शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सोयाबीन खरेदीचा उद्भवेल उद्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 03:47 IST

- धर्मराज हल्लाळेपावसाळा लांबला, त्यातच परतीच्या पावसाने मराठवाड्यातील सर्वाधिक क्षेत्र व्यापणाºया सोयाबीनचे नुकसान झाले़ मालाची आर्द्रता वाढली़ परिणामी, तूर जशी श्रेणीत अडकली तशी सोयाबीन खरेदी आर्द्रतेत अडकणार आहे़ साधारणत: आर्द्रता १२ टक्क्यांपर्यंत असावी, असा नियम आहे़ परंतु, बहुतांश ठिकाणी ती १४ टक्क्यांपर्यंत आहे़ हमीभाव जाहीर आहे, परंतु, आर्द्रतेच्या नियमात अधिकृत ...

- धर्मराज हल्लाळे

पावसाळा लांबला, त्यातच परतीच्या पावसाने मराठवाड्यातील सर्वाधिक क्षेत्र व्यापणाºया सोयाबीनचे नुकसान झाले़ मालाची आर्द्रता वाढली़ परिणामी, तूर जशी श्रेणीत अडकली तशी सोयाबीन खरेदी आर्द्रतेत अडकणार आहे़ साधारणत: आर्द्रता १२ टक्क्यांपर्यंत असावी, असा नियम आहे़ परंतु, बहुतांश ठिकाणी ती १४ टक्क्यांपर्यंत आहे़ हमीभाव जाहीर आहे, परंतु, आर्द्रतेच्या नियमात अधिकृत केंद्रांवर सोयाबीन स्वीकारले जाणार नाही, अशी परिस्थिती आहे़ उडीद व मुगाच्या विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी सुरू आहे़ नोंदणीनुसार खरेदी केंद्रांकडून संदेशही पाठविले जात आहेत़ परंतु, सोयाबीनची नोंदणी होताना दिसत नाही़ बाजारपेठेत मात्र हमीभावापेक्षा हजार ते पंधराशे रुपये कमी दराने काही काळ खरेदी केली गेली़ दरम्यान, हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जाऊ नये यासाठी सरकारी यंत्रणेने इशारा दिला़ त्याला प्रतिसाद मिळाला नाही़ उलट हमीभावाप्रमाणे भाव देणे परवडत नाही म्हणून बहुतांश ठिकाणी व्यापाºयांनी खरेदी बंद ठेवली आहे़लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणीसह मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सोयाबीन विक्रीकरिता आॅनलाईन नोंदणीसाठी कोणीही पुढे येत नाही़ परिणामी, अधिकृत केंद्रांमध्ये आठ दिवसांमध्ये प्रत्यक्ष खरेदीचा प्रश्नच उद्भवला नाही़ एकंदर तुरीनंतर सोयाबीन खरेदी हा विषय नव्या उद्रेकाला तोंड फोडणारा आहे़ सरकार व यंत्रणा त्यावर गंभीर विचार करेल, अशी अपेक्षा आहे़ राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला़ गेल्या दोन महिन्यात १२ वर्षांत पहिल्यांदाच केंद्र सरकारने शेतकºयांच्या बाजूने चारवेळा अधिसूचना काढल्या़ आयात शुल्क वाढवून दाळीच्या आयातीवर निर्बंध लावले, निर्यातीवरची बंधने उठविली. ज्याचा शेतकºयांना लाभ होईल़ हे सर्व गृहित धरले तरी प्रत्यक्ष शेतकºयांना हमीभावही मिळत नाही वा शासनाने घेतलेल्या निर्णयाचा हितकारी दृश्य परिणाम समोर येत नाही, ही वस्तुस्थिती केंद्र व राज्याच्या कृषी मूल्य आयोगाने समजून घेतली पाहिजे़ सोयाबीनमध्ये १२ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता नसेल, डाग नसेल तरच अधिकृत केंद्रात खरेदी होणार आहे़ आता खुल्या बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढविणे हा पर्याय सरकार समोर आहे़ अन्यथा येणाºया काळात रोषाला सामोरे जावे लागेल़ न परवडणारा ३ हजार ५० रुपये इतकाही हमीभाव मिळत नसेल तर शेतकरी कर्जाच्या फेºयातून बाहेर येईल कसा अन् त्याची शेती शाश्वत होईल कशी? कर्जमाफी तांत्रिक कारणांमुळे अडथळ्याच्या शर्यतीत अडकली आहे़ पावसाळा लांबल्याने दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची काढणी आली़ त्याचवेळी रीन (ऋण) काढून सण साजरा करणाºया माणसांनी निम्म्या भावात, खुल्या बाजारात सोयाबीन विकले तर ते नवल कसले़ अन् त्याचा बाजारात फायदा उठविला जात नसेल तर तो बाजार कसला?मध्य प्रदेश सरकार भावांतर योजना राबवित आहे़ प्रत्यक्ष मिळणारा भाव आणि हमीभावातील फरक सरकार शेतकºयांना देणार आहे़ या तात्कालिक योजनांबरोबरच कच्च्या व प्रक्रिया केलेल्या खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविले अन् सोयाबीनच्या पेंढीवरील निर्यात अनुदान वाढविले तर सोयाबीनला योग्य भाव मिळेल, हा राज्य कृषी मूल्य आयोगाचा दावा व्यवहार्य ठरला पाहिजे़ त्यासाठी केवळ चांगल्या निर्णयाचा आभास पुरेसा नाही़ थेट अंमलबजावणीची वेळ आहे़