शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मुले पळविणारी टोळी; तुमच्या गावात आली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 10:55 IST

अफवा वणव्यासारख्या पसरतात आणि जिवंत माणसांना पकडून त्यांचा जीव घेतात. माणसांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती निघून जाते.

राही भिडे,ज्येष्ठ पत्रकार

कानोकानी अफवा पसरविण्याचे दिवस कधीच संपले,  वाट्टेल त्या अफवा पसरवून दंगे, धोपे करण्यासाठी आता समाजमाध्यमांचा वापर केला जात आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता, समाजमन दुभंगल्याने मुजफ्फरनगरची दंगल झाली होती. गोवंश हत्येच्या अफवांनी कितीतरी जणांचा बळी घेतला. आता मुले पळविणाऱ्या टोळ्यांच्या अफवेतून संतप्त झालेला जमाव कायदा हातात घेऊन दिसेल त्याला मारहाण करीत सुटला आहे. गेल्या दोन वर्षांंपासून या घटना घडत असतानाही अशा प्रकारच्या अफवांचे निराकरण करण्यात पोलीस, समाज आणि सरकारला अद्याप यश आलेले नाही.

दोन वर्षांपूर्वी ओडिशात समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या दोघांचा मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयावरून बळी घेतला गेला. त्यानंतर, पालघरमध्ये दोन साधूंना अशाच प्रकारे जमावाने मारले. अशा घटनांना नंतर हिंदू-मुस्लीम, हिंदू-ख्रिश्चन असे धार्मिक वळण देण्याचे प्रकारही झाले. राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला गेला. पालघर साधू हत्याकांडात तर थेट सोनिया गांधी यांनाही  ओढले गेले. योगी आदित्यनाथांपासून अनेक जण त्यावर बोलले. त्यानंतर, उत्तर प्रदेशातच एका साधूची हत्या झाल्याने, महाराष्ट्रावर तिकडून होणारी टीका थांबली. 

कोणत्याही गोष्टीचे राजकारण करण्याची आपली वृत्ती असल्याने, अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकांचे फावते. दंगली घडवून त्यातून आपली पोळी भाजणारे काही कमी नाहीत. ज्या वेगाने अफवा पसरविल्या जातात, त्याच वेगाने त्यांचे निराकरण करण्याची कोणतीही यंत्रणा सरकारकडे नाही. आताही सांगलीत दोन साधूंना मारहाण करण्यामागे गैरसमजच जास्त आहेत. तिथल्या घटनेवर पडदा पडत नाही, तोच नांदेड, बुलडाण्यातही मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयातून अनेकांना मारहाण करण्यात आली.

अपहरणकर्ते शहरात फिरत असल्याचे संदेश ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत असून, त्याच धास्तीतून राज्यात अनेक ठिकाणची परिस्थिती गंभीर वळणावर पोहोचली आहे. नाशिकमध्ये मित्राची चेष्टामस्करी करण्यासाठी बुरखा घालून गेलेल्या तरुणाला नागरिकांनी बेदम चोप दिला. पोलीस वेळीच पोहोचल्याने या तरुणाची सुटका झाली. जळगावमध्ये तोंडाला रुमाल बांधलेल्या एका महिलेला मारहाण करण्यात आली. पुणे आणि नागपुरातही या अफवा पसरल्याने घबराट पसरली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका महिला मुले चोरत असल्याचा संशय आल्याने मारहाण करण्यात आली. कुठलीही खात्री न करता, तसेच महिलेस बाजू मांडण्याची संधी न देता या महिलेस चपलांनी मारहाण करण्यात आली. ही महिला बेघर असल्याचे स्पष्ट झाले.

मुंबईप्रमाणेच नागपूर व पुण्यातही मुले चोरणाऱ्या टोळीबाबतची अफवा पसरली आहे. नागपूर शहरातील अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर एक चित्रफीत व्हायरल झाली. या टोळीने एका मुलाचे अपहरण केल्याचीही चर्चा होती. पोलिसांनी तातडीने मुलाला शोधले. त्याच्या वडिलाचा दुधाचा व्यवसाय आहे. मुलगा दूध वितरणासाठी गेला, घरी परतताना दुधाच्या कॅनचे झाकण कुठेतरी पडले. वडील रागावतील, या भीतीने मुलगा बेपत्ता झाला होता. 

पुण्यातही अशीच अफवा पसरली असल्याने पालक घाबरले आहेत. नेहमीप्रमाणे अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे; परंतु अशा किती प्रकरणांत कारवाई झाली, याचे उत्तर मिळत नाही. खोट्याला अफवेचे पंख मिळाले, तर खोट्याचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त होतो.  एखाद्या अफवेत इतकी ताकद असते, की एखाद्याचा जीव घेतल्यानंतरच जमाव संतप्त होतो. अफवा वणव्यासारख्या पसरतात आणि मॉब लिंचिंगला जन्म देतात. त्यात गुंतलेल्या प्रत्येक माणसाची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती निघून जाते. निष्पापांना मारहाण करणे हा संतप्त जमावाचा उद्देश असतो. अफवांप्रमाणे हल्ली व्हिडीओ चित्रफिती पसरत जातात, मग सुरू होते, मॅाब लिंचिंगची मालिका.

टॅग्स :Kidnappingअपहरण