शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

सारांश : कायद्याचा धाक ओसरतोय की काय?

By किरण अग्रवाल | Updated: August 13, 2023 15:59 IST

हत्यांसह गुन्हेगारी घटनांमधील वाढ चिंताजनक, समाजस्वास्थ्य बिघडविणारी

क्षुल्लक कारणातून कुणाची हत्या करताना कायद्याचा जराही धाक बाळगला जात नसेल तर अशी स्थिती पोलिसांसाठीच आव्हानात्मक ठरते. यातून समोर येणारी निडरता समाज स्वास्थ्यासाठी घातक असल्याने अकोला पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार करणे अपेक्षित आहे.

एखाद्या मेट्रो शहरातील गुन्हेगारीशी स्पर्धा करावी अशा पद्धतीने सध्या अकोला शहर व जिल्ह्यात हत्यांच्या घटना घडून येत असल्याने समाज मन धास्तावणे स्वाभाविक बनले आहे. दिवसेंदिवस उंचावणारा गुन्हेगारीचा हा आलेख रोखायचा तर त्यासाठी कायद्याचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे.

सामाजिक स्वास्थ्य ही तशी खूप मोठी संकल्पना झाली, त्यासाठी अनेक बाबींचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते; पण ती बिघडण्याच्या संदर्भाने विचार केला तर त्यात गुन्हे, घातपाताचे प्रकारच अधिक परिणामकारक ठरत असल्याचे दिसून येते. त्याचदृष्टीने अकोला जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकारांकडे बघितले जायला हवे, कारण त्यातून सामाजिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. पातुर तालुक्यात नात्यातीलच एका नराधमाने एका तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना अलीकडेच समोर आली. अशा घटना व्यापक स्तरावर समाजमन भयभीत करणाऱ्या ठरतात. वैयक्तिक तसेच सामाजिक सुरक्षिततेच्या भावनेला त्यातून धक्के बसत असल्याने या प्रकारांकडे गांभीर्याने बघणे गरजेचे होऊन बसते.

अकोला शहर व जिल्ह्यात गेल्या जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजे सात-साडेसात महिन्यांत तब्बल २७ खुनाच्या घटना घडल्या आहेत. यातील दोन खून हे चक्क पिस्तूलने गोळी झाडून केले गेले आहेत. प्राणघातक हल्ल्यांचे प्रकार ३५ ते ४० घडले आहेत. छोट्या मोठ्या चोऱ्या वा लुटीचे प्रकारही काही कमी नाहीत. अकोल्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे असे राजकीय स्वरूपाचे आरोप योग्य ठरणार नाहीत, मात्र कायद्याचा धाक कमी होत चालला आहे की काय, असा प्रश्न ही आकडेवारी पाहता नक्कीच उपस्थित व्हावा. मेट्रो शहरांनाही लाजवणारी ही हत्यांची आकडेवारी आहे.

विशेष म्हणजे अतिशय किरकोळ कारणातून थेट खून व भोसकाभोसकीचे प्रकार घडून आल्याचे दिसून येते. याच आठवड्यातले उदाहरण घ्या. हिंगणा फाटा परिसरात केवळ शिवीगाळ केल्याचा राग आल्याने एका युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली गेल्याची घटना घडली. मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढले आहे. चालू वर्षात आतापर्यंत जिल्ह्यातून ११२ मुली बेपत्ता झाल्या, त्यातील ७२ जणींना शोधून परत आणले गेले. म्हटली तर ती वैयक्तिक बाब आहे, परंतु मुलींची असो की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची; कायद्याची फिकीर न बाळगता काही करून जाण्याची त्यांची मानसिकता कशी बळावत चालली आहे हेच यातून स्पष्ट व्हावे व तेच खरे धोकादायक आहे.

प्रत्येक गुन्ह्यामागील कारणे भलेही वेगवेगळी असतात, परंतु त्यात एक बाब जोडीला असते ती म्हणजे कायद्याबद्दलची निडरता. अन्यथा थेट कुणाचा जीव घेण्यापर्यंत मजल गाठलीच जात नाही. यासाठीच कायद्याचा धाक असणे गरजेचे असते. विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध तब्बल २७८ कारवाया केल्या गेल्याचे पाहता संबंधितांना पोलिसांचा धाक उरलेला नाही ही बाब उघड होणारी आहे. सार्वजनिक पातळीवर दहशत निर्माण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांना त्यांच्याच परिसरात मिरवले जाते ते त्याचसाठी. अकोल्यात अशी कुणाची ''वरात'' काढली गेल्याचे अलीकडील उदाहरण नाही. उगाच ती काढली जावी असेही कुणी म्हणणार नाही, परंतु राजरोसपणे बोकाळू पाहणाऱ्या गुंडगिरीला रोखायचे तर तेच गरजेचे असते. त्यासाठी चौका-चौकांत पावत्या फाडणाऱ्या पोलिसांसोबतच गुन्हेगारांना वठणीवर आणणारे पोलिसदादा दिसणे अपेक्षित आहे.

सारांशात, अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता ग्राफ चिंतादायी आहे. शैक्षणिक व मेडिकल हब म्हणून पुढे येत असलेल्या अकोल्याच्या प्रगतीस ही वाढती गुन्हेगारी मारक ठरणारी असल्याने यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करताना ''माझे शहर, माझी सुरक्षितता'' या भूमिकेतून ही गुन्हेगारी रोखण्यास सारे मिळून कटिबद्ध होऊया, इतकेच यानिमित्ताने...

-किरण अग्रवाल(लेखक अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी