शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

विशेष लेख: भिक्षा पात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे॥

By विश्वास मोरे | Updated: June 18, 2024 08:45 IST

आषाढी वारीसाठी शासनाने दिंड्यांना २० हजार रुपये अनुदानाची घोषणा केली आहे. त्यावरून वारकरी संप्रदायात मत-मतांतरे सुरू झाली आहेत.

डॉ. विश्वास मोरे, मुख्य उपसंपादक, लोकमत, पुणे

महाराष्ट्राचे सांस्कृतिक, आध्यात्मिक वैभव म्हणजेच वारी. वारीला आध्यात्मिक, धार्मिक संदर्भ आहेत, तसेच ही वारी संसाराच्या फेऱ्यात गुरफटलेल्यांसाठी स्वानंदाची, स्वयंपूर्णतेची अनुभूती देणारीही ठरते. आषाढी वारी तोंडावर आली आहे, तर शासनाने दिंड्यांना २० हजार रुपये अनुदानाची घोषणा केली आहे. त्यावरून वारकरी संप्रदायात मत-मतांतरे सुरू झाली आहेत. शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या देवस्थानांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. कुणाचीही मदत न घेता वारीची वाट चालणाऱ्या संतांच्या पायिकांनी विरोध दर्शविला आहे. 'मुख्यमंत्री साहेब, दिंड्यांना अनुदान नको, सेवासुविधांचे सक्षमीकरण करा', असा सूर आळवला जात आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानदेव माउलींपासून संतश्रेष्ठ तुकोबारायांपर्यंतच्या सकल वारकरी संतांनी आषाढी वारीचे महत्त्व विशद केले आहे. 'बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव', या संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या वचनांची अनुभूती वारीत गेल्याशिवाय मिळणार नाही. देहू, आळंदीहून निघणारा हा भक्तीचा प्रवाह जीवन आणि जगण्याचे भान देतो. वास्तविक वारीत कोणतीही दिंडी कोणाचीही मदत न घेता वारीची वाट चालते. ती स्वयंपूर्ण असते. स्वयंपूर्णता ही वारकऱ्यांची जीवननिष्ठा आहे. कोणीही मागणी केली नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी घोषणा केली आहे. ती म्हणजे दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान देण्याची. त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. देहू-आळंदी देवस्थानच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांत मत-मतांतरे सुरू झाली आहेत. खरे तर, शासनास मदतच करायची झाल्यास पालखी तळ जागा, तेथील सुविधांवर लक्ष केंद्रित करायला हवे. आध्यात्मिक सोहळ्याचे स्वरूप आता जगण्याचे भान देत आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी...' असे संतांचे वचन कृतीत आणण्याची गरज आहे. आळंदी देवस्थानाचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांच्या मते, वारीच्या मार्गावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची मोहीम, पर्यावरणाची वारी करण्याची गरज आहे. 'निर्मलवारी' संकल्पनेतून स्वच्छतेला बळ द्यावे, वैद्यकीय सुविधा सक्षम कराव्यात. सेवासुविधांचे सक्षमीकरण करावे. अनुदानाबाबत दोन मते आहेत. सर्व मतांचा विचार व्हावा.

देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या मते, 'संतांच्या वारी सोहळ्यास वळ देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे, ही चांगली वाव आहे. आम्ही निर्णयाचे स्वागत करतो.' संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रशांत महाराज मोरे यांनी अनुदानाला कडाडून विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले, 'भिक्षा पात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे॥' शासनाच्या वीस हजार रुपयांच्या मदतीवर वारी म्हणजे, वारी या भक्तिरसपूर्ण शब्दावर आणि परंपरेवरच आघात आहे. यामुळे निष्काम वारीपासून दिंडी आणि वारकरी दुरावणार आहे. पंढरीची वारी ही एक साथना आणि व्रत आहे. त्यामुळे पंढरीची वारी आहे माझे घरी; पण ती शासनाच्या वीस हजारी उपकारावर, अशी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होणार आहे. स्वकमाईतून दिंडीला पाचशे ते काही हजार त्या वारकऱ्यांकडून भिशी दिली जाते. अनेक ठिकाणी दिंड्यांच्या पंगती ठरलेल्या असतात. अनेक ठिकाणी अन्नदात्यांकडून अन्नदान केले जाते. त्यामुळे पंढरीच्या वारकऱ्यांना या मदतीची आवश्यकता नाही. तो निधी सरकारने वारीच्या वाटेवर सोयी-सुविधांसाठी किंवा इतर मदतीसाठी खर्च करावा, खऱ्या आचार, विचार आणि उच्चार करणाऱ्या पंढरीच्या वारकऱ्यांनी ही मदत स्वीकारू नये किंवा शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा.' छत्रपती शिवरायांनी पाठवलेला नजराणा तुकोबारायांनी स्पर्श न करता परत पाठवला होता आणि 'तुमचे येर वित्त धन। ते मज मृत्तिकेसमान॥' असा त्या धनाचा माती म्हणून उल्लेख केला होता. त्यामुळे खरा वारकरी किंवा दिंडीप्रमुख अशी शासनाकडे कोणतीही मागणी करणार नाही. वारीसाठी शासन दरवर्षी खर्च करण्याचे ढोल बडवीत असले तरी प्रत्यक्षात आजही मार्गावर वारकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तोकडे अनुदान देण्यापेक्षा आध्यात्मिक सुख देणाऱ्या वारीतील सुविधांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी