शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

सरकारी अनुदाने गडप करणाऱ्या तोंडांना चाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 06:03 IST

कॅशलेस आणि काॅन्टॅक्टलेस ‘ई-रुपी’ सेवेमुळे सरकारी अनुदाने योग्य त्या लाभार्थींपर्यंत पोहोचविणे अधिक सुकर होणार आहे !

- विनय उपासनी(मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई) 

१९८५ सालातली ही गोष्ट आहे. काँग्रेसच्या  शताब्दीनिमित्त मुंबई येथे पक्षाचे विशेष  अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनात बोलताना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते, ‘गोरगरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार विविध योजना राबविते; परंतु केंद्र सरकारने पाठविलेल्या १ रुपयापैकी फक्त १५ पैसेच या योजनांचे खरे लाभार्थी असलेल्यांपर्यंत पोहोचतात. उर्वरित ८५ पैसे मधल्यामध्येच गायब होतात’. - कल्याणकारी योजनांसाठी राज्याराज्यांना पाठविल्या जाणाऱ्या केंद्रीय निधीचा मधल्यामध्ये अपहार करण्याच्या अपप्रवृत्तींवरच राजीव गांधी यांनी थेट बोट ठेवले होते. ते शतश: खरे होते. राजीव गांधींच्या या विधानानंतर बरोबर सहा वर्षांनी, म्हणजे १९९१ मध्ये, भारताने तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली लायसन्स-परमीट राजचे जोखड झुगारून खुल्या अर्थव्यवस्थेचा मार्ग धरला. देशाच्या आर्थिक उदारीकरणाला  यंदा ३० वर्षे पूर्ण झाली. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. उद्योग-व्यवसायांचे रूपडे अंतर्बाह्य बदलले. तसेच ते शासनप्रणालीचेही बदलले. 

आर्थिक उदारीकरणाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात, म्हणजे २५ वर्षे पूर्ण झालेली असताना,  विद्यमान सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा ‘कागज के टुकडे’ ठरवीत नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर अर्थकल्लोळ निर्माण झाला खरा; परंतु अर्थव्यवस्थेने एक निश्चित असे वळण घेतले. या वळणावर कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यात आले. काळ्या पैशांच्या रूपात चालणाऱ्या समांतर अर्थव्यवस्थेला चाप बसविण्यासाठी डिजिटल आर्थिक व्यवहारांना मुक्त वाव देण्यात आला. कॅशलेस व्यवहारांना सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या विद्यमान सरकारने जनधन बँक, मुद्रा योजना, उज्ज्वला योजना वगैरे योजनांच्या माध्यमातून थेट लाभार्थींशी नाते जोडल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अब्जावधी रुपयांचा निधी आताशा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागला आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे परवा उद्घाटन झालेली ‘ई-रुपी’ पेमेंट सेवा होय. प्रत्येक डिजिटल आर्थिक व्यवहार अधिकाधिक पारदर्शी आणि सोप्या पद्धतीने व्हावा, ही या सेवेमागची संकल्पना आहे.

कॅशलेस आणि काँटॅक्टलेस असलेल्या ‘ई-रुपी’ सेवेचा फायदा सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांना होणार आहे. या पेमेंट सेवेमुळे भ्रष्टाचार घटणार आहे. ‘ई-रुपी’ ही एक क्यूआर कोड किंवा एसएमएस आधारित ई-व्हाऊचर सुविधा असल्याने सरकारी योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील. कोणत्याही मध्यस्थाची या व्यवहारात गरज राहणार नसून शतप्रतिशत पारदर्शकता या व्यवहारात राहणार आहे. माता व बालकल्याण योजनेंतर्गत औषधी व पोषक आहारासाठी आर्थिक मदत थेट लाभार्थी माता व बालकांपर्यंत या सेवेद्वारे  पोहोचविता येणार आहे. याशिवाय आयुष्मान भारत आरोग्य योजनेंतर्गत तपासण्या, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केले जाणारे उपचार, खतांचे अनुदान इत्यादी लाभ आणि सेवाही ‘ई-रुपी’द्वारे लाभार्थ्यांना थेट देणे सरकारला शक्य होणार आहे.

त्यातच सध्या सुरू असलेल्या कोरोना महासाथीने डिजिटल आर्थिक व्यवहारांचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. कोरोनाकाळात डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे एका अहवालातून अधोरेखित झाले. ‘ई-रुपी’ सेवेचे निर्माते असलेल्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार ऑक्टोबर २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत तब्बल एक अब्जांहून अधिक आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने पार पडले. २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात देशभरात २५.५ अब्ज रुपयांचे व्यवहार ऑनलाइन पद्धतीने पार पडल्याचे या अहवालात नमूद आहे. अमेरिका आणि चीन या दोन बलाढ्य देशांनाही भारताने डिजिटल आर्थिक व्यवहारांत मागे टाकले आहे. २०२५ पर्यंत देशात ७००० लाख कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने होतील, असा एक अंदाज आहे. यावरूनच भारतात डिजिटल आर्थिक व्यवहारांची गती किती आहे, याचा अंदाज येतो. या पार्श्वभूमीवर नजीकच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ‘डिजिटल अर्थव्यवस्था’ म्हणून नावारूपाला आली तर आश्चर्य वाटून घ्यायला नको. 

टॅग्स :digitalडिजिटलcentral railwayमध्य रेल्वे