शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

अन्वयार्थ: सध्या देशात अनेकांना फार अस्वस्थ वाटते आहे, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 09:51 IST

राजकीय विरोधक म्हणजे ज्यांच्यावर राग धरावा, ज्यांची थट्टा करावी किंवा ज्यांना चिरडून टाकावे, असे व्यक्तिगत शत्रू नव्हेत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे!

अश्वनी कुमार, माजी केंद्रीय कायदामंत्री

भारताच्या राज्यघटनेची पायमल्ली होत असल्याची उदाहरणे हल्ली वारंवार समोर येत आहेत. लोकशाहीचे सत्त्व आणि खोली यावर त्यामुळे प्रश्नचिन्ह लागताना दिसते. अलीकडच्या काळात विरोधी पक्षनेत्यांनी संसदेत केलेल्या निवेदनांच्या नोंदी कामकाजातून वगळण्यात आल्या. राज्यसभेत पंतप्रधानांच्या भाषणात अडथळे आले. काही अपवाद वगळता लोकप्रतिनिधींचे सभागृहातले वागणे  बालिशपणाचे असल्याने संसदेचे पावित्र्य नष्ट होत आहे. जातीवरून भेदभाव केला गेल्याने आलेला मानसिक ताण असह्य होऊन देशाच्या अग्रगण्य शिक्षणसंस्थेत एका १८ वर्षांच्या मुलानेआत्महत्या केली ; तसेच १६ वर्षांच्या एका विद्यार्थ्याला प्राचार्यांनी बदडून काढले ; कारण तो मुलगा त्यांच्या बाटलीतील पाणी प्यायला होता. या सर्व घटना सामाजिक विषमता अजूनही थैमान घालत असल्याचे यातनादायी स्मरण देणाऱ्या होत.उत्तर प्रदेशमध्ये विरोधी पक्षाच्या एका विद्यमान आमदाराला १५ वर्षांपूर्वी वाहतूक अडवल्याच्या प्रकरणात दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली ; ही शिक्षाही अवाजवीच होती. राज्याच्या विधानसभेतील या सदस्याची आमदारकी त्यामुळे गेली. खटल्यांच्या कामकाजातून दमनचक्र फिरवले जात आहे. न्याय यंत्रणेची चाके फिरली की, अनेकांच्या प्रतिष्ठा धुळीला मिळतात. ही एक मानभंगाची उपाय नसलेली, न संपणारी कहाणी होऊन बसली आहे.

ही अशी संस्थात्मक अस्वस्थता देशाच्या घटनात्मक लोकशाहीच्या इमारतीला तडे जात असल्याचे सांगते. मात्र, या ढासळत्या लोकशाहीविषयी आपल्या राजकीय व्यासपीठांवर कोठेही फारसे बोलले जात नाही.  राजकीय पक्षांचे नेते भूतकाळ उकरून काढत एकमेकांवर चिखलफेक करतात. आपली राजकीय भाषाही अत्यंत दांभिक आणि व्यक्तिगत द्वेषाने भरलेली, राजकीय संकुचितपणा दाखवणारी झाल्याने वातावरण कलुषित होते. परस्परांचा आदर राखला जाईल, असे वचन घटनेने दिले. त्याला या वातावरणात नख लागते. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडतो. भाषा, संस्कृती, कल्पनाशक्ती आणि इतिहास हे घट्ट धाग्याने बांधलेले आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे. आरडाओरडा करून नव्हे तर सभ्यपणे बोलूनच जे म्हणायचे ते लोकांपर्यंत पोहोचत असते.

आपल्या आदरणीय पूर्वजांनी त्यांची भव्य स्वप्ने गद्य -पद्यातून व्यक्त केली, ती आदर्शवादाने ठासून भरलेली होती. भव्य, उदात्त अशा ध्येयांसाठी त्यांनी मने प्रज्वलित केली. त्यांची भाषा हृदय आणि बुद्धी यांच्यातील दुवा झाली. लोकशाहीची भाषा सगळ्यांचे समजून घेणारी, संतुलित विचारांची आणि समजावून सांगणारी असते. ती कोणाला दुखावत नाही. उलट आदर करते. राजकीय विरोधक म्हणजे ज्यांच्यावर  राग धरावा, ज्यांची थट्टा करावी किंवा ज्यांना चिरडून टाकावे, असे व्यक्तीगत शत्रू नव्हेत ! लोकशाही म्हणजे एखाद्या बलदंड माणसाने दीन दुबळ्यांवर हुकूमत गाजवणे नव्हे. अतिरेक टाळून मध्यममार्ग स्वीकारणे लोकशाहीत अपेक्षित असते. सहज संवादातून हे उद्दिष्ट गाठता येते.

नेतेमंडळी बोलतात कसे याला लोकशाहीत महत्त्व असते. सार्वजनिक जीवनातील व्यक्तीचे स्थान त्यांच्या उच्चारणावर ठरते. आपण कोण आहोत, हेही त्यातून सांगितले जाते. म्हणून असे म्हणावेसे वाटते की, भारतीय लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी राजकीय संवादाचा दर्जा वाढवला पाहिजे. सभ्यतेची म्हणून काही ताकद असते. यावर विश्वास असणारे तर्कसंगत असे बोलणे व्हायला हवे.

सत्तारूढांनी लोकसत्ता योग्य प्रकारे वापरावी, हेच प्रजासत्ताकात अभिप्रेत आहे. सत्तेचा गैरवापर होत असेल तर, विरोधकांना त्याविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवता आला पाहिजे. सदसद्विवेकबुद्धीचा आवाज ऐकून जनमताचा कानोसा घेतल्यावर जे समोर येईल त्यावरच आपले राजकीय विश्व उभे आहे. याची वैभवशाली देशाचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांनी निदान कल्पना करावी आणि ते टिकून कसे राहील हे पहावे. तेच त्यांच्यापुढचे  सर्वात मोठे आव्हान आहे.

टॅग्स :Politicsराजकारण