शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुले पळविणारी टोळी; तुमच्या गावात आली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 10:55 IST

अफवा वणव्यासारख्या पसरतात आणि जिवंत माणसांना पकडून त्यांचा जीव घेतात. माणसांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती निघून जाते.

राही भिडे,ज्येष्ठ पत्रकार

कानोकानी अफवा पसरविण्याचे दिवस कधीच संपले,  वाट्टेल त्या अफवा पसरवून दंगे, धोपे करण्यासाठी आता समाजमाध्यमांचा वापर केला जात आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता, समाजमन दुभंगल्याने मुजफ्फरनगरची दंगल झाली होती. गोवंश हत्येच्या अफवांनी कितीतरी जणांचा बळी घेतला. आता मुले पळविणाऱ्या टोळ्यांच्या अफवेतून संतप्त झालेला जमाव कायदा हातात घेऊन दिसेल त्याला मारहाण करीत सुटला आहे. गेल्या दोन वर्षांंपासून या घटना घडत असतानाही अशा प्रकारच्या अफवांचे निराकरण करण्यात पोलीस, समाज आणि सरकारला अद्याप यश आलेले नाही.

दोन वर्षांपूर्वी ओडिशात समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या दोघांचा मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयावरून बळी घेतला गेला. त्यानंतर, पालघरमध्ये दोन साधूंना अशाच प्रकारे जमावाने मारले. अशा घटनांना नंतर हिंदू-मुस्लीम, हिंदू-ख्रिश्चन असे धार्मिक वळण देण्याचे प्रकारही झाले. राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला गेला. पालघर साधू हत्याकांडात तर थेट सोनिया गांधी यांनाही  ओढले गेले. योगी आदित्यनाथांपासून अनेक जण त्यावर बोलले. त्यानंतर, उत्तर प्रदेशातच एका साधूची हत्या झाल्याने, महाराष्ट्रावर तिकडून होणारी टीका थांबली. 

कोणत्याही गोष्टीचे राजकारण करण्याची आपली वृत्ती असल्याने, अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकांचे फावते. दंगली घडवून त्यातून आपली पोळी भाजणारे काही कमी नाहीत. ज्या वेगाने अफवा पसरविल्या जातात, त्याच वेगाने त्यांचे निराकरण करण्याची कोणतीही यंत्रणा सरकारकडे नाही. आताही सांगलीत दोन साधूंना मारहाण करण्यामागे गैरसमजच जास्त आहेत. तिथल्या घटनेवर पडदा पडत नाही, तोच नांदेड, बुलडाण्यातही मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयातून अनेकांना मारहाण करण्यात आली.

अपहरणकर्ते शहरात फिरत असल्याचे संदेश ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत असून, त्याच धास्तीतून राज्यात अनेक ठिकाणची परिस्थिती गंभीर वळणावर पोहोचली आहे. नाशिकमध्ये मित्राची चेष्टामस्करी करण्यासाठी बुरखा घालून गेलेल्या तरुणाला नागरिकांनी बेदम चोप दिला. पोलीस वेळीच पोहोचल्याने या तरुणाची सुटका झाली. जळगावमध्ये तोंडाला रुमाल बांधलेल्या एका महिलेला मारहाण करण्यात आली. पुणे आणि नागपुरातही या अफवा पसरल्याने घबराट पसरली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका महिला मुले चोरत असल्याचा संशय आल्याने मारहाण करण्यात आली. कुठलीही खात्री न करता, तसेच महिलेस बाजू मांडण्याची संधी न देता या महिलेस चपलांनी मारहाण करण्यात आली. ही महिला बेघर असल्याचे स्पष्ट झाले.

मुंबईप्रमाणेच नागपूर व पुण्यातही मुले चोरणाऱ्या टोळीबाबतची अफवा पसरली आहे. नागपूर शहरातील अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर एक चित्रफीत व्हायरल झाली. या टोळीने एका मुलाचे अपहरण केल्याचीही चर्चा होती. पोलिसांनी तातडीने मुलाला शोधले. त्याच्या वडिलाचा दुधाचा व्यवसाय आहे. मुलगा दूध वितरणासाठी गेला, घरी परतताना दुधाच्या कॅनचे झाकण कुठेतरी पडले. वडील रागावतील, या भीतीने मुलगा बेपत्ता झाला होता. 

पुण्यातही अशीच अफवा पसरली असल्याने पालक घाबरले आहेत. नेहमीप्रमाणे अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे; परंतु अशा किती प्रकरणांत कारवाई झाली, याचे उत्तर मिळत नाही. खोट्याला अफवेचे पंख मिळाले, तर खोट्याचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त होतो.  एखाद्या अफवेत इतकी ताकद असते, की एखाद्याचा जीव घेतल्यानंतरच जमाव संतप्त होतो. अफवा वणव्यासारख्या पसरतात आणि मॉब लिंचिंगला जन्म देतात. त्यात गुंतलेल्या प्रत्येक माणसाची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती निघून जाते. निष्पापांना मारहाण करणे हा संतप्त जमावाचा उद्देश असतो. अफवांप्रमाणे हल्ली व्हिडीओ चित्रफिती पसरत जातात, मग सुरू होते, मॅाब लिंचिंगची मालिका.

टॅग्स :Kidnappingअपहरण