपर्यंत कोणत्याही देशात झाले नाही, ते आपल्या देशात होऊ शकते, असा एक संदेशही जगाच्या पातळीवर गेला. जागतिक दर्जाचा हा कार्यक्रम डोळे दीपवून टाकणारा न करता अगदीच साधासुधा व्हायला हवा होता आणि त्यात गडबड गोंधळ झाला असता म्हणजे ‘सगळं छान झालं असतं’, असंच सरदेसाई यांना अपेक्षित होते की काय न कळे !राष्ट्रीय हरित लवादाने दिलेला निर्णय आणि त्याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त यात विसंगती होती. लवादाने पाच कोटींची रक्कम ‘दंड’ म्हणून नव्हे, तर यमुना नदीच्या स्वच्छताकामी वापरावी, असा आदेश दिला होता व तो गुरूजींना मान्य होता. एखाद्या कार्यक्रमासाठी जेव्हां जागतिक दर्जाचे अनेक नेते उपस्थित राहणार असतात, तेव्हां शेवटच्या क्षणी तो रद्द करणे अतोनात त्रासदायक ठरु शकते आणि ज्या जागतिक शांततेसाठी आणि ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश जगात पोहोचविण्यासाठी हा महोत्सव होत होता, त्याच देशात ही राजकारण प्रेरीत अशांतता निर्माण होणे हे जगाच्या पातळीवर भारताच्या प्रतिमेला छेद देणारे नव्हते का? आपण कारागृहात जाणे पसंत करू, असे गुरूजींनी म्हणणे हा कोडगेपणा कसा आणि या वक्तव्याची तुलना दुसऱ्या गुन्ह्यातील दंड न भरणाऱ्या नागरिकांशी करणे हा सरदेसाई यांच्या मनाचा कोतेपणा नाही का?राजकारण हे समाजाच्या विविध क्षेत्रांसाठी सर्वस्पर्शी असायलाच हवे. त्यामुळे श्रीश्री इतकी वर्षे निर्माण करून ठेवलेल्या राजकीय संबंधांचा फायदा करून घेताना दिसत आहेत, असे म्हणणे तद्दन गैरलागू आहे. ‘या कार्यक्रमाचे थेट प्रसारण १५० देशांमध्ये झाले, याचा अर्थ भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध वाढत आहेत’, असा काढायचा आणि त्याचे श्रेय श्रीश्रींना देताना मात्र ‘वैचारिक दरिद्रता’ दाखवायची हा विरोधाभास म्हणायला हवा.या महोत्सवातून ‘सौम्य हिंदू शक्तीचा’ उदय होत असल्याचे सरदेसाई यांना जाणवले, हा आणखी एक विनोद! मुळात कोणतीही जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसाकडे पाहाण्याची शिकवण गुरूजींनी दिली आहे व त्यामुळेच आखातातील शेख, पाकिस्तानातील ८० कलाकार, मौलवी या कार्यक्रमाला उपस्थित होते. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविला जाऊ शकेल असा कार्यक्रम एकहाती आयोजित करायचा असेल तर त्याला ‘अध्यात्मिक बळ’ असावंच लागतं. या पार्श्वभूमीवर श्रीश्री ‘बेन्टलेत’ बसून मुलाखती देतात, पहिल्या वर्गाने प्रवास करतात की ‘आलिशान आश्रमा’त राहतात हे मुद्दे चर्चेचे होऊच शकत नाहीत. सामान्य राहिले म्हणजे तीच माणसं सत्य, खरी आणि प्रामाणिक असं जर सरदेसाई यांचं संशोधन असेल, तर मग मात्र त्यांच्या विचारांचं कौतुक करावं, तितकं थोडंच !‘एखादा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठ्या बुद्धिमत्तेची आवश्यकता भासत नाही’, हे सरदेसाई यांचे म्हणणे म्हणजे त्यांच्याच बुद्धीची दिवाळखोरी म्हणावी लागेल. सरकारने अध्यात्मिक मित्रांवर कृपा का करावी आणि त्यांना विशेष सोयी-सुविधा का पुरवाव्यात, असा प्रश्न जर सरदेसाई यांना पडला असेल तर मग सरकारने नेमके काय करावे? देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांना सोयी-सुविधा द्याव्यात की, समाजात फूट पाडणाऱ्या आणि अशांतता पसरविणाऱ्यांवर कृपा करावी? - संतोष कापडणेमहाराष्ट्र समन्वयकआर्ट आॅफ लिव्हिंग ब्युरो आॅफ कम्युनिकेशन्स