शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

विशेष लेख: गंभीर आजारांच्या उपचारासाठी जगाचे डोळे भारताकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 09:20 IST

योग्य उपचारांची शाश्वती आणि तुलनेने अल्पदरात उपचार, यामुळे परदेशातून उपचारासाठी भारतात येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढते आहे.

डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असो., महाराष्ट्र|

कोणताही दीर्घकालीन आणि प्राण गंभीर आजार सर्वसामान्यांच्या छातीत धडकी भरवतो. त्यातही कर्करोग म्हटले की भल्याभल्यांचे हातपाय गळून जातात. पण कर्करोगावर उपचार होऊ शकतात आणि वैद्यकीय शास्त्रातील काही आधुनिक उपचार पद्धतींनी, काही कर्करोग बरेही होतात आणि बरेचसे नियंत्रणात येतात.

कर्करोगाच्या संदर्भात किचकट आजार आणि त्यावरील उपचारही बरेच महागडे, यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना ‘आता काय करायचे?’ म्हणून धडकी भरते. पाश्चात्त्य देशात विविध आजारांवरील उपचार अतिशय महागडे आणि सधन कुटुंबातील लोकांनाही न परवडणारे असल्याने काही गंभीर आजार उद्भवले की ते भारतात धाव घेतात. योग्य उपचारांची शाश्वती आणि तुलनेने अल्पदरात उपचार, यामुळे परदेशातून उपचारासाठी भारतात येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. भारतातही कर्करोगाच्या रुग्णांची संख्या कमी नाही.

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च या मान्यताप्राप्त भारतीय वैद्यकीय नियतकालिकात, नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, २०२० मध्ये भारतात कर्करोगाचे अंदाजे १४,६१,४२७ रुग्ण होते. हे प्रमाण, दर १ लाख भारतीयांमध्ये सरासरी १०० जण कर्करोगग्रस्त असल्याचे दर्शवते. दर नऊ भारतीयांमधील एकाला आयुष्यभरात केव्हा तरी कर्करोग होण्याची शक्यता असते. पुरुषांमध्ये फुप्फुसांचा, स्त्रियांमध्ये स्तनाचा आणि १४ वर्षांपेक्षा लहान मुलामुलींमध्ये रक्ताचा कर्करोग (लिम्फॉइड ल्युकेमिया) मोठ्या प्रमाणात आढळून आले. संशोधकांच्या अनुमानानुसार २०२५ पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांमध्ये १२.८ टक्के वाढ होऊ शकते.

कर्करोगाच्या उपचारांसाठी पुढील काही महत्त्वाच्य पद्धती आज उपलब्ध आहेत.

१. शस्त्रक्रिया : यामध्ये कर्करोगाची गाठ आणि आसपासच्या उती काढून टाकल्या जातात. पहिल्या टप्प्यात शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.२. केमोथेरपी : कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची वाढ थांबवण्यासाठी, कर्करोगाच्या गाठीचा आकार कमी करण्यासाठी, केमोथेरपीमध्ये काही विशेष औषधे शिरेवाटे दिली जातात. याचा वापर दुसऱ्या टप्प्यानंतर केला जातो.३. रेडिएशन थेरपी : कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी, त्यांची वाढ रोखण्यासाठी आणि ट्यूमर संकुचित करण्यासाठी किरणोत्सर्गी पदार्थांचे उच्च डोस या पद्धतीत वापरतात. शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही अशा प्रमाणात कर्करोगाची वाढ झाली असेल, तर तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात रेडिएशन दिले जाते. 

कर्करोग रुग्णाची आर्थिक परिस्थिती बघत नाही. त्यामुळे गोरगरिबांनाच नव्हे, तर मध्यमवर्गीयांसाठीही हे उपचार आर्थिक कुवतेच्या पलीकडे असतात. पाश्चात्त्य नागरिकांची उपचारासाठी भारतात धाव घेण्यामागे केवळ आर्थिक बचत हे कारण नसून भरवशाचा उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि त्यांना मिळणाऱ्या सोयी हेदेखील एक कारण आहे.  कर्करोग, हृदयाच्या शस्त्रक्रिया, मेंदूच्या शस्त्रक्रिया, अवयवारोपण अशा अनेक वैद्यकीय उपचारांसाठी जगभरातून लाखो रुग्ण दरवर्षी भारतात येतात. रास्त दर, उच्च-गुणवत्तेची वैद्यकीय सेवा, अल्पप्रतीक्षा कालावधी, प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, वैविध्यपूर्ण उपचार पर्याय, भाषिक आणि सांस्कृतिक संवेदनशीलता.. या सर्व गोष्टींमुळे आपला देश लाखो परदेशी रुग्णांसाठी लोकप्रिय ठिकाण बनत आहे. परंतु आजमितीला काही ठरावीक खासगी हॉस्पिटल्स आंतरराष्ट्रीय रुग्णांना आकर्षित करत आहेत. मात्र या गोष्टींचे नियोजन मोठ्या प्रमाणात, सर्वसमावेशक दृष्टीने, अधिक शिस्तबद्ध आणि आकर्षक व्यावसायिक पद्धतीने जगभरात सादर केले गेल्यास भारतात आणखी रुग्ण येतील. परिणामी आपल्याला अधिक परकीय चलन तर मिळेलच; पण त्यामुळे या वैद्यकीय सेवांचा खर्च कमी होऊ शकेल. त्याचा फायदा निश्चितच परदेशी आणि गरीब भारतीय रुग्णांना मिळू शकेल.

(avinash.bhondwe@gmail.com)

टॅग्स :cancerकर्करोगMedicalवैद्यकीय