शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: गंभीर आजारांच्या उपचारासाठी जगाचे डोळे भारताकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 09:20 IST

योग्य उपचारांची शाश्वती आणि तुलनेने अल्पदरात उपचार, यामुळे परदेशातून उपचारासाठी भारतात येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढते आहे.

डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असो., महाराष्ट्र|

कोणताही दीर्घकालीन आणि प्राण गंभीर आजार सर्वसामान्यांच्या छातीत धडकी भरवतो. त्यातही कर्करोग म्हटले की भल्याभल्यांचे हातपाय गळून जातात. पण कर्करोगावर उपचार होऊ शकतात आणि वैद्यकीय शास्त्रातील काही आधुनिक उपचार पद्धतींनी, काही कर्करोग बरेही होतात आणि बरेचसे नियंत्रणात येतात.

कर्करोगाच्या संदर्भात किचकट आजार आणि त्यावरील उपचारही बरेच महागडे, यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना ‘आता काय करायचे?’ म्हणून धडकी भरते. पाश्चात्त्य देशात विविध आजारांवरील उपचार अतिशय महागडे आणि सधन कुटुंबातील लोकांनाही न परवडणारे असल्याने काही गंभीर आजार उद्भवले की ते भारतात धाव घेतात. योग्य उपचारांची शाश्वती आणि तुलनेने अल्पदरात उपचार, यामुळे परदेशातून उपचारासाठी भारतात येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. भारतातही कर्करोगाच्या रुग्णांची संख्या कमी नाही.

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च या मान्यताप्राप्त भारतीय वैद्यकीय नियतकालिकात, नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, २०२० मध्ये भारतात कर्करोगाचे अंदाजे १४,६१,४२७ रुग्ण होते. हे प्रमाण, दर १ लाख भारतीयांमध्ये सरासरी १०० जण कर्करोगग्रस्त असल्याचे दर्शवते. दर नऊ भारतीयांमधील एकाला आयुष्यभरात केव्हा तरी कर्करोग होण्याची शक्यता असते. पुरुषांमध्ये फुप्फुसांचा, स्त्रियांमध्ये स्तनाचा आणि १४ वर्षांपेक्षा लहान मुलामुलींमध्ये रक्ताचा कर्करोग (लिम्फॉइड ल्युकेमिया) मोठ्या प्रमाणात आढळून आले. संशोधकांच्या अनुमानानुसार २०२५ पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांमध्ये १२.८ टक्के वाढ होऊ शकते.

कर्करोगाच्या उपचारांसाठी पुढील काही महत्त्वाच्य पद्धती आज उपलब्ध आहेत.

१. शस्त्रक्रिया : यामध्ये कर्करोगाची गाठ आणि आसपासच्या उती काढून टाकल्या जातात. पहिल्या टप्प्यात शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.२. केमोथेरपी : कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची वाढ थांबवण्यासाठी, कर्करोगाच्या गाठीचा आकार कमी करण्यासाठी, केमोथेरपीमध्ये काही विशेष औषधे शिरेवाटे दिली जातात. याचा वापर दुसऱ्या टप्प्यानंतर केला जातो.३. रेडिएशन थेरपी : कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी, त्यांची वाढ रोखण्यासाठी आणि ट्यूमर संकुचित करण्यासाठी किरणोत्सर्गी पदार्थांचे उच्च डोस या पद्धतीत वापरतात. शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही अशा प्रमाणात कर्करोगाची वाढ झाली असेल, तर तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात रेडिएशन दिले जाते. 

कर्करोग रुग्णाची आर्थिक परिस्थिती बघत नाही. त्यामुळे गोरगरिबांनाच नव्हे, तर मध्यमवर्गीयांसाठीही हे उपचार आर्थिक कुवतेच्या पलीकडे असतात. पाश्चात्त्य नागरिकांची उपचारासाठी भारतात धाव घेण्यामागे केवळ आर्थिक बचत हे कारण नसून भरवशाचा उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि त्यांना मिळणाऱ्या सोयी हेदेखील एक कारण आहे.  कर्करोग, हृदयाच्या शस्त्रक्रिया, मेंदूच्या शस्त्रक्रिया, अवयवारोपण अशा अनेक वैद्यकीय उपचारांसाठी जगभरातून लाखो रुग्ण दरवर्षी भारतात येतात. रास्त दर, उच्च-गुणवत्तेची वैद्यकीय सेवा, अल्पप्रतीक्षा कालावधी, प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, वैविध्यपूर्ण उपचार पर्याय, भाषिक आणि सांस्कृतिक संवेदनशीलता.. या सर्व गोष्टींमुळे आपला देश लाखो परदेशी रुग्णांसाठी लोकप्रिय ठिकाण बनत आहे. परंतु आजमितीला काही ठरावीक खासगी हॉस्पिटल्स आंतरराष्ट्रीय रुग्णांना आकर्षित करत आहेत. मात्र या गोष्टींचे नियोजन मोठ्या प्रमाणात, सर्वसमावेशक दृष्टीने, अधिक शिस्तबद्ध आणि आकर्षक व्यावसायिक पद्धतीने जगभरात सादर केले गेल्यास भारतात आणखी रुग्ण येतील. परिणामी आपल्याला अधिक परकीय चलन तर मिळेलच; पण त्यामुळे या वैद्यकीय सेवांचा खर्च कमी होऊ शकेल. त्याचा फायदा निश्चितच परदेशी आणि गरीब भारतीय रुग्णांना मिळू शकेल.

(avinash.bhondwe@gmail.com)

टॅग्स :cancerकर्करोगMedicalवैद्यकीय