शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

विशेष लेख: सार्वजनिक बँकांचे विलीनीकरण - बड्यांसाठी मोठ्या बँका; पण सर्वसामान्य जनतेचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:16 IST

सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांचे विलीनीकरणाद्वारे तीन ते चार बँकांमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने सरकारने वाटचाल सुरू केली आहे, त्याचा योग्य विचार व्हावा.

ॲड. कांतीलाल तातेड, अर्थशास्त्राचे अभ्यासक

जागतिक पातळीवरील बँकिंग प्रणाली व तंत्रज्ञानात होणारे बदल आत्मसात करून त्याद्वारे बँकांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांच्या कर्ज देण्याच्या व गुंतवणुकीच्या क्षमतेत वाढ करणे, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर इतर मोठ्या बँकांशी स्पर्धा करण्यासाठी त्यांना सक्षम करणे तसेच देशाचे २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांचे विलीनीकरणाद्वारे तीन ते चार बँकांमध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे, असे सरकारचे मत असून त्या दृष्टीने सरकारने वाटचाल सुरू केलेली आहे. 

याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने १२ व १३ सप्टेंबर रोजी दोनदिवसीय शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या बैठकीत बँकिंग क्षेत्रात आगामी काळात करावयाच्या सुधारणा तसेच सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर व्यापक प्रमाणात चर्चा करण्यात आली. भारताला २०४७ पर्यंत देशाच्या विकासदरात वाढ करण्यासाठी जवळपास साडेचार लाख कोटी डॉलर्स इतक्या रकमेच्या पायाभूत गुंतवणुकीची गरज असून, त्यासाठी डिजिटल तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशात व जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणाऱ्या तसेच देशातील मोठ्या प्रकल्पांना व उद्योगांना सहजगत्या मोठी कर्ज देऊ शकणाऱ्या मोठ्या व मजबूत बँकांची आवश्यकता आहे. जगातील पहिल्या १०० बँकांमध्ये भारताची केवळ स्टेट बँक असून, तीही मालमत्तेच्या आधारावर ४३व्या क्रमांकावर आहे. 

सन २०४७ पर्यंत भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील किमान एक-दोन बँकांनी तरी जगातील पहिल्या २० बँकांमध्ये स्थान मिळवावे असे सरकारला वाटते. सरकारी मालकीच्या बँकांचे खासगीकरण करणे सोपे जावे म्हणून २०२० मध्ये केंद्र सरकारने २७ राष्ट्रीयीकृत बँकांच्या विलीनीकरणाद्वारे १२ बँका करून बँकांच्या खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. २०२१-२२ सालासाठीचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन सरकारी मालकीच्या बँका, एक सर्वसाधारण विमा कंपनी यांचे खासगीकरण करण्याची तसेच ‘आयडीबीआय’ बँकेची विक्री करण्याची घोषणा केली होती; परंतु विविध राज्यांच्या विधानसभांच्या तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने बँकांच्या खासगीकरणाचे धोरण काही काळ स्थगित ठेवले होते. आता सरकारने ‘आयडीबीआय’ बँकेच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली असून, सरकारी बँकांचे खासगीकरण करणे सोपे जावे म्हणून १२ बँकांचे विलीनीकरण करून, तीन ते चार बँका करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

‘भारतातील विमा व बँकिंग क्षेत्र आमच्यासाठी खुले करा,’ ही अमेरिकेसह अन्य बड्या राष्ट्रांची गेल्या ४० वर्षांपासूनची सातत्याची मागणी आहे. या दडपणाखालीच सरकारने विमा क्षेत्र देशी व विदेशी कंपन्यांसाठी खुले केले असून आता विमाक्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा १०० टक्के करण्यासंबंधीचे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे. 

वास्तविक आयुर्विमा महामंडळ ही प्रचंड वित्तीय ताकद असलेली देशातील सर्वांत मोठी व जगातील चौथी सर्वांत मोठी विमा कंपनी आहे. आयुर्विमा महामंडळ जगातील तिसरा सगळ्यांत मजबूत विमा ब्रँड म्हणून ओळखला जातो. असे असताना सरकारने आयुर्विमा महामंडळाची निर्गुंतवणूक करून त्याद्वारे खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल का सुरू केली आहे? देशी व विदेशी विमा कंपन्यांनी महामंडळाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केलेले असून, सरकार लवकरच महामंडळामधील ६.५ टक्के हिस्सा विकणार आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या तीन ते चार बँका करण्याच्या नावाखाली त्या बँकांचे खासगीकरण करणे, हाच सरकारचा मुख्य हेतू आहे. 

सेवाशुल्कात भरमसाट वाढ करणे, ठेवींवरील व्याजदरात कपात करणे व त्याद्वारे मोठ्या प्रमाणात नफा मिळविणे हाच खासगी बँकांचा मुख्य हेतू असतो. या बँकांनी बचत खात्याच्या किमान शिल्लक रकमेत केलेली भरमसाट वाढ पाहता देशातील कोट्यवधी सर्वसामान्य लोक बँकिंग सेवेला वंचित होण्याची शक्यता आहे. यामुळे बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय योग्य आहे का, याचा सांगोपांग विचार करण्याची आवश्यकता आहे.

kantilaltated@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Bank Mergers: Big Banks for Corporates, What About Common People?

Web Summary : Public bank mergers aim for global competitiveness, but critics fear privatization, increased service charges, and reduced access for common citizens. Is it truly progress?
टॅग्स :bankबँक