शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण विरुद्ध उत्तर? भाषा मने जोडू शकते हे खरे; पण ती भडकली तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 08:55 IST

हिंदी बोलणारे लोक सर्वाधिक असले तरी हिंदी सर्वांवर लादावी, हे अनेक राज्यांना अर्थातच अमान्य आहे. ‘एक देश, एक भाषा’ हे सूत्रच मुळात भारताच्या कल्पनेला पायदळी तुडवणारे. 

भाषा मने जोडू शकते हे खरे; पण ती भडकली तर तोडफोडही करू शकते. शेजारच्या पाकिस्तानातून बांगलादेश वेगळा होण्याचे मुख्य कारण भाषा हेच होते. भारतानेही भाषिक अस्मितांची युद्धे अगदी स्वातंत्र्यापासून पाहिली आहेत. भारतात हजारो भाषा आहेत आणि बावीस भाषा अधिकृत आहेत. हिंदी बोलणारे लोक सर्वाधिक असले तरी हिंदी सर्वांवर लादावी, हे अनेक राज्यांना अर्थातच अमान्य आहे. ‘एक देश, एक भाषा’ हे सूत्रच मुळात भारताच्या कल्पनेला पायदळी तुडवणारे. 

नव्या शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्रानुसार देशात तिसरी भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार करावा, असा आग्रह केंद्राने गैरहिंदी राज्यांकडे धरला आणि दाक्षिणात्य राज्यांत, खासकरून तामिळनाडूमध्ये बंडाची ठिणगी पडली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात रुपयाचे चिन्ह तमिळ लिपीत वापरून हा संघर्ष तीव्र करत असल्याचे दाखवून दिले. आपल्या विचाराला पाठिंबा देऊ शकतील, अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या भूमिकेला पाठिंबा देण्याबाबत साकडेसुद्धा घातले. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या बदलाची माहिती मिळताच त्यांनी टीकेची झोड उठवली. ‘द्रमुकला विरोध करायचाच होता तर, मग तो २०१० मध्येच का नाही केला? तेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने हे चिन्ह देशात लागू केले होते आणि केंद्रातील त्या सरकारमध्ये द्रमुकही होते’, असा सवाल त्यांनी विचारला. यानिमित्ताने पुन्हा एकदा ‘केंद्र विरुद्ध प्रादेशिक अस्मिता’ असा संघर्ष उभा ठाकला आहे. हा केवळ भाषेचा मुद्दा नाही. केंद्राच्या एकाधिकारशाहीला विराेधही आहे. भारत हा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक राज्यांचा संघ आहे. त्यामुळे येथे केंद्र आणि राज्य यांचे नाते एकमेकांना पूरक, एकमेकांवर अवलंबून असलेले आणि काही बाबतीत स्वायत्त राहिलेले आहे. आजवरचा आपला राजकीय प्रवास एकपक्षीय वर्चस्व विरुद्ध प्रादेशिक पक्ष असा राहिला आहे. 

तामिळनाडूत तमिळ भाषिक अस्मिता प्रखर आहे. काँग्रेसच्या वर्चस्वाला माेडून काढत प्रादेशिक पक्षांनी इथे सत्ता मिळवली आणि ती टिकवूनही ठेवली. हिंदी ही राष्ट्रीय भाषा करण्यास दाक्षिणात्य राज्यांचा कायम विराेध राहिला आहे. आता तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयालादेखील आव्हान देण्यात आले आहे. केंद्राचे वर्चस्व वाढत जाते, तेव्हा प्रादेशिक पक्ष आपली स्थानिक अस्मिता तीव्र करतात. लोकसंख्येच्या आधारावर लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचे केंद्राने ठरविले आहे. हिंदी भाषिक राज्यांच्या तुलनेत कमी लोकसंख्या असलेल्या दाक्षिणात्य राज्यांसाठी हा प्रस्ताव अन्यायकारक आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धाेक्यात येऊ शकते. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीने ‘दक्षिण विरुद्ध उत्तर’ हा संघर्ष किती तीव्र आहे, याची जाणीव तर करून दिलीच; पण दक्षिण भारताचा भाजपविरोधी कौलही स्पष्टपणे समोर आला. आज तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, केरळ या राज्यांत भाजपविरोधी सरकारे आहेत. त्यामुळे आगामी काळात दक्षिण भारताचे महत्त्व केंद्राकडून हेतूतः कमी केले जाण्याची शक्यता आहेच. दुसरीकडे, द्रमुकची सत्ता शाबूत राखण्यासाठी स्टॅलिन यांना तमिळ अस्मिता तीव्र करणे हाच मार्ग आहे. 

तामिळनाडूच्या राजकारणात आजवर प्रादेशिक अस्मिता, भावनिकता आणि पडद्यावरचा करिष्मा हे मुद्दे प्रभावी ठरले आहेत. त्यामुळे इथले सत्ताधीश संकटात सापडले की प्रादेशिक मुद्दा तापवतात. हेच आतादेखील सुरू आहे. नव्या पिढीचे सुपरस्टार विजय यांनी ‘तमिळलग वेत्री कळघम पक्ष’ (टीव्हीके) स्थापन करून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केल्यामुळे स्टॅलिन आधीच अडचणीत हाेते. त्यांना आता भाषेचा मुद्दा मिळाला आणि त्याचा लाभ घेण्याचा पुरेपूर प्रयत्न ते करत आहेत. विजय सांगत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, कामराज, वेलू नचियार, अंजलाई अम्मल हा सामाजिक वारसा आणि तमिळ भाषा-संस्कृती-अस्मिता याने राजकीय समीकरणे बदलू शकतात. द्रमुकला शह देण्यासाठी अण्णाद्रमुक आता विजय यांच्या टीव्हीकेशी हातमिळवणी करण्याची शक्यता अधिक आहे. भाजपची त्यांना छुपी साथ मिळू शकते. त्यामुळे जनाधारासाठी स्टॅलिन यांनी तमिळ भाषेच्या अस्मितेला मुद्दा बनवणे स्वाभाविक आहे. भाषेच्या भुयारातून दक्षिण विरुद्ध उत्तर संघर्ष सुरू होण्याची ही नांदी आहे!

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू