शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सारांश : कायद्याचा धाक ओसरतोय की काय?

By किरण अग्रवाल | Updated: August 13, 2023 15:59 IST

हत्यांसह गुन्हेगारी घटनांमधील वाढ चिंताजनक, समाजस्वास्थ्य बिघडविणारी

क्षुल्लक कारणातून कुणाची हत्या करताना कायद्याचा जराही धाक बाळगला जात नसेल तर अशी स्थिती पोलिसांसाठीच आव्हानात्मक ठरते. यातून समोर येणारी निडरता समाज स्वास्थ्यासाठी घातक असल्याने अकोला पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार करणे अपेक्षित आहे.

एखाद्या मेट्रो शहरातील गुन्हेगारीशी स्पर्धा करावी अशा पद्धतीने सध्या अकोला शहर व जिल्ह्यात हत्यांच्या घटना घडून येत असल्याने समाज मन धास्तावणे स्वाभाविक बनले आहे. दिवसेंदिवस उंचावणारा गुन्हेगारीचा हा आलेख रोखायचा तर त्यासाठी कायद्याचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे.

सामाजिक स्वास्थ्य ही तशी खूप मोठी संकल्पना झाली, त्यासाठी अनेक बाबींचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते; पण ती बिघडण्याच्या संदर्भाने विचार केला तर त्यात गुन्हे, घातपाताचे प्रकारच अधिक परिणामकारक ठरत असल्याचे दिसून येते. त्याचदृष्टीने अकोला जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकारांकडे बघितले जायला हवे, कारण त्यातून सामाजिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. पातुर तालुक्यात नात्यातीलच एका नराधमाने एका तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना अलीकडेच समोर आली. अशा घटना व्यापक स्तरावर समाजमन भयभीत करणाऱ्या ठरतात. वैयक्तिक तसेच सामाजिक सुरक्षिततेच्या भावनेला त्यातून धक्के बसत असल्याने या प्रकारांकडे गांभीर्याने बघणे गरजेचे होऊन बसते.

अकोला शहर व जिल्ह्यात गेल्या जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजे सात-साडेसात महिन्यांत तब्बल २७ खुनाच्या घटना घडल्या आहेत. यातील दोन खून हे चक्क पिस्तूलने गोळी झाडून केले गेले आहेत. प्राणघातक हल्ल्यांचे प्रकार ३५ ते ४० घडले आहेत. छोट्या मोठ्या चोऱ्या वा लुटीचे प्रकारही काही कमी नाहीत. अकोल्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे असे राजकीय स्वरूपाचे आरोप योग्य ठरणार नाहीत, मात्र कायद्याचा धाक कमी होत चालला आहे की काय, असा प्रश्न ही आकडेवारी पाहता नक्कीच उपस्थित व्हावा. मेट्रो शहरांनाही लाजवणारी ही हत्यांची आकडेवारी आहे.

विशेष म्हणजे अतिशय किरकोळ कारणातून थेट खून व भोसकाभोसकीचे प्रकार घडून आल्याचे दिसून येते. याच आठवड्यातले उदाहरण घ्या. हिंगणा फाटा परिसरात केवळ शिवीगाळ केल्याचा राग आल्याने एका युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली गेल्याची घटना घडली. मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढले आहे. चालू वर्षात आतापर्यंत जिल्ह्यातून ११२ मुली बेपत्ता झाल्या, त्यातील ७२ जणींना शोधून परत आणले गेले. म्हटली तर ती वैयक्तिक बाब आहे, परंतु मुलींची असो की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची; कायद्याची फिकीर न बाळगता काही करून जाण्याची त्यांची मानसिकता कशी बळावत चालली आहे हेच यातून स्पष्ट व्हावे व तेच खरे धोकादायक आहे.

प्रत्येक गुन्ह्यामागील कारणे भलेही वेगवेगळी असतात, परंतु त्यात एक बाब जोडीला असते ती म्हणजे कायद्याबद्दलची निडरता. अन्यथा थेट कुणाचा जीव घेण्यापर्यंत मजल गाठलीच जात नाही. यासाठीच कायद्याचा धाक असणे गरजेचे असते. विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध तब्बल २७८ कारवाया केल्या गेल्याचे पाहता संबंधितांना पोलिसांचा धाक उरलेला नाही ही बाब उघड होणारी आहे. सार्वजनिक पातळीवर दहशत निर्माण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांना त्यांच्याच परिसरात मिरवले जाते ते त्याचसाठी. अकोल्यात अशी कुणाची ''वरात'' काढली गेल्याचे अलीकडील उदाहरण नाही. उगाच ती काढली जावी असेही कुणी म्हणणार नाही, परंतु राजरोसपणे बोकाळू पाहणाऱ्या गुंडगिरीला रोखायचे तर तेच गरजेचे असते. त्यासाठी चौका-चौकांत पावत्या फाडणाऱ्या पोलिसांसोबतच गुन्हेगारांना वठणीवर आणणारे पोलिसदादा दिसणे अपेक्षित आहे.

सारांशात, अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता ग्राफ चिंतादायी आहे. शैक्षणिक व मेडिकल हब म्हणून पुढे येत असलेल्या अकोल्याच्या प्रगतीस ही वाढती गुन्हेगारी मारक ठरणारी असल्याने यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करताना ''माझे शहर, माझी सुरक्षितता'' या भूमिकेतून ही गुन्हेगारी रोखण्यास सारे मिळून कटिबद्ध होऊया, इतकेच यानिमित्ताने...

-किरण अग्रवाल(लेखक अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी