शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

तरुण मुलांना सांगा, ‘बोल, के लब आजाद हैं तेरे’...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 08:48 IST

फैज अहमद फैज यांनी लिहिलेल्या कवितांवरचे दोन उतारे अभ्यासक्रमातून काढून टाकणे हे कशाचे निदर्शन आहे? विचार मोकळा हवा, निवडीचे स्वातंत्र्य तर हवेच हवे.

पवन वर्मा,राजकीय विषयाचे विश्लेषक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) प्रसिद्ध उर्दू कवी फैज अहमद फैज यांनी लिहिलेल्या कवितांवरचे दोन उतारे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमातून काढून टाकले. ‘डेमोक्रेटिक पॉलिटिक्स’ या एनसीईआरटीच्या दहावीच्या पुस्तकात ‘धर्म, जातीयता आणि राजकारण’ या शीर्षकाचा पाठ गेल्या दशकभरापासून आहे. उतारे का वगळण्यात आले, याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. शालेय अभ्यासक्रमाचा आशय तपासून पाहण्याचा अधिकार त्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांना असतो, हे मान्यच! काही वेळा ते गरजेचेही असते. आपला शैक्षणिक आशय अजूनही बराचसा वसाहतकाळात अडकलेला आहे. देशाची लक्षणीय ऐतिहासिक विविधता त्यातून प्रतिबिंबित होत नाही. 

- अर्थात, हे खरे असले तर फैज यांच्या लेखनाला कात्री का लावली, हा प्रश्न उरतोच. ते काय सामान्य कवी होते? देशद्रोही होते? धर्मांध होते? - या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे ठाम नकार! फैज उर्दूतील महान कवी होते. त्यांच्या गझला आणि कविता भारत- पाकिस्तानातच काय, पण जगभर प्रसिद्ध  आहेत. साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन झाले होते आणि शांततेचा लेनिन पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. ते लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या राजवटीच्या विरुद्ध होते. पाकिस्तानातील लष्करी हुकूमशहांविरुद्ध ते लढले. ‘बोल के लब आजाद हैं तेरे’ किंवा ‘हम देखेंगे’ या त्यांच्या गाजलेल्या रचनांनी न्याय आणि स्वातंत्र्य मागणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. 

- पण मग केवळ फैजसाहेब पाकिस्तानी आहेत म्हणून उतारा वगळला गेला का? त्या देशाशी आपले राजकीय आणि लष्करी संबंध गंभीर स्वरूपात बिघडलेले आहेत हे खरे. या शेजाऱ्याशी आपले दोनदा युद्धही झाले आहे. तरीही यावरून सांस्कृतिक मुद्दे आणि लोकातला संवाद ओलीस ठेवावा का? आपण त्या देशाशी क्रिकेट सामने खेळतो. ते पाहायला अलोट गर्दी जमते. त्यांचा आपला सांस्कृतिक वारसा पुष्कळसा एक आहे. आपले सिनेमे तिकडे मोठी गर्दी खेचतात. मोहंजोदारो आणि हराप्पा पाकिस्तानात आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातून सिंधू संस्कृतीचा भाग वगळणार का? तक्षशीला हे प्रसिद्ध प्राचीन विद्यापीठ पाकिस्तानात आहे. ते ज्याचे प्रतीक ते सर्व शहाणपण आपण अडवायचे का? ब्रिटिशांनी भारत जिंकला आणि लुटला. इतिहास पुसता येत नसेल तर बदला म्हणून आपण शेक्सपिअरवर बंदी घालायची का? संस्कृती आणि सर्जनशीलता राजकीय सीमा आणि इतिहासाच्या स्मृतीपलीकडे जाते, हे आपण कधी ध्यानी घेणार? सध्या सत्तेवर असणाऱ्यांच्या मनात उर्दूविषयी आकस आहे का?

- कदाचित! पण उर्दूला इस्लामशी जोडणे अशिक्षित अतिउजव्या हिंदू मूलतत्त्ववाद्यांच्या घातक मूर्खपणाचे लक्षण होय. उर्दू भारतीय भाषा असून, पाकिस्तानातही बोलली जाते. अतिशय उदात्त विचारांचा ठेवा तसेच नजाकतीचे भावप्रकटन या भाषेत आहे. ते एका धर्माशी जोडणे हा सांस्कृतिक अडाणीपणा होईल. फैजसाहेब फाळणीमुळे पाकिस्तानी होणार असतील तर मिर्झा गालिब, मोमीन झक, मुन्शी प्रेमचंद, गुलजार, जावेद अख्तर, (ही काही नावे झाली) यांचे काय करायचे? हे सगळे उर्दूतच तर लिहितात... हा वेडेपणा कोठे थांबणार आहे? हिंदू हिताची अशी संकुचित व्याख्या करणे सांस्कृतिक अडाणीपणाचे द्योतक होय. फैज याचे बळी ठरले का?

सीबीएसईने ‘डेमोक्रसी अँड डायव्हर्सिटी’ तसेच ‘चॅलेंजेस टू डेमोक्रसी’ या विषयावरची दोन प्रकरणेही अभ्यासक्रमातून काढली. - का? ती सुसंगत राहिली नाहीत का? वैविध्याचा आदर न करता लोकशाही मार्गक्रमण करू शकेल का? लोकशाहीसमोरची आव्हाने कोणती, त्यांचा सामना कसा करायचा ते तरुणांनी शिकू नये का? लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार अशी आव्हाने निर्माण करीत असेल तरी? खंडन मंडनाच्या वातावरणातच शिक्षण आणि संस्कृती चांगली वाढते. विचार मोकळा हवा, निवडीचे स्वातंत्र्य हवे. मोठ्या लेखकांचे, विचारवंतांचे संस्कार ते कुठे जन्मले याचा संबंध न आणता व्हायला हवेत. जे केवळ पायतळी पाहून चालतात आणि संकुचित विचारांच्या मर्यादेत शैक्षणिक अभ्यासक्रम बांधू पाहतात, ते महान बौद्धिक वारसा असलेल्या भारतीय संस्कृतीचे मोठे नुकसान करणार आहेत. त्यांच्या पापाची फळे भारतीय विद्यार्थांना भोगावी लागता कामा नयेत.