शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

विशेष लेख: शहरांमधल्या वाढत्या झोपडपट्ट्यांचे काहीच का होत नाही?

By संदीप प्रधान | Updated: August 28, 2024 08:19 IST

शहरीकरणानंतर वाढणाऱ्या घरांच्या किमती आणि झोपडपट्टीत राजकीय पक्षांना दिसणाऱ्या मतपेढ्या, यामुळे जगाच्या अंतापर्यंत झोपडपट्टीमुक्ती दिवास्वप्नच ठरेल!

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, ठाणे |

गेटवे ऑफ इंडिया, ताज-महाल हॉटेल, एशियाटिक सोसायटी किंवा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज ही जशी मुंबईची ओळख आहे, तशीच व तेवढीच घट्ट ओळख येथील झोपडपट्ट्या हीदेखील आहे.  विदेशातून आलेले विमान जेव्हा मुंबई विमानतळावर उतरते तेव्हा खाली दिसणाऱ्या हजारो झोपड्याच लक्ष वेधून घेतात. मुंबईतील टॉवर व त्यामधील कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट हा जसा अप्रूपाचा विषय आहे, त्याचप्रमाणे लाखो रुपयांना विकली जाणारी झोपडी हाही कुतूहलाचा विषय आहे. झोपडपट्टी ही आता केवळ मुंबई, पुणे शहरांची समस्या नाही. नागरीकरणाची पावले जेथे जेथे उमटली,  तेथे तेथे झोपडपट्टी कुत्र्यांच्या छत्रीप्रमाणे उभी राहिली. झोपडपट्टीमुक्त मुंबईचे ध्येय हवे असे मत अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. याकरिता महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, मंजुरी आणि पुनर्विकास) कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीचा आग्रह न्यायालयाने धरला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जुलै महिन्यात ‘झोपू’ कायद्याचे ऑडिट करण्यासाठी विशेष खंडपीठ स्थापन केले. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या अपयशाबद्दल न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली. झोपडपट्टी विकासातील विकासकांच्या मनमानीबद्दल कोर्टाने कान टोचले.

स्वातंत्र्यानंतर सात दशके उलटली तरी किमान निम्म्या लोकसंख्येच्या निवाऱ्याची मूलभूत गरज पूर्ण करण्यात आलेल्या अपयशाचा  झोपडपट्टी हा पुरावा आहे. शहर विकसित झाल्यानंतर तेथे उद्योगधंदे, व्यापाराच्या निमित्ताने देशातील अप्रगत भागातून लोंढे येतात. उद्योगांमध्ये ज्याप्रमाणे सफेद कॉलर कर्मचारीवर्ग लागतो, त्याचप्रमाणे चतुर्थश्रेणी कामगारांचीही गरज असते. या वर्गाच्या पक्क्या निवासाची कुठलीही व्यवस्था वर्षानुवर्षे न केल्याने झोपडपट्ट्या उदयाला आल्या. राजकीय नेत्यांना सत्तरच्या दशकापासून या झोपडपट्ट्यांमध्ये मतपेढ्या दिसू लागल्याने त्यांनी पोसलेल्या झोपडपट्टीदादांनी झोपडपट्ट्या कशा फोफावतील, तेथे राहायला येणाऱ्यांना संरक्षण कसे प्राप्त होईल, याची काळजी वाहिली. 

एकेकाळी धारावी ही आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून नावारूपाला आली. मात्र कालांतराने धारावीपेक्षा मोठ्या किमान पाच भल्यामोठ्या झोपडपट्ट्या मुंबई व उपनगर परिसरात उभ्या राहिल्या. मुंबईसारख्या शहरात निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या झोपडपट्टीत वास्तव्य करू लागल्याने झोपडपट्टी पुनर्विकास योजनेने जन्म घेतला. अगदी सुरुवातीला या योजनेतील घराकरिता १५ हजार रुपये भरण्याची अट होती. मात्र लोकानुनयाच्या राजकीय चढाओढीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना मोफत घराचे गाजर दाखवले. परकीय लोंढ्याला विरोध करणाऱ्या शिवसेनेने मोफत घरांची घोषणा केल्यानंतर मुंबईकडे येणारे लोंढे वाढले, असा दावा केला जात होता. 

झोपडपट्टी पुनर्विकास योजना ही राजकारणातील काळा पैसा पांढरा करण्याची  संधी ठरली. यानिमित्ताने अनेक राजकीय नेते किंवा त्यांची मुले, जावई बिल्डर झाले. एखाद्या विभागातील झोपडपट्टी योजना ताब्यात घेण्याकरिता राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे, वाद झाल्याचे व वेळप्रसंगी खूनबाजी झाल्याच्या घटना घडल्या. अनेक झोपू योजनांत झोपडपट्टीवासीयांत दोन तट पडून योजना ठप्प झाल्या. काही योजनेत बिल्डरांनी इमारती उभ्या केल्या व घरे विकली. मात्र, झोपडपट्टीवासीयांना वाऱ्यावर सोडले. झोपड्यांवर कारवाई करण्याकरिता पोलिस बंदोबस्त मिळत नाही, ही महापालिकांची वर्षानुवर्षांची तक्रार आहे. कालांतराने कच्च्या झोपड्या पक्क्या व पक्क्या झोपड्यांच्या जागी  बहुमजली झोपड्या उभ्या राहतात. 

झोपडपट्टी विकासानंतर टॉवर उभे राहिले. झोपडपट्टीत राहिलेल्या अनेकांना अशा बहुमजली इमारतींमधील घरांत वास्तव्य करणे पचनी पडत नाही. घरगुती उद्योग करून चरितार्थ चालवणाऱ्या महिलांचे तर उत्पन्नाचे साधन बंद होते. त्यामुळे अनेकजण झोपू योजनेत बांधलेली घरे विकून पुन्हा दुसरीकडे झोपडीत वास्तव्याला जातात, असे निदर्शनास आले आहे. धारावी झोपडपट्टी विकासात एक अडथळा पापड, कुरडया व वाळवण करून चरितार्थ चालवणाऱ्यांचा आहे. आता तर मुंबईतील २३३ झोपडपट्ट्यांमधील २ लाख १३ हजार झोपडीधारकांना पक्की घरे देण्याची जबाबदारी सात वेगवेगळ्या प्राधिकरणांवर सोपवली जाणार आहे. म्हाडा किंवा सिडकोसारख्या घरबांधणी करणाऱ्या एजन्सीची अल्प उत्पन्न गटातील घरे कोट्यवधी रुपयांना विकली जात असतील तर निवाऱ्यासारखा मूलभूत प्रश्न कसा सुटणार? शहरीकरणानंतर वाढणाऱ्या घरांच्या अवाचे सवा किमती आणि झोपडपट्टीत राजकीय पक्षांना दिसणाऱ्या मतपेढ्या यामुळे जगाच्या अंतापर्यंत तरी झोपडपट्टीमुक्त मुंबईच काय, पण कुठलेही शहर हे दिवास्वप्न ठरेल ! 

टॅग्स :Mumbaiमुंबई