शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

विनेश, हसीना आणि काही धुमसते प्रश्न... एकीकडे खेळातील राजकारण, दुसरीकडे षड्‌यंत्र!

By विजय दर्डा | Updated: August 12, 2024 07:36 IST

विनेश फोगाट आणि शेख हसीना.. दोघींचा एकमेकींशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही; पण एकात खेळातील राजकारण, तर दुसऱ्यात षड्‌यंत्राचे!

-डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

गेल्या आठवड्यात भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बांगलादेशच्या परागंदा पंतप्रधान शेख हसीना या दोन व्यक्तींबाबत जगभर चर्चा होत राहिली. दोघींचा एकमेकींशी काहीही संबंध नाही, तरीही त्या दोघी माझ्या या सदराचा विषय झाल्या आहेत. याचे कारण दोघींशी संबंधित घटना कोठे ना कोठे राजकारणाशी जोडलेल्या आहेत. एकात खेळातील राजकारण आहे, तर दुसऱ्यात षड्‌यंत्राचे राजकारण दिसते. दोन्ही प्रकरणांत काही लोकांचा अहंकारही दिसतो.

सर्वप्रथम खेळात शिरलेल्या राजकारणाची अतिशय वाईट पद्धतीने शिकार झालेल्या आपल्या देशाच्या मुलीची चर्चा करू. राजकारणाची दहशत आणि शोषणाविरुद्ध ज्यांच्या लढ्याची गोष्ट आपल्याला ठाऊक आहे. ती पुन्हा सांगण्याची गरज नाही; परंतु विनेशच्या संघर्षाची झळ ज्यांना पोहोचली त्यांच्यासाठी स्वतःचा अहंकार, राजकारण, विनेशला धडा शिकवण्याची संधी यापुढे त्यांना आपला देश, देशाचा ध्वज काहीही दिसले नाही. 

विनेश मुळात ५३ किलो वजनी गटात कुस्ती करते. तिला त्याच गटातून ऑलिम्पिकला पाठवायला हवे होते. परंतु, तिच्या जागी अंतिम पांघाल नामक कुस्तीपटूला पाठवण्यात आले. पहिल्याच फेरीत ती बाद झाली आणि नंतर आपल्या कार्डावर बहिणीला खेळाच्या स्टेडियममध्ये घुसवण्याचा प्रयत्न करून तिने देशाची मान खाली घातली. विनेशकडे ५० किलो वजनी गटातून खेळण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता; परंतु या मुलीने आपण हार मानणारे नाही, हे दाखवून दिले. 

विनेश जेव्हा अंतिम फेरीत पोहोचली, तेव्हा तिचे रौप्यपदक नक्की झाले होते. सारा देश तिच्या सुवर्णपदकाची आशा करत होता. परंतु, १०० ग्रॅम वजन जास्त झाल्याच्या बातमीने १४० कोटी भारतीयांचे सुवर्णाचे स्वप्न आणि विनेशचे हृदय विदीर्ण केले. कोट्यवधी क्रीडाप्रेमींना धक्का बसला. भारतीय खेळांना राजकारणाने आपले बटीक केले आहे, असे मला येथे नाइलाजाने म्हणावे लागते. खेळात अशी वाईट परिस्थिती उद्भवण्याचे कारण राजकारणच आहे. अन्यथा आमच्या खेळाडूंत काही कमतरता नाही. अमेरिका किंवा चीनसारखी आपण सुवर्णपदके खेचून आणू शकतो. पदकांची तालिका आणि त्या देशांची लोकसंख्या यांची तुलना करा. चीनला बाजूला ठेवले, तर वरच्या ३० देशांची एकंदर लोकसंख्या आपल्या देशापेक्षा कमी आहे. आपण विज्ञान-तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात जगाला वरचढ ठरू शकतो, तर खेळात का नाही?, परंतु येथे खेळात राजकारण घुसले आहे. करणार तरी काय?

