शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

...आता कुणीही भारताला थांबवू शकत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 07:48 IST

‘मेक इन इंडिया’ची दशकपूर्ती हा भारताच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा आहे. सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणारे चैतन्य देशात निर्माण झाले आहे!

नरेंद्र मोदीपंतप्रधान

मेक इन इंडिया’ उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाली. या उपक्रमाला घवघवीत यश मिळवून देणाऱ्या प्रत्येकाला सलाम करण्याचा हा प्रसंग आहे. हे अथक परिश्रमाचे  सामूहिक अभियान आहे, ज्याने एका स्वप्नाचे एका शक्तिशाली चळवळीत रूपांतर केले आहे.

मेक इन इंडिया’च्या प्रभावातून हेच सिद्ध होते की, आता भारताला कुणीही थांबवू शकत नाही. भारत केवळ आयातदार नाही, तर निर्यातदारदेखील आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी उत्पादन क्षेत्रात भारताच्या प्रगतीला चालना देणे  या एका महत्त्वाकांक्षी उद्देशाने दहा वर्षांपूर्वी  हा प्रयत्न सुरू झाला. एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामर्थ्य आणि कौशल्याने  आपल्याला दूरचा पल्ला गाठून दिला  आहे. ‘मेक इन इंडिया’चा ठसा सर्व क्षेत्रांमध्ये दिसू लागला आहे. मी एक-दोन उदाहरणे देतो..

मोबाइल निर्मिती. २०१४ मध्ये संपूर्ण देशात मोबाइल निर्मिती करणारे केवळ दोन कारखाने होते. आज हा आकडा २०० हून अधिक झाला आहे. आपली  मोबाइल निर्यात अवघ्या  १,५५६ कोटींवरून तब्बल १.२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही वाढ ७५००% इतकी अवाढव्य आहे! आज भारतात वापरले जाणारे ९९% मोबाइल फोन ‘मेड इन इंडिया’ आहेत. जागतिक स्तरावर आपण दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे मोबाइल उत्पादक बनलो आहोत. त्याचबरोबर भारत पूर्णतः प्रक्रिया केलेल्या पोलादाचा निर्यातदार बनला आहे. २०१४ पासून उत्पादनात ५०% पेक्षा जास्तीची वाढ झाली आहे. सेमी कंडक्टर उत्पादन क्षेत्राने १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित केली असून, दररोज एकत्रितपणे ७ कोटी चिप्सचे उत्पादन घेण्याची क्षमता असलेल्या पाच प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. नवीकरणीय ऊर्जेच्या बाबतीत आपण जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे उत्पादक ठरलो आहोत. एका दशकात आपली क्षमता ४०० टक्क्यांनी वाढली आहे. आपले इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्र, जे खरे तर २०१४ मध्ये अस्तित्वातच नव्हते, ते आता ३ अब्ज डॉलर्स मूल्याचे झाले आहे. संरक्षण उत्पादनांची निर्यातही १,००० कोटी रुपयांवरून वाढून २१,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे आणि आपण ८५ पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करू लागलो आहोत.

खेळणी उद्योग क्षेत्राची गरज मी उपस्थित करताच, ही बाब प्रत्यक्षात कशी साकारावी हे भारतीय नागरिकांनीच सरकारला दाखवून दिले! गेल्या काही वर्षांत या क्षेत्रातली आपली निर्यात २३९ टक्क्यांनी वाढली असल्याचे आणि त्याच वेळी आयातीत निम्म्याने घट झाली. यामुळे खेळणी उद्योगातल्या स्थानिक उत्पादकांना आणि विक्रेत्यांना लाभ झाला आहे, लहान मुलांना तर निश्चितच झाला आहे! 

आपल्या देशाची ओळख बनलेल्या अनेक बाबींपैकी असलेल्या मुख्य बाबी म्हणजे आपली ‘वंदे भारत’ रेल्वेगाडी, ब्राम्होस क्षेपणास्त्रे आणि आपल्या हातात असलेले मोबाइल फोन. या सगळ्यांवर आता अभिमानाचा ‘मेक इन इंडिया’चा शिक्का लागला आहे. इलेक्ट्रॉनिक्सपासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंतचे हे यश भारतीय कल्पकता आणि गुणवत्तेची साक्ष देणारेच आहे.

‘मेक इन इंडिया’ या उपक्रमामुळे  गरिबांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि आकांक्षा बाळगण्याचे बळ मिळाले आहे. या उपक्रमाने त्यांना ते  साधनसंपत्तीचे निर्माते बनू शकतात हा आत्मविश्वास दिला आहे. या उपक्रमाचा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगक्षेत्रावर पडलेला प्रभावही तितकाच दखल घेण्याजोगा आहे. सरकार म्हणून आम्ही हे चैतन्य अधिक ऊर्जस्वल करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमची दशकभरातील कामगिरी पुरेशी बोलकी आहे. उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन- पीएलआय योजना परिवर्तनक्षम ठरल्या आहेत. त्यांनी हजारो, करोडोंची गुंतवणूक शक्य केली असून लाखो नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. व्यवसाय करण्यात सुलभता आणण्याच्या बाबतीतही सरकारने लक्षणीय पावले टाकली आहेत.

भारताला अनुकूल असे बरेच काही आज घडते आहे- लोकशाही, लोकसंख्या आणि मागणी या तीन महत्त्वाच्या सूत्रांचे आपला देश हे परिपूर्ण मिश्रण आहे. जागतिक पुरवठा साखळीमध्ये कळीची भूमिका बजावण्यासाठी आवश्यक त्या सर्व कळीच्या गोष्टी आपल्याकडे आहेत.  व्यवसायातील विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. आपल्या अभूतपूर्व युवाशक्तीचे यश स्टार्टअप जगतात प्रत्येकाला पाहता येत आहे. एकूणच, गती भारताला अनुकूल आहे. जागतिक ‘महासाथी’सारखी अनपेक्षित आव्हाने येऊनही भारताच्या वाढीची वाटचाल सातत्यपूर्ण राहिली. आज, आमच्याकडे जागतिक वाढीचा प्रेरक म्हणून पाहिले जात आहे. 

मी माझ्या युवा मित्रांना पुढे येण्याचे, ‘मेक इन इंडिया’त सहभागी होऊन हा उपक्रम नव्या उंचीवर नेण्याचे आवाहन करतो. सर्वोत्कृष्टतेसाठी सर्वांनीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. दर्जेदार पुरवठ्यासाठी आपण वचनबद्ध राहिले पाहिजे. शून्य त्रुटी हा आपला मंत्र असला पाहिजे. 

टॅग्स :Make In Indiaमेक इन इंडियाNarendra Modiनरेंद्र मोदी