शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

विशेष लेख: राजीव कुमार, कुठेतरी पाणी मुरते आहे हे नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:27 IST

Election Commission Of India: बोगस नावे घुसडून मतदारांची संख्या अचानक वाढणे, कुठे मतदार याद्या कचाकच कापल्या जाणे; हे सारे काय आहे? निवडणूक आयोगाला याचे उत्तर द्यावे लागेल!

- योगेंद्र यादव(राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान सदस्य, स्वराज इंडिया) 

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी त्यांच्या कारकिर्दीत निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल निर्माण झालेल्या प्रश्नांची थेट उत्तरे त्यांच्याकडून मिळाली, तर बरे होईल! कारण हे प्रश्न विचारणाऱ्यांनी निव्वळ शंका उपस्थित केलेल्या नाहीत, त्यासंदर्भात ठोस पुरावेही गोळा केले आहेत.

पहिला प्रश्न मतदार यादीतील घोटाळ्याबाबतचा. ‘सरकारी यंत्रणेच्या संगनमताने, निवडणूक आयोगाच्या डोळ्यादेखत नियम धाब्यावर बसवत,  विरोधकांची नावे मोठ्या प्रमाणावर रद्द करून भाजपने मतदार यादीत बोगस नावे घुसडली आहेत का?’ असा प्रश्न आज विचारला जात आहे.  

लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात ९.२९ कोटी मतदार होते. विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या ९.७० कोटी इतकी झाली. केवळ सहा महिन्यांत आणि तेही लोकसभा निवडणुकीत मतदार यादी पूर्णपणे दुरुस्त केलेली असताना  ४१ लाख  म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी १४,४०० मतदार कसे काय वाढले? लोकसंख्यावाढ विचारात घेता एवढ्या कालावधीत  जास्तीत जास्त ७ लाख नवे मतदार वाढणे अपेक्षित होते. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार हा ४१ लाखांचा आकडाही अपुरा आहे. कारण याच काळात किती नावे वगळण्यात आली हे आयोगाने जाहीर केलेले नाही. सरकारी आकड्यानुसार २०२४ मध्ये महाराष्ट्रात एकूण प्रौढ लोकसंख्याच मुळात ९.५४ कोटी इतकी होती. म्हणजे विधानसभेतील मतदारसंख्या एकूण प्रौढ लोकसंख्येपेक्षा १६ लाखांनी जास्त होती!  मतदार यादीतील मतदारांची संख्या  एकूण प्रौढ नागरिकांच्या संख्येपेक्षा जास्त असणे हे आक्रितच ठरते.  

उत्तर प्रदेशातील फरुकाबाद आणि मेरठ या दोन लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार फारच कमी मतांच्या फरकाने निवडून आले होते. न्यूज लाँड्रीचे पत्रकार सुनील मित्तल यांच्या पडताळणीतून असे सिद्ध झाले की, निवडणुकीपूर्वी  काही  दिवस तिथल्या काही मतदारांची नावे रद्द केली गेली. ही संख्या विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षाही जास्त होती. शिवाय गेल्या निवडणुकीत भाजपला अगदीच कमी मते पडलेल्या  बूथवरच अशी काटछाट झालेली होती.  दुसरीकडे भाजपचा प्रभाव असलेल्या बूथवर खोट्या पत्त्यावरचे  बोगस मतदार वाढवले गेले होते. यादीतील  नावे कमी करताना  निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले नियम खुंटीला टांगले गेल्याचेही या संशोधनात  आढळून  आले.  हे कृत्य  करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ‘वरून आलेले दडपण’ हेच याचे कारण असल्याचे सांगितले.  ‘द स्क्रोल’च्या शोधमोहिमेतूनही हीच गोष्ट समोर आली. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रत्येक विधानसभा क्षेत्रात  दहा हजारांहून अधिक नावे मतदार यादीतून कापत असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत झालेल्या सर्व बदलांबाबत निवृत्त होण्यापूर्वी एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध  करणे ही राजीव कुमार यांची नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी ठरते. 

लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी संध्याकाळी निवडणूक आयोगाने प्रसृत केलेली मतदानसंख्या  आणि अंतिम  मतदानसंख्या यात इतकी तफावत कशी, मतदानाचे अंतिम आकडे इतक्या उशिरा आणि तरीही अपुऱ्या स्वरूपात का दिले गेले, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर ‘मतदानाबद्दलची सर्व माहिती फॉर्म १७ सीमध्ये नोंदलेली असते आणि त्याची एक प्रत सर्व पक्षांना दिली जाते’ असे  सांगत निवडणूक आयोगाने हात वर केले; परंतु माहितीच्या अधिकाराखाली फॉर्म १७सी सार्वजनिक करण्याची मागणी केली तेव्हा मात्र त्यांनी तोंडात गुळणी धरली.  असोसिएशन ऑफ डेमॉक्रसी या संस्थेने निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ‘ईव्हीएम’मध्ये नोंदलेली मते आणि ‘ईव्हीएम’च्या मतमोजणीत आढळलेली मते या दोन आकड्यांत फरक का, असा प्रश्न आकडे देत विचारला आहे.  असा फरक एकूण ५४३ पैकी ५३६ मतदारसंघांत आढळून आला आहे. त्यापैकी काही ठिकाणी तर जेवढे मतदान झाले त्यापेक्षा जास्त मतदान मोजले गेले! ओडिशात लोकसभा आणि विधानसभा एकाचवेळी झाल्या होत्या. प्रत्येक मतदाराने एकाच मतदान केंद्रात दोन ‘ईव्हीएम’मध्ये आपली दोन मते टाकली होती. साहजिकच दोन्ही मशिन्समधील मतांची संख्या एकसारखीच असायला हवी होती; पण  तब्बल २१ संसदीय मतदारसंघांत लोकसभा आणि विधानसभेच्या मतांत फरक आहे.   

निवडणूक आयोगाने या साऱ्या प्रश्नांवर पडदा टाकला आहे. निवडणुकीसंबंधी सर्व कागदपत्रे आयोगाला जाहीर करावी लागू नयेत म्हणून निवडणूक नियम ९३ (२) मध्ये दुरुस्तीही केली गेली आहे. आता कोणती माहिती सार्वजनिक करायची आणि कोणती नाही याचा निर्णय सरकार आणि निवडणूक आयोग हे स्वत:च घेणार आहेत. याचा अर्थ पाणी कुठे तरी मुरते आहे. राजीव कुमार निवृत्त झाले तरी हे प्रश्न कसे निवृत्त होतील?     yyopinion@gmail.com

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान