शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: म्यानमारमधील भूकंपातून आपण काय बोध घ्यावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 14:00 IST

Earthquake Mumbai: मध्यंतरी आयआयटी मुंबई यांच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विभागाच्या मदतीने मुंबईत भूकंप झाल्यास काय परिस्थिती उद्भवेल याचा अभ्यास केला गेला.

-सीताराम कुंटे (माजी मुख्य सचिव)नुकताच म्यानमार आणि थायलंडमध्ये प्रचंड भूकंप आला. त्यामुळे झालेला हाहाकार आपण बघितला. अनेक घरं पडली. त्याखाली अनेकजण दबून मरण पावली. आपल्या शेजारी देशात नेपाळ आणि पाकिस्तानात काही वर्षांपूर्वी भूकंपामुळे प्रचंड नुकसान झालेले आपण पाहिले आहे. दिल्लीत आणि उत्तर भारतात भूकंपाचे सौम्य धक्के अधूनमधून बसत असतात. गुजरातच्या भूजला २००१ मध्ये प्रलयंकारी भूकंपाचा तडाखा बसला. 

महाराष्ट्रात कोयना (१९६०) आणि लातूरला १९९३ मध्ये भूकंप येऊन गेला आहे. आपण या सर्वांतून काय बोध घ्यावा? तर भूकंपाच्या धोक्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आपण राहतो त्या घरांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतली पाहिजे. 

भूकंपाच्या संदर्भात बरेच संशोधन झाले आहे. प्रत्येक भागाची भूकंप प्रवणता शास्त्रज्ञांनी निर्धारित केली आहे. भारतातील भूभागाचे मूल्यांकन करून एकूण चार भागात भूकंप प्रवणता दर्शविण्यात आली आहे. झोन २, ३, ४ व ५. त्यापैकी झोन २ हे सर्वांत कमी धोक्याचे, तर झोन ५ हे सर्वाधिक धोक्याचे मानले गेले आहे. 

महाराष्ट्राचा विचार केला तर जीएसएचएपी हझार्ड मॅप ऑफ महाराष्ट्रप्रमाणे मध्य व पूर्व महाराष्ट्र झोन २ मध्ये आहे, म्हणजे तुलनेने कमी धोक्याचा भाग आहे. मात्र सातारा, रायगड, मुंबई झोन ४ मध्ये येतात, जिथे भूकंपाचा धोका अधिक आहे. भूकंप झाल्यास त्याची तीव्रताही जास्त असण्याची शक्यता आहे. अन्य भाग झोन ३ मध्ये येतात जिथे धोक्याचं प्रमाण तुलनेने सौम्य आहे. 

दुसरा महत्त्वाचा अभिलेख म्हणजे बीएमटीपीसी व्हलनरेबिलिटी ॲटलास ऑफ इंडिया ज्यात संपूर्ण देशाची माहिती सादर केली आहे. त्यातील महत्त्वाचे म्हणजे जिल्हानिहाय हाऊसिंग व्हलनरेबिलिटी टेबल्स दिले आहेत. त्यामध्ये जिल्हानिहाय घरांची संख्या, बांधकामाच्या प्रकारनिहाय दिलेली आहे. 

बांधकामाचा प्रकार महत्त्वाचा अशासाठी की भूकंपामुळे थेट प्राणहानी होणे अत्यंत कमी असते; मात्र पडलेल्या घरांमध्ये किंवा इमारतींमध्ये ढिगाऱ्याखाली अडकून अनेक जण मृत्युमुखी पडतात. किल्लारी असो किंवा भूज; त्या ठिकाणी दगडी व कच्च्या घरांमध्ये सर्वात जास्त जीवितहानी झाली. याउलट जापानकडे पाहिले की लक्षात येते, तिथे जास्त तीव्रतेने भूकंप आले तरी जीवितहानी फार कमी असते. त्याचे कारण भूकंपाचे धोके विचारात घेऊनच घरे व इमारती बांधल्या जातात. 

बीएमटीपीसीच्या आकडेवारीचे अवलोकन करता असे लक्षात येते की अजूनही अनेक लोकं भूकंपाच्या दृष्टीने असुरक्षित घरांमध्ये वास्तव्य करीत आहेत. 

मध्यंतरी आयआयटी मुंबई यांच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विभागाच्या मदतीने मुंबईत भूकंप झाल्यास काय परिस्थिती उद्भवेल याचा अभ्यास केला गेला. त्यातून असे निदर्शनास आले की बहुमजली झोपडपट्टी आणि सेस बिल्डिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या इमारती या सर्वांत जास्त धोकादायक आहेत. याशिवाय अशा इमारती ज्यांच्या बांधकामाच्या वेळी भूकंप प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, किंवा ज्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती वेळच्या वेळी केली गेली नाही अशा सर्व इमारती लोकांच्या जिवावर बेतू शकतात. 

खरं तर आता जे बिल्डिंग कोड वापरले जातात त्यांचे तंतोतंत पालन केले तर भूकंप आला तरी जीवितहानी टाळता येऊ शकते. शिवाय असे देखील नियम आहेत की दर ३० वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले पाहिजे आणि त्याच्या अहवालात दर्शविल्याप्रमाणे सुधारणा केलीच पाहिजे. जपानी लोकांकडून शिकून आपणदेखील भूकंपाबाबत जास्त सजग राहू शकतो.

पुनर्विकासाच्या धोरणांचा लाभ घेऊन मोडकळीस आलेल्या इमारतीतून बाहेर पडून नवीन इमारत बांधून घ्यावी. तसेच झोपडपट्टी विकासाच्या योजना हाती घेऊन बहुमजली झोपड्यांऐवजी नवीन इमारतीत राहायला जावे. जिथे इमारती चांगल्या बांधल्या आहेत; पण जुन्या आहेत तिथल्या सोसायट्यांनी वेळोवेळी नियमानुसार स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. 

भूकंपाचा अंदाज लावता येत नाही, तो नकळत येऊन आपले जीवन क्षणार्धात उद्ध्वस्त करू शकतो. म्हणूनच भूकंपाचे धोके ओळखून परिस्थितीप्रमाणे योग्य ती पावले उचलणे क्रमप्राप्त आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपNatural Calamityनैसर्गिक आपत्ती