शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘क्षमा वीरस्य भूषणम्’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:16 IST

‘ज्यांच्यासोबत मी लहानपणी बॅडमिंटन खेळलो त्याच शिपायांनी माझ्या आजीवर गोळ्या झाडून तिची निर्घृण हत्या केली.

‘ज्यांच्यासोबत मी लहानपणी बॅडमिंटन खेळलो त्याच शिपायांनी माझ्या आजीवर गोळ्या झाडून तिची निर्घृण हत्या केली. त्याचा राग दीर्घकाळ मनात होता. पण पुढे तो मावळत गेला. त्यानंतर लिट्टेच्या ज्या मारेकऱ्यांनी माझ्या वडिलांचा स्फोटक मृत्यू घडवून आणला त्यांचाही राग मनात होता. तोही आता राहिला नाही. आता मला त्या मारेकºयांच्या घरातल्या मुला-मुलींची अधिक आठवण येते. मी त्यांना मनापासून क्षमा केली आहे. त्यांना मोकळे करण्यावर माझा कोणताही आक्षेप नाही. माझ्याएवढे माझ्या बहिणीचे, प्रियंकाचे मनही मोठे व मोकळे असल्याने तिनेही त्यांना क्षमा केली आहे.’ हे राहुल गांधी यांनी सिंगापूरमधील एका वार्तालापात काढलेले उद्गार हिंसा आणि हिंसाचार व सूड आणि सूडाचार या वृत्ती मनात बाळगणाºया साºयांनीच लक्षात घ्यावे असे आहेत. राहुल गांधी संत नाहीत, ते राजकीय नेते आहेत. पण राजकारणातली काही माणसे अशी की त्यांच्यावर अहिंसेचा व मनुष्यधर्माचा संस्कार टिकला आहे. मोतीलाल नेहरू आणि त्यांच्या पत्नी स्वरूपादेवी यांनी स्वराज्याच्या आंदोलनात अनेकदा तुरुंगवास अनुभवला. विजयालक्ष्मी आणि कृष्णा या त्यांच्या दोन कन्यांनीही आंदोलने करून तुरुंगवास ओढवून घेतला. त्यांचे चिरंजीव जवाहरलाल हे तर स्वातंत्र्यलढ्याचे नेतेच होते. राहुल गांधींवर मोतीलालजींपासून राजीव गांधीपर्यंतच्या चार पिढ्यांचा देशभक्ती व अहिंसापरतेचा संस्कार आहे. १९५० च्या सुमाराची येथे नोंदविण्याजोगी एक घटना. पं. जवाहरलाल नेहरू इंग्लंडच्या दौºयावर होते. त्यांच्यासोबत त्यांची कन्या इंदिराही होती. त्यावेळी सर विन्स्टन चर्चिल हे दुसºयांदा इंग्लंडच्या पंतप्रधानपदावर आले होते. त्यांची भेट झाली तेव्हा चर्चिल यांनी इंदिरा गांधींना विचारले ‘तुझ्या वडिलांना आम्ही अकरा वर्षे तुरुंगात ठेवले, त्यात त्यांचा छळही केला. त्याचा राग तुझ्या मनात अजून आहे काय’. एका क्षणाचाही विचार न करता इंदिरा गांधी म्हणाल्या ‘नाही’. आम्ही गांधीजींचे अनुयायी आहोत. त्यांनी आम्हाला सूड शिकविला नाही. ममत्व आणि उदारपणच तेवढे सांगितले. त्यामुळे तुम्हीही तुमच्या तेव्हाच्या निर्णयांचा आता पश्चात्ताप करण्याचे कारण नाही.’ शेवटी हिंसा वा सूड ही एक प्रवृत्ती आहे. तिचा संस्कारही सहज साध्य नसतो. तो दीर्घकाळच्या शिकवणुकीतून वा घरातल्या वातावरणातूनच यावा लागतो. तो धर्मातून वा धार्मिक म्हणवून घेणाºया संघटनांमधून येत नाही. नथुराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या घालून त्यांचा खून केला. त्याच्यावर खुनाचा खटला सुरू असताना त्याने रामदास गांधी या गांधीजींच्या चिरंजीवांना पत्र लिहून आपण तो खून का केला ते सांगितले. पुढे रामदास आणि नथुराम यांच्यात बरेच दिवस पत्रव्यवहार चालला. रामदासांनी नथुरामच्या साºया प्रश्नांची त्याला निरुत्तर करणारी उत्तरे दिली. अखेरच्या पत्रात रामदासांनी लिहिले ‘साºया देशाने ज्याला आपला पिता मानले तो गांधी माझा बाप होता. तू त्याची हत्या केलीस. हा देश तुला कदाचित क्षमा करणार नाही. पण मी बापूंच्या संस्कारात वाढलो आहे. जा, मी तुला क्षमा केली आहे.’ क्षमाशीलता ही उपजतच असावी वा संस्कारातून येत असावी. महावीरांनी तर क्षमा हे शूराचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. दुबळ्यांना फक्त द्वेष करता येतो, भयभीतांना शस्त्रे बाळगावीशी वाटतात. दया, क्षमा व शांती या गोष्टी फक्त सामर्थ्यवानांनाच साधत असतात असे उद्गार प्रत्यक्ष कस्तुरबांनीही एकदा काढले आहेत. ज्यांना कसलेही भय नाही ते निर्भय लोक गांधींसारखे शत्रूच्या राज्यातही नि:शस्त्र राहतात व सत्तेशी लढा देतात. गांधींनी या देशावर नि:शस्त्र व निर्भय राहण्याचा संस्कार केला तसा शत्रूवरही प्रेम करण्याचा संदेश दिला. तो ज्यांना स्वीकारता आला नाही, त्या करंट्यांना काही म्हणायचे नसते. त्यांची फक्त कीवच करायची असते. राहुल आणि प्रियंका या दोघांनी त्यांच्या वडिलांच्या मारेकºयांबाबत जी क्षमाशील वृत्ती धारण केली ती गांधीजींच्या शिकवणीची व भ. महावीरांच्या ‘क्षमा वीरस्य भूषणम्’ या संदेशाची साक्ष देणारी आहे.