शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अध्यात्म - क्षणोक्षणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:25 IST

पाऊस ब-यापैकी कमी झालाय. थंडीला अजून सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पहाटे पहाटे फिरण्याचा आनंद ज्येष्ठमंडळी ब-यापैकी घेत आहेत. वाहतुकीची वर्दळ नाही. सर्वत्र निरव शांतता. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाट कानावर ब-यापैकी पडतो.

-  डॉ. गोविंद काळेपाऊस ब-यापैकी कमी झालाय. थंडीला अजून सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पहाटे पहाटे फिरण्याचा आनंद ज्येष्ठमंडळी ब-यापैकी घेत आहेत. वाहतुकीची वर्दळ नाही. सर्वत्र निरव शांतता. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाट कानावर ब-यापैकी पडतो. काल मात्र चिमण्यांच्या चिवचिवटापेक्षा कावळ्यांची काव काव अधिक तीव्रपणे ऐकायला येत होती. १०-२० कावळे एका ठिकाणी दिसत होते. काही चोचा मारत होते तर काही उडून पुन्हा पुन्हा येत होते. माझ्या काठीच्या आवाजाने कावळे पळाले. पाहतो तर काय? गतप्राण झालेले चिमणीचे पिलू. बाजूची माती काढून लहानसा खळगा तयार केला. पिलाला पुरले. वरती एक दगड ठेवला आणि रस्त्याला लागलो. रे.ना.वा. टिळकांची कविता आठवली ‘क्षणोक्षणी पडे उठे परि बळे’‘क्षणोक्षणी’ शब्दाने मला जागे केले. फुकट गेलेल्या क्षणांचा हिशेब मांडू लागलो तेव्हा लक्षात आले- सारे आयुष्यच फुकट गेले. प्रत्येक क्षण मातिमोलच झाला. ही निराशा नव्हे; पण खरेच, सांगावे असे काय आहे आपुल्या आयुष्यात. ‘क्षणत्यागे कुतो विद्या?’ डिग्री म्हणजे विद्या नव्हे याचा साक्षात्कार झाला. माणसाचा जन्म मिळूनही जिणे मात्र कवडीमोलाचे आपण जगतो. जीवनाचा अर्थ कळत नाही. तरुण वयात गीता, भागवत हातात घेण्याची बुद्धी झाली नाही. आता भागवत रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ‘सोन्यापेक्षाही क्षण अधिक मूल्यवान समजेल तो साधू. ज्याला वेळेची किंमत नसते त्याला अंतकाळी खूप पश्चात्ताप होतो.’ एका मेलेल्या चिमणीच्या पिलाने मला स्वप्नातून जागे केले होते. मानवी जीवनातील क्षणाचे महत्त्व कळून आले. सावंतांचा पांडुरंग सांगत नव्हता का, बोलता बोलता त्याच्या बाबांनी क्षणात प्राण सोडले. ना आजारपण ना डॉक्टर. क्षणार्धात खेळ खलास. हा क्षण जीवनाच्या अनेक कंगोºयांचे दर्शन घडवितो. तोच तर साक्षीभूत होऊन राहतो. क्षणाचे महत्त्व ओळखता आले पाहिजे. ‘‘क्षण एक पुरे प्रेमाचा। वर्षाव पडो मरणाचा’’ प्रेमाचा एक क्षण अनुभवण्यासाठी मरणाचा वर्षाव पत्करणा-या त्या प्रेमिकालाही क्षणाचे महत्त्व जाणवते हे विशेष. संत तुकोबांनी क्षणाची महती सांगून सर्वांनाच सावधान केले आहे.क्षणाक्षणा हाचि करावा विचारतरावया पार भवसिंधुनाशिवंत देव जाणार सकळआयुष्य खातो काळ सावधानक्षणाक्षणाचा विचार म्हणजेचतर अध्यात्म.

टॅग्स :Natureनिसर्ग