शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

सारांश : कायद्याचा धाक ओसरतोय की काय?

By किरण अग्रवाल | Updated: August 13, 2023 15:59 IST

हत्यांसह गुन्हेगारी घटनांमधील वाढ चिंताजनक, समाजस्वास्थ्य बिघडविणारी

क्षुल्लक कारणातून कुणाची हत्या करताना कायद्याचा जराही धाक बाळगला जात नसेल तर अशी स्थिती पोलिसांसाठीच आव्हानात्मक ठरते. यातून समोर येणारी निडरता समाज स्वास्थ्यासाठी घातक असल्याने अकोला पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार करणे अपेक्षित आहे.

एखाद्या मेट्रो शहरातील गुन्हेगारीशी स्पर्धा करावी अशा पद्धतीने सध्या अकोला शहर व जिल्ह्यात हत्यांच्या घटना घडून येत असल्याने समाज मन धास्तावणे स्वाभाविक बनले आहे. दिवसेंदिवस उंचावणारा गुन्हेगारीचा हा आलेख रोखायचा तर त्यासाठी कायद्याचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे.

सामाजिक स्वास्थ्य ही तशी खूप मोठी संकल्पना झाली, त्यासाठी अनेक बाबींचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते; पण ती बिघडण्याच्या संदर्भाने विचार केला तर त्यात गुन्हे, घातपाताचे प्रकारच अधिक परिणामकारक ठरत असल्याचे दिसून येते. त्याचदृष्टीने अकोला जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकारांकडे बघितले जायला हवे, कारण त्यातून सामाजिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. पातुर तालुक्यात नात्यातीलच एका नराधमाने एका तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना अलीकडेच समोर आली. अशा घटना व्यापक स्तरावर समाजमन भयभीत करणाऱ्या ठरतात. वैयक्तिक तसेच सामाजिक सुरक्षिततेच्या भावनेला त्यातून धक्के बसत असल्याने या प्रकारांकडे गांभीर्याने बघणे गरजेचे होऊन बसते.

अकोला शहर व जिल्ह्यात गेल्या जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजे सात-साडेसात महिन्यांत तब्बल २७ खुनाच्या घटना घडल्या आहेत. यातील दोन खून हे चक्क पिस्तूलने गोळी झाडून केले गेले आहेत. प्राणघातक हल्ल्यांचे प्रकार ३५ ते ४० घडले आहेत. छोट्या मोठ्या चोऱ्या वा लुटीचे प्रकारही काही कमी नाहीत. अकोल्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे असे राजकीय स्वरूपाचे आरोप योग्य ठरणार नाहीत, मात्र कायद्याचा धाक कमी होत चालला आहे की काय, असा प्रश्न ही आकडेवारी पाहता नक्कीच उपस्थित व्हावा. मेट्रो शहरांनाही लाजवणारी ही हत्यांची आकडेवारी आहे.

विशेष म्हणजे अतिशय किरकोळ कारणातून थेट खून व भोसकाभोसकीचे प्रकार घडून आल्याचे दिसून येते. याच आठवड्यातले उदाहरण घ्या. हिंगणा फाटा परिसरात केवळ शिवीगाळ केल्याचा राग आल्याने एका युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली गेल्याची घटना घडली. मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढले आहे. चालू वर्षात आतापर्यंत जिल्ह्यातून ११२ मुली बेपत्ता झाल्या, त्यातील ७२ जणींना शोधून परत आणले गेले. म्हटली तर ती वैयक्तिक बाब आहे, परंतु मुलींची असो की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची; कायद्याची फिकीर न बाळगता काही करून जाण्याची त्यांची मानसिकता कशी बळावत चालली आहे हेच यातून स्पष्ट व्हावे व तेच खरे धोकादायक आहे.

प्रत्येक गुन्ह्यामागील कारणे भलेही वेगवेगळी असतात, परंतु त्यात एक बाब जोडीला असते ती म्हणजे कायद्याबद्दलची निडरता. अन्यथा थेट कुणाचा जीव घेण्यापर्यंत मजल गाठलीच जात नाही. यासाठीच कायद्याचा धाक असणे गरजेचे असते. विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध तब्बल २७८ कारवाया केल्या गेल्याचे पाहता संबंधितांना पोलिसांचा धाक उरलेला नाही ही बाब उघड होणारी आहे. सार्वजनिक पातळीवर दहशत निर्माण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांना त्यांच्याच परिसरात मिरवले जाते ते त्याचसाठी. अकोल्यात अशी कुणाची ''वरात'' काढली गेल्याचे अलीकडील उदाहरण नाही. उगाच ती काढली जावी असेही कुणी म्हणणार नाही, परंतु राजरोसपणे बोकाळू पाहणाऱ्या गुंडगिरीला रोखायचे तर तेच गरजेचे असते. त्यासाठी चौका-चौकांत पावत्या फाडणाऱ्या पोलिसांसोबतच गुन्हेगारांना वठणीवर आणणारे पोलिसदादा दिसणे अपेक्षित आहे.

सारांशात, अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता ग्राफ चिंतादायी आहे. शैक्षणिक व मेडिकल हब म्हणून पुढे येत असलेल्या अकोल्याच्या प्रगतीस ही वाढती गुन्हेगारी मारक ठरणारी असल्याने यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करताना ''माझे शहर, माझी सुरक्षितता'' या भूमिकेतून ही गुन्हेगारी रोखण्यास सारे मिळून कटिबद्ध होऊया, इतकेच यानिमित्ताने...

-किरण अग्रवाल(लेखक अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी