शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

मुले पळविणारी टोळी; तुमच्या गावात आली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 10:55 IST

अफवा वणव्यासारख्या पसरतात आणि जिवंत माणसांना पकडून त्यांचा जीव घेतात. माणसांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती निघून जाते.

राही भिडे,ज्येष्ठ पत्रकार

कानोकानी अफवा पसरविण्याचे दिवस कधीच संपले,  वाट्टेल त्या अफवा पसरवून दंगे, धोपे करण्यासाठी आता समाजमाध्यमांचा वापर केला जात आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता, समाजमन दुभंगल्याने मुजफ्फरनगरची दंगल झाली होती. गोवंश हत्येच्या अफवांनी कितीतरी जणांचा बळी घेतला. आता मुले पळविणाऱ्या टोळ्यांच्या अफवेतून संतप्त झालेला जमाव कायदा हातात घेऊन दिसेल त्याला मारहाण करीत सुटला आहे. गेल्या दोन वर्षांंपासून या घटना घडत असतानाही अशा प्रकारच्या अफवांचे निराकरण करण्यात पोलीस, समाज आणि सरकारला अद्याप यश आलेले नाही.

दोन वर्षांपूर्वी ओडिशात समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या दोघांचा मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयावरून बळी घेतला गेला. त्यानंतर, पालघरमध्ये दोन साधूंना अशाच प्रकारे जमावाने मारले. अशा घटनांना नंतर हिंदू-मुस्लीम, हिंदू-ख्रिश्चन असे धार्मिक वळण देण्याचे प्रकारही झाले. राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला गेला. पालघर साधू हत्याकांडात तर थेट सोनिया गांधी यांनाही  ओढले गेले. योगी आदित्यनाथांपासून अनेक जण त्यावर बोलले. त्यानंतर, उत्तर प्रदेशातच एका साधूची हत्या झाल्याने, महाराष्ट्रावर तिकडून होणारी टीका थांबली. 

कोणत्याही गोष्टीचे राजकारण करण्याची आपली वृत्ती असल्याने, अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकांचे फावते. दंगली घडवून त्यातून आपली पोळी भाजणारे काही कमी नाहीत. ज्या वेगाने अफवा पसरविल्या जातात, त्याच वेगाने त्यांचे निराकरण करण्याची कोणतीही यंत्रणा सरकारकडे नाही. आताही सांगलीत दोन साधूंना मारहाण करण्यामागे गैरसमजच जास्त आहेत. तिथल्या घटनेवर पडदा पडत नाही, तोच नांदेड, बुलडाण्यातही मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयातून अनेकांना मारहाण करण्यात आली.

अपहरणकर्ते शहरात फिरत असल्याचे संदेश ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत असून, त्याच धास्तीतून राज्यात अनेक ठिकाणची परिस्थिती गंभीर वळणावर पोहोचली आहे. नाशिकमध्ये मित्राची चेष्टामस्करी करण्यासाठी बुरखा घालून गेलेल्या तरुणाला नागरिकांनी बेदम चोप दिला. पोलीस वेळीच पोहोचल्याने या तरुणाची सुटका झाली. जळगावमध्ये तोंडाला रुमाल बांधलेल्या एका महिलेला मारहाण करण्यात आली. पुणे आणि नागपुरातही या अफवा पसरल्याने घबराट पसरली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका महिला मुले चोरत असल्याचा संशय आल्याने मारहाण करण्यात आली. कुठलीही खात्री न करता, तसेच महिलेस बाजू मांडण्याची संधी न देता या महिलेस चपलांनी मारहाण करण्यात आली. ही महिला बेघर असल्याचे स्पष्ट झाले.

मुंबईप्रमाणेच नागपूर व पुण्यातही मुले चोरणाऱ्या टोळीबाबतची अफवा पसरली आहे. नागपूर शहरातील अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर एक चित्रफीत व्हायरल झाली. या टोळीने एका मुलाचे अपहरण केल्याचीही चर्चा होती. पोलिसांनी तातडीने मुलाला शोधले. त्याच्या वडिलाचा दुधाचा व्यवसाय आहे. मुलगा दूध वितरणासाठी गेला, घरी परतताना दुधाच्या कॅनचे झाकण कुठेतरी पडले. वडील रागावतील, या भीतीने मुलगा बेपत्ता झाला होता. 

पुण्यातही अशीच अफवा पसरली असल्याने पालक घाबरले आहेत. नेहमीप्रमाणे अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे; परंतु अशा किती प्रकरणांत कारवाई झाली, याचे उत्तर मिळत नाही. खोट्याला अफवेचे पंख मिळाले, तर खोट्याचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त होतो.  एखाद्या अफवेत इतकी ताकद असते, की एखाद्याचा जीव घेतल्यानंतरच जमाव संतप्त होतो. अफवा वणव्यासारख्या पसरतात आणि मॉब लिंचिंगला जन्म देतात. त्यात गुंतलेल्या प्रत्येक माणसाची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती निघून जाते. निष्पापांना मारहाण करणे हा संतप्त जमावाचा उद्देश असतो. अफवांप्रमाणे हल्ली व्हिडीओ चित्रफिती पसरत जातात, मग सुरू होते, मॅाब लिंचिंगची मालिका.

टॅग्स :Kidnappingअपहरण