शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अध्यात्म - क्षणोक्षणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:25 IST

पाऊस ब-यापैकी कमी झालाय. थंडीला अजून सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पहाटे पहाटे फिरण्याचा आनंद ज्येष्ठमंडळी ब-यापैकी घेत आहेत. वाहतुकीची वर्दळ नाही. सर्वत्र निरव शांतता. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाट कानावर ब-यापैकी पडतो.

-  डॉ. गोविंद काळेपाऊस ब-यापैकी कमी झालाय. थंडीला अजून सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पहाटे पहाटे फिरण्याचा आनंद ज्येष्ठमंडळी ब-यापैकी घेत आहेत. वाहतुकीची वर्दळ नाही. सर्वत्र निरव शांतता. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाट कानावर ब-यापैकी पडतो. काल मात्र चिमण्यांच्या चिवचिवटापेक्षा कावळ्यांची काव काव अधिक तीव्रपणे ऐकायला येत होती. १०-२० कावळे एका ठिकाणी दिसत होते. काही चोचा मारत होते तर काही उडून पुन्हा पुन्हा येत होते. माझ्या काठीच्या आवाजाने कावळे पळाले. पाहतो तर काय? गतप्राण झालेले चिमणीचे पिलू. बाजूची माती काढून लहानसा खळगा तयार केला. पिलाला पुरले. वरती एक दगड ठेवला आणि रस्त्याला लागलो. रे.ना.वा. टिळकांची कविता आठवली ‘क्षणोक्षणी पडे उठे परि बळे’‘क्षणोक्षणी’ शब्दाने मला जागे केले. फुकट गेलेल्या क्षणांचा हिशेब मांडू लागलो तेव्हा लक्षात आले- सारे आयुष्यच फुकट गेले. प्रत्येक क्षण मातिमोलच झाला. ही निराशा नव्हे; पण खरेच, सांगावे असे काय आहे आपुल्या आयुष्यात. ‘क्षणत्यागे कुतो विद्या?’ डिग्री म्हणजे विद्या नव्हे याचा साक्षात्कार झाला. माणसाचा जन्म मिळूनही जिणे मात्र कवडीमोलाचे आपण जगतो. जीवनाचा अर्थ कळत नाही. तरुण वयात गीता, भागवत हातात घेण्याची बुद्धी झाली नाही. आता भागवत रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ‘सोन्यापेक्षाही क्षण अधिक मूल्यवान समजेल तो साधू. ज्याला वेळेची किंमत नसते त्याला अंतकाळी खूप पश्चात्ताप होतो.’ एका मेलेल्या चिमणीच्या पिलाने मला स्वप्नातून जागे केले होते. मानवी जीवनातील क्षणाचे महत्त्व कळून आले. सावंतांचा पांडुरंग सांगत नव्हता का, बोलता बोलता त्याच्या बाबांनी क्षणात प्राण सोडले. ना आजारपण ना डॉक्टर. क्षणार्धात खेळ खलास. हा क्षण जीवनाच्या अनेक कंगोºयांचे दर्शन घडवितो. तोच तर साक्षीभूत होऊन राहतो. क्षणाचे महत्त्व ओळखता आले पाहिजे. ‘‘क्षण एक पुरे प्रेमाचा। वर्षाव पडो मरणाचा’’ प्रेमाचा एक क्षण अनुभवण्यासाठी मरणाचा वर्षाव पत्करणा-या त्या प्रेमिकालाही क्षणाचे महत्त्व जाणवते हे विशेष. संत तुकोबांनी क्षणाची महती सांगून सर्वांनाच सावधान केले आहे.क्षणाक्षणा हाचि करावा विचारतरावया पार भवसिंधुनाशिवंत देव जाणार सकळआयुष्य खातो काळ सावधानक्षणाक्षणाचा विचार म्हणजेचतर अध्यात्म.

टॅग्स :Natureनिसर्ग