राजकारण ही अत्यंत विचित्र गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीवर कब्जा करू इच्छिते. राजकारणाच्या स्वभावातच मालकी आहे. असे नसते, तर बांगलादेशच्या शेख हसीनांची अशी दुर्दशा झाली असती का? हसीना यांनी १५ वर्षांपूर्वी सत्ता हाती घेतली, तेव्हा बांगलादेशची परिस्थिती वाईट होती. परंतु, हसीना यांनी आपल्या देशाला नव्या टप्प्यावर पोहोचवले. ‘प्रगती आणि विकासाची नवी कहाणी’ असे या बदलाचे वर्णन जागतिक बँकेने केले. २०३१ पर्यंत बांगलादेश उच्च मध्यमवर्गीय उत्पन्नाचा देश होऊ शकतो. २०२६ पर्यंत सर्वांत कमी विकसित देशांच्या गटातून बांगलादेश बाहेर पडू शकतो, असे आशियाई विकास बँकेने म्हटले. सुधारलेल्या आर्थिक स्थितीबरोबरच दहशतवादाविरुद्ध देशाने मजबूत लढाई दिली. ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण अवलंबिले. जेव्हा देशाची अशी प्रगती होत होती, तेव्हा असे काय झाले की, लोक शेख हसीना यांच्यावर नाराज होऊन त्यांना देश सोडून पळून जावे लागले?

गेल्या काही दिवसांत बांगलादेशमध्ये महागाई वाढली, हे खरे होते. लोक नाराज होते. आरक्षणविरोधी आंदोलन सुरू झाले होते; परंतु शेख हसीना यांची सत्ता उलथवली जावी इतकी ताकद या आंदोलनात नव्हती. वास्तवात हसीना यांचे भारताशी असलेले मजबूत नाते ज्यांना खुपत होते, अशा आंतरराष्ट्रीय शक्ती त्यांच्यावर नाराज होत्या. विशेषत: चीनची नाराजी, तर स्पष्ट होती. हसीना यांनी बांगलादेशात आपल्याला स्थान द्यावे, अशी चीनची इच्छा होती. भारताशी बांगलादेशच्या संबंधांवरून इतर महाशक्तीही खूप नाराज होत्या. हसीना त्यांच्यापैकी कोणाचेच ऐकत नव्हत्या. त्यांच्यासाठी त्यांचा देश महत्त्वाचा होता, म्हणून त्या कडक राहिल्या.

यातच विद्यार्थी आंदोलनाच्या नावाने ‘जमात-ए- इस्लामी’ची विद्यार्थी शाखा मैदानात उतरली. बऱ्याच वर्षांपासून हसीना यांची सत्ता उलथवण्याची संधी ही संघटना शोधत होती. जमात-ए-इस्लामी या पाकिस्तानधार्जिण्या संघटनेने १९७१ साली बांगलादेशच्या निर्मितीला कसून विरोध केला होता, हे लक्षात ठेवले पाहिजे. 

कोणताही बांगलादेशी देशभक्त विद्यार्थी राष्ट्रपिता म्हणवल्या जाणाऱ्या शेख मुजीबुर्रहमान यांचा पुतळा फोडील, अशी कल्पना आपण करू शकता काय? मुजीबुर्र यांचा पुतळा तोडणारे लोक जमात- ए- इस्लामीचे होते, हे स्पष्ट झाले आहे. याच जमातीच्या लोकांनी बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले केले आणि त्यांची घरे लुटली.

भारताने प्रसंग ओळखून पावले टाकली नसती, तर सत्ता उलथवणाऱ्या या लोकांनी हसीना यांना ठार मारले असते. त्यांचे पिता शेख मुजीबुर्रहमान यांना मूलतत्त्ववाद्यांनीच मारले होते. नशीब म्हणजे हसीना भारतात येऊ शकल्या आणि त्यांचे प्राण वाचवून भारताने जगाला हे दाखवून दिले की, संकटकाळात भारत बांगलादेशबरोबर उभा आहे. 

शेजारी आग लागली, तर त्याच्या झळा आपल्यालाही बसतात हे आपण जाणतो, म्हणून बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित करणे आणि त्या देशाला कट्टरपंथीयांपासून वाचवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. क्रीडा संघटनांना राजकीय नेत्यांनी आपल्या कह्यात का ठेवले आहे, हा एक गंभीर प्रश्न होय.

vijaydarda@lokmat.com डाॅ. विजय दर्डा यांचे समग्र लेखन

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Vinesh Phogatविनेश फोगटBangladeshबांगलादेशPoliticsराजकारण