शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

सुखकर्ता, दु:खहर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:27 IST

- मिलिंद कुलकर्णीगणेशोत्सव धुमधडाक्यात सुरु झाला. सर्वत्र उत्साहपूर्ण, मंगलमय आणि आनंददायी वातावरण आहे. प्रसारमाध्यमांमध्ये गणपतीविषयक संदेश, छायाचित्रांचे अदान प्रदान सुरु आहे. गणपतीबाप्पा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करेल, दु:ख दूर करेल, अशी प्रत्येक भाविकाची नितांत श्रध्दा आहे. मनोभावे पूजेतून तो हीच भावना प्रकट करीत असतो. उत्सव असल्याने प्रत्येक व्यक्ती, मंडळ, संस्था आपल्या ...

- मिलिंद कुलकर्णीगणेशोत्सव धुमधडाक्यात सुरु झाला. सर्वत्र उत्साहपूर्ण, मंगलमय आणि आनंददायी वातावरण आहे. प्रसारमाध्यमांमध्ये गणपतीविषयक संदेश, छायाचित्रांचे अदान प्रदान सुरु आहे. गणपतीबाप्पा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करेल, दु:ख दूर करेल, अशी प्रत्येक भाविकाची नितांत श्रध्दा आहे. मनोभावे पूजेतून तो हीच भावना प्रकट करीत असतो. उत्सव असल्याने प्रत्येक व्यक्ती, मंडळ, संस्था आपल्या ऐपतीनुसार, कल्पनेनुसार, क्षमतेनुसार ते साजरा करीत असतात. कुठे वर्गणीचा आधार असतो, तर कुठे काही