शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चिमुरड्या मुलांना जग कळण्याआधी मृत्यू कसा कळतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 07:47 IST

सतत टोकाला जाणारा राग हा एक आजार आहे आणि त्यावर औषधोपचारही असतात! लहान मुलांइतकेच मोठ्या माणसांच्या बाबतीतही हे खरे आहे!

खेळताना हरणे, मित्र-मैत्रिणींनी चिडवणे, आई-वडील रागावणे.. यामुळे राग टोकाला गेलेली मुले काहीही करतात. मुले इतकी टोकाला का जाऊ लागली आहेत?  मुलांचा राग टोकाला जाणे याबाबतच्या बातम्या अलीकडे वरचेवर वाचायला मिळतात हे खरे, पण म्हणून या फक्त आजकालच्या गोष्टी असाव्यात असे निदान क्लिनिक प्रॅक्टिसमध्ये तरी वाटत नाही. हे आधीपासून होतेच. आता अशा टोकाच्या घटना घडतात, तेव्हा त्याकडे लक्ष जाऊन  त्यांची बातमी होण्याचे प्रमाण वाढले असावे. याबाबत जागरूकता आल्याचेही हे लक्षण आहेच.

राग सहन न होण्यामागे कसला ‘ट्रिगर’ असू शकेल?  पटकन व खूप राग येणे हा काही जणांच्या स्वभावाचा भाग असतो. वातावरण पोषक असेल तर तो वाढत जातो. अगदी लहान वयातल्या मुलांच्या जगात आत्महत्येचे विचार.. आणि थेट कृती हे कसे, कुठून आले असावे?  विशेषतः १५-४५ या वयोगटात हे प्रमाण अधिक दिसते. निदान न झालेले मानसिक आजार, हिंसक वातावरण, कोणाचेही लक्ष  नसणे, नशेचे पदार्थ, आत्महत्या करायची साधने सहज हाताशी असणे आणि एकटेपणा ही त्याची प्रमुख कारणे आहेत. मुलांच्या आत्महत्यांच्या बातम्या ठळक प्रसिद्ध होणे योग्य आहे का? त्याबाबत काय काळजी घ्यायला हवी?

मुलांच्या आत्महत्यांचे रिपोर्टिंग हा खूप संवेदनशील मुद्दा आहे. या बातम्यांचा मुलांवर नकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मुलांच्या आत्महत्यांचे वार्तांकन कसे करावे याबाबातच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन माध्यमांनी करणे गरजेचे आहे.

१. बालक म्हणजे १८ वर्षांखालील व्यक्ती. या वयोगटातील आत्महत्या किंवा आत्महत्येच्या प्रयत्नांचे सविस्तर वार्तांकन टाळावे. त्यामुळे मुलांमध्ये त्याची ‘काॅपी’ होण्याची दाट शक्यता असते.  जी लहान मुले आत्महत्या, त्याचे परिणाम याबाबत अनभिज्ञ असतात, त्यांच्याबाबतीत आत्महत्यांच्या बातम्या वाचून त्याची पुढे भविष्यात काॅपी होण्याचा धोका सर्वात जास्त असतो.

२. लहान मुले चित्रे, कार्टून याकडे पटकन आकर्षित होतात. आत्महत्यांच्या बातम्यांमध्येही जर उदास मुले, डोळ्यातून पाणी वाहणारी मुले अशा प्रकारची चित्रे वापरून  बातमी दिली गेली असेल तर त्या प्रभावानेही मुलांमध्ये आत्महत्येची ‘काॅपी’ होण्याचा धोका असतो.

३. मुलांच्या आत्महत्येच्या बाबतीत अनेक घटक कार्यरत असतात. त्यामुळे बातमीत आत्महत्येचे एकच एक कारण सांगणे चुकीचे आणि धोकादायक असते. लहान मुलाने परीक्षेतील अपयशामुळे आत्महत्या केली असे सांगून/लिहून/छापून घटनेचे सामान्यीकरण होते. ‘परीक्षेत अपयश आले तर आत्महत्या करावी’ असा समज मुलांमध्ये होण्याची दाट शक्यता असते.

४. कोवळ्या, बहरण्याच्या वयात जीवनाचा शेवट.. अशा  प्रकारच्या शब्दांच्या फुलोऱ्यांमुळे आत्महत्येच्या घटनांना अनावश्यक आणि उपद्रवी ‘ग्लॅमर’ मिळते. मुलांचे लक्ष आत्महत्येच्या घटनांकडे आकर्षित होते.

५. मुलांच्या आत्महत्येच्या, आत्महत्येच्या प्रयत्नांच्या बातम्या देताना त्यात आवर्जून मुलांसाठी-पालकांसाठी काम करणाऱ्या हेल्पलाइनचे नंबरही द्यायला हवेत. जेणेकरून मुले, पालकांना वेळेत मदत मिळू शकेल.

६. परीक्षांचे निकाल जाहीर होण्याच्या काळात मुलांच्या आत्महत्यांच्या दुर्दैवी घटना घडतात. या काळात शिक्षक, पालक, धोरणकर्त्यांना मार्गदर्शन करणारा मजकूर माध्यमांनी आवर्जून प्रसिद्ध करायला हवा. अडचणीत असलेल्या मुलांपर्यंत त्यामुळे वेळेत मदत पोहोचू शकते.आपल्या मुलाचा राग हा काळजीचा विषय आहे, हे पालकांनी कसे ओळखावे? मुलांच्या भावना सतत उतू जात असतील आणि भांडणे, रुसवा, खंडणी मागणे अशा प्रकारे वारंवार व्यक्त होत असतील तर मदत घेण्याची जरूर आहे हे लक्षात ठेवावे.

रागाला औषध असते का? हो. रागाची व्यवस्थित ट्रीटमेंट होऊ शकते. प्रत्येकाच्या रागाचा एक पॅटर्न असतो तो शोधून मानसोपचार आणि राग आजारातून येणारा असेल तर औषधोपचार करून या रागावर नियंत्रण आणता येते. हे लहान मुलांइतकेच मोठ्या माणसांच्या बाबतीतही खरे आहे!- डाॅ. भूषण शुक्ल, बालमानसोपचार तज्ज्ञ 

हेल्पलाइन- ९९२२००४३०५, ९९२२००११२२