शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुले पळविणारी टोळी; तुमच्या गावात आली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 10:55 IST

अफवा वणव्यासारख्या पसरतात आणि जिवंत माणसांना पकडून त्यांचा जीव घेतात. माणसांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती निघून जाते.

राही भिडे,ज्येष्ठ पत्रकार

कानोकानी अफवा पसरविण्याचे दिवस कधीच संपले,  वाट्टेल त्या अफवा पसरवून दंगे, धोपे करण्यासाठी आता समाजमाध्यमांचा वापर केला जात आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता, समाजमन दुभंगल्याने मुजफ्फरनगरची दंगल झाली होती. गोवंश हत्येच्या अफवांनी कितीतरी जणांचा बळी घेतला. आता मुले पळविणाऱ्या टोळ्यांच्या अफवेतून संतप्त झालेला जमाव कायदा हातात घेऊन दिसेल त्याला मारहाण करीत सुटला आहे. गेल्या दोन वर्षांंपासून या घटना घडत असतानाही अशा प्रकारच्या अफवांचे निराकरण करण्यात पोलीस, समाज आणि सरकारला अद्याप यश आलेले नाही.

दोन वर्षांपूर्वी ओडिशात समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या दोघांचा मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयावरून बळी घेतला गेला. त्यानंतर, पालघरमध्ये दोन साधूंना अशाच प्रकारे जमावाने मारले. अशा घटनांना नंतर हिंदू-मुस्लीम, हिंदू-ख्रिश्चन असे धार्मिक वळण देण्याचे प्रकारही झाले. राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला गेला. पालघर साधू हत्याकांडात तर थेट सोनिया गांधी यांनाही  ओढले गेले. योगी आदित्यनाथांपासून अनेक जण त्यावर बोलले. त्यानंतर, उत्तर प्रदेशातच एका साधूची हत्या झाल्याने, महाराष्ट्रावर तिकडून होणारी टीका थांबली. 

कोणत्याही गोष्टीचे राजकारण करण्याची आपली वृत्ती असल्याने, अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकांचे फावते. दंगली घडवून त्यातून आपली पोळी भाजणारे काही कमी नाहीत. ज्या वेगाने अफवा पसरविल्या जातात, त्याच वेगाने त्यांचे निराकरण करण्याची कोणतीही यंत्रणा सरकारकडे नाही. आताही सांगलीत दोन साधूंना मारहाण करण्यामागे गैरसमजच जास्त आहेत. तिथल्या घटनेवर पडदा पडत नाही, तोच नांदेड, बुलडाण्यातही मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयातून अनेकांना मारहाण करण्यात आली.

अपहरणकर्ते शहरात फिरत असल्याचे संदेश ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत असून, त्याच धास्तीतून राज्यात अनेक ठिकाणची परिस्थिती गंभीर वळणावर पोहोचली आहे. नाशिकमध्ये मित्राची चेष्टामस्करी करण्यासाठी बुरखा घालून गेलेल्या तरुणाला नागरिकांनी बेदम चोप दिला. पोलीस वेळीच पोहोचल्याने या तरुणाची सुटका झाली. जळगावमध्ये तोंडाला रुमाल बांधलेल्या एका महिलेला मारहाण करण्यात आली. पुणे आणि नागपुरातही या अफवा पसरल्याने घबराट पसरली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका महिला मुले चोरत असल्याचा संशय आल्याने मारहाण करण्यात आली. कुठलीही खात्री न करता, तसेच महिलेस बाजू मांडण्याची संधी न देता या महिलेस चपलांनी मारहाण करण्यात आली. ही महिला बेघर असल्याचे स्पष्ट झाले.

मुंबईप्रमाणेच नागपूर व पुण्यातही मुले चोरणाऱ्या टोळीबाबतची अफवा पसरली आहे. नागपूर शहरातील अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर एक चित्रफीत व्हायरल झाली. या टोळीने एका मुलाचे अपहरण केल्याचीही चर्चा होती. पोलिसांनी तातडीने मुलाला शोधले. त्याच्या वडिलाचा दुधाचा व्यवसाय आहे. मुलगा दूध वितरणासाठी गेला, घरी परतताना दुधाच्या कॅनचे झाकण कुठेतरी पडले. वडील रागावतील, या भीतीने मुलगा बेपत्ता झाला होता. 

पुण्यातही अशीच अफवा पसरली असल्याने पालक घाबरले आहेत. नेहमीप्रमाणे अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे; परंतु अशा किती प्रकरणांत कारवाई झाली, याचे उत्तर मिळत नाही. खोट्याला अफवेचे पंख मिळाले, तर खोट्याचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त होतो.  एखाद्या अफवेत इतकी ताकद असते, की एखाद्याचा जीव घेतल्यानंतरच जमाव संतप्त होतो. अफवा वणव्यासारख्या पसरतात आणि मॉब लिंचिंगला जन्म देतात. त्यात गुंतलेल्या प्रत्येक माणसाची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती निघून जाते. निष्पापांना मारहाण करणे हा संतप्त जमावाचा उद्देश असतो. अफवांप्रमाणे हल्ली व्हिडीओ चित्रफिती पसरत जातात, मग सुरू होते, मॅाब लिंचिंगची मालिका.

टॅग्स :Kidnappingअपहरण