शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

सारांश : कायद्याचा धाक ओसरतोय की काय?

By किरण अग्रवाल | Updated: August 13, 2023 15:59 IST

हत्यांसह गुन्हेगारी घटनांमधील वाढ चिंताजनक, समाजस्वास्थ्य बिघडविणारी

क्षुल्लक कारणातून कुणाची हत्या करताना कायद्याचा जराही धाक बाळगला जात नसेल तर अशी स्थिती पोलिसांसाठीच आव्हानात्मक ठरते. यातून समोर येणारी निडरता समाज स्वास्थ्यासाठी घातक असल्याने अकोला पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार करणे अपेक्षित आहे.

एखाद्या मेट्रो शहरातील गुन्हेगारीशी स्पर्धा करावी अशा पद्धतीने सध्या अकोला शहर व जिल्ह्यात हत्यांच्या घटना घडून येत असल्याने समाज मन धास्तावणे स्वाभाविक बनले आहे. दिवसेंदिवस उंचावणारा गुन्हेगारीचा हा आलेख रोखायचा तर त्यासाठी कायद्याचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे.

सामाजिक स्वास्थ्य ही तशी खूप मोठी संकल्पना झाली, त्यासाठी अनेक बाबींचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते; पण ती बिघडण्याच्या संदर्भाने विचार केला तर त्यात गुन्हे, घातपाताचे प्रकारच अधिक परिणामकारक ठरत असल्याचे दिसून येते. त्याचदृष्टीने अकोला जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकारांकडे बघितले जायला हवे, कारण त्यातून सामाजिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. पातुर तालुक्यात नात्यातीलच एका नराधमाने एका तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना अलीकडेच समोर आली. अशा घटना व्यापक स्तरावर समाजमन भयभीत करणाऱ्या ठरतात. वैयक्तिक तसेच सामाजिक सुरक्षिततेच्या भावनेला त्यातून धक्के बसत असल्याने या प्रकारांकडे गांभीर्याने बघणे गरजेचे होऊन बसते.

अकोला शहर व जिल्ह्यात गेल्या जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजे सात-साडेसात महिन्यांत तब्बल २७ खुनाच्या घटना घडल्या आहेत. यातील दोन खून हे चक्क पिस्तूलने गोळी झाडून केले गेले आहेत. प्राणघातक हल्ल्यांचे प्रकार ३५ ते ४० घडले आहेत. छोट्या मोठ्या चोऱ्या वा लुटीचे प्रकारही काही कमी नाहीत. अकोल्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे असे राजकीय स्वरूपाचे आरोप योग्य ठरणार नाहीत, मात्र कायद्याचा धाक कमी होत चालला आहे की काय, असा प्रश्न ही आकडेवारी पाहता नक्कीच उपस्थित व्हावा. मेट्रो शहरांनाही लाजवणारी ही हत्यांची आकडेवारी आहे.

विशेष म्हणजे अतिशय किरकोळ कारणातून थेट खून व भोसकाभोसकीचे प्रकार घडून आल्याचे दिसून येते. याच आठवड्यातले उदाहरण घ्या. हिंगणा फाटा परिसरात केवळ शिवीगाळ केल्याचा राग आल्याने एका युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली गेल्याची घटना घडली. मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढले आहे. चालू वर्षात आतापर्यंत जिल्ह्यातून ११२ मुली बेपत्ता झाल्या, त्यातील ७२ जणींना शोधून परत आणले गेले. म्हटली तर ती वैयक्तिक बाब आहे, परंतु मुलींची असो की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची; कायद्याची फिकीर न बाळगता काही करून जाण्याची त्यांची मानसिकता कशी बळावत चालली आहे हेच यातून स्पष्ट व्हावे व तेच खरे धोकादायक आहे.

प्रत्येक गुन्ह्यामागील कारणे भलेही वेगवेगळी असतात, परंतु त्यात एक बाब जोडीला असते ती म्हणजे कायद्याबद्दलची निडरता. अन्यथा थेट कुणाचा जीव घेण्यापर्यंत मजल गाठलीच जात नाही. यासाठीच कायद्याचा धाक असणे गरजेचे असते. विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध तब्बल २७८ कारवाया केल्या गेल्याचे पाहता संबंधितांना पोलिसांचा धाक उरलेला नाही ही बाब उघड होणारी आहे. सार्वजनिक पातळीवर दहशत निर्माण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांना त्यांच्याच परिसरात मिरवले जाते ते त्याचसाठी. अकोल्यात अशी कुणाची ''वरात'' काढली गेल्याचे अलीकडील उदाहरण नाही. उगाच ती काढली जावी असेही कुणी म्हणणार नाही, परंतु राजरोसपणे बोकाळू पाहणाऱ्या गुंडगिरीला रोखायचे तर तेच गरजेचे असते. त्यासाठी चौका-चौकांत पावत्या फाडणाऱ्या पोलिसांसोबतच गुन्हेगारांना वठणीवर आणणारे पोलिसदादा दिसणे अपेक्षित आहे.

सारांशात, अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता ग्राफ चिंतादायी आहे. शैक्षणिक व मेडिकल हब म्हणून पुढे येत असलेल्या अकोल्याच्या प्रगतीस ही वाढती गुन्हेगारी मारक ठरणारी असल्याने यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करताना ''माझे शहर, माझी सुरक्षितता'' या भूमिकेतून ही गुन्हेगारी रोखण्यास सारे मिळून कटिबद्ध होऊया, इतकेच यानिमित्ताने...

-किरण अग्रवाल(लेखक अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी