शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

विशेष लेख: सर्वांना शरद पवारांच्या गाडीत का बसायचे आहे?

By यदू जोशी | Updated: August 30, 2024 07:48 IST

फडणवीस-अजित पवारांचे राजकारण छेदण्याचा थोरल्या पवारांचा प्रयत्न; पण शिंदेंना हात न लावणे ही राजाला सोडून प्रधानाला टिपण्याची खेळी आहे!

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत |

लोकसभेच्या दहाच जागा त्यांनी महाविकास आघाडीत स्वत:च्या पक्षासाठी घेतल्या आणि आठ निवडून आणल्या. सातारच्या पराभवाला पिपाणी कारणीभूत ठरली; नाहीतर नऊ आल्या असत्या.  स्वत:चा पुतण्या, इतर दमदार नेत्यांनी साथ सोडलेल्या शरद पवारांच्या पक्षाचा स्ट्राइक रेट इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त होता. विधानसभेसाठीही ते व्यवस्थित मांडणी करत आहेत. झोपलेली मुंगी आणि थकलेले पवार कोणी पाहिले आहेत का? भाजपशी तशी खूप जवळीक असलेले एक पत्रकार काही महिन्यांपूर्वी पवार साहेबांना भेटले, साहेबांना त्या पत्रकाराची वैचारिक भूमिका, जवळीक हे सगळेच माहिती होते. तरीही त्यांनी खूप आस्थेवाईकपणे  विचारपूस केली. आपण ज्यांच्या जवळचे आहोत ते तर आपल्याला कधीच असे आपलेपणाने विचारत नाहीत आणि साहेब किती आस्थेने बोलताहेत हे अनुभवून त्या पत्रकारास एकाच वेळी खंत वाटली अन्  सुखद धक्काही बसला. पवारांचे हे असे आहे; इतरांना पवार व्हायला वेळ लागेल. 

राजकारणाच्या अनुषंगाने असलेली जातीय समीकरणे, सांस्कृतिक वातावरण, सामाजिक संदर्भ यांचे बोट धरून राजकारण कसे करायचे हे त्यांना खूप चांगले जमते. गोपीनाथ मुंडेंना ते जमत असे. देवेंद्र फडणवीस यांनाही या सगळ्या बाबींचा उत्तम अभ्यास आहे; फक्त ते ‘फडणवीस’ आहेत हीच काय ती अडचण. मात्र, सामाजिकतेच्या पायरीवर उभे राहत पुढचे पाऊल राजकारणाच्या पायरीवर टाकत सत्ताकारणाच्या इमारतीत प्रवेश मिळविणे हा या तिघांमधला समान धागा! राजकीय हुशारीबाबत पवारांचा हात कोणी धरू शकत नाही, ते केव्हा काय करतील याचा नेम नसतो, म्हणूनच तर विरोधकांबरोबरच मित्रही त्यांच्याबाबत सावध असतात. 

महायुतीत अस्वस्थ असलेल्यांना शरद पवारांकडे जावेसे वाटते यामागे त्या-त्या मतदारसंघातील समीकरणे हे कारण तर आहेच शिवाय ८३ व्या वर्षीही पवार चमत्कार करू शकतात, हा विश्वास लोकांना वाटतो. काँग्रेसकडे जायला लोक बिचकतात. एका नेत्याच्या माध्यमातून गेलो तर दुसरा आपल्याला टार्गेट करेल, त्यापेक्षा न गेलेले बरे असे बहुतेकांना वाटते. अजित पवार यांच्याकडे सत्ता आहे, वय आहे, ७५ टक्के पक्षही ते घेऊन गेले तरीही काका आपली माणसे पळवून नेतील अशी भीती त्यांना वाटत असते. नीलेश लंके, बजरंग सोनवणे तिकडे गेले; खासदार झाले. आता राजेंद्र शिंगणे, अतुल बेनके त्याच वाटेवर आहेत, आणखी चार आमदार वाटेवर आहेत. मोठ्या पवारांच्या गाडीत बसण्यासाठी बरेचजण इच्छुक आहेत. अजित पवार यांना घेतल्यापासून भाजपचा कोअर कार्यकर्ता डिस्टर्ब असल्याचे अनेकदा बोलले गेले; पण भाजप जागावाटपाची चर्चा सुरू करत नसल्याने अजित पवार गटात प्रचंड नाराजी आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायला जितका विलंब होईल, तितके मोठ्या साहेबांकडे आपली माणसे जाण्याचे प्रमाण वाढेल, असे अजित पवार गटाला साहजिकच वाटते. पुतण्याच्या गोटातील ही अस्वस्थता काकांच्या पथ्यावर पडत आहे. 

शरद पवारांचे सध्याचे राजकारण बारकाईने बघा, ते फडणवीस-अजित पवार यांचे राजकारण छेदण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत; एकनाथ शिंदेंना त्यांनी हात लावलेला नाही. उलट या ना त्या कारणांनी ते त्यांना भेटत आहेत. राजाला सोडून प्रधानाला मारण्याची ही खेळी आहे. बुद्धिबळात प्रधानाला मारले की, नऊ पॉइंट्स मिळतात आणि ते विनिंग ॲडव्हान्टेज असते. एकदा प्रधान मारला की, राजाला टिपण्याचा मार्ग मोकळा होतो. अशावेळी, ‘मारला तर प्रधान जात आहे ना, मला काय फरक पडतो, असा विचार राजा करत असेल तर ती त्याची मोठी चूक ठरू शकते; कारण नंतर लगेचच त्याचा नंबर असतो हे त्याने लक्षात घेतले पाहिजे.’

कार्यकर्त्यांना चांगले दिवसकैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, फग्गनसिंह कुलस्ते असे  पक्षाच्या  कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेले मध्य प्रदेशातील नेते सध्या महाराष्ट्रात सक्रिय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीचे केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव, अश्वनी वैष्णव यांनी सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. यादव हे दहा-बारा दिवसांपासून पाठदुखीने कमालीचे त्रस्त आहेत; पण महाराष्ट्राकडे बारीक लक्ष असते त्यांचे. यादव हे हेडमास्तर आहेत, महाराष्ट्रातील भाजपच्या मुलांना त्यांचेच ऐकावे लागते. काही मुद्दे पटत नाहीत; पण अपिलाची सोय कुठे आहे? लोकसभेपेक्षा विधानसभेसाठी भाजपचा अप्रोच बदलत आहे. कार्यकर्ता केंद्रस्थानी ठेवा, कार्यकर्त्याला ताकद द्या, चमकेगिरी करणाऱ्यांना बाजूला ठेवा यावर फोकस आहे. सतरंजी, चिवडेवाल्यांचे दिवस पुन्हा येतील का पण? 

विधानपरिषदेचा नियम! विधानपरिषदेच्या सदस्यांना विधानसभेची संधी द्यायची नाही, असे काहीतरी भाजपच्या अंतस्थ गोटात शिजते आहे म्हणतात.  हा निर्णय एव्हाना झालाही असता; पण अडचण चंद्रशेखर बावनकुळेंबाबत आहे. गेल्यावेळी त्यांचे तिकीट कापले होते, मग त्यांना विधानपरिषदेवर घेऊन  पुढे प्रदेशाध्यक्ष करत पुनर्वसन करण्यात आले. आता ते त्यांच्या कामठी या मतदारसंघातून लढणार अशी चर्चा असताना पक्षाने विधानपरिषद सदस्यांबाबत निर्णय घेतला तर त्यांची अडचण होईल. कामठीची जागा तेच जिंकू शकतात, असा पक्षाचा सर्व्हे आहे म्हणतात. त्यामुळे विधानपरिषदेच्या आमदारांबाबत सरसकट निर्णय घेणे भाजप नेतृत्वाला सोपे नाही.  प्रवीण दटके (नागपूर), राम शिंदे (कर्जत-जामखेड), प्रवीण दरेकर (मुंबई) यांनाही फटका बसू शकतो.  अर्थात, दरेकरांच्या ते पथ्यावरच पडेल म्हणा. जनतेतून न लढता आमदारकी मिळत राहणार असेल तर ती कोणाला नको आहे? 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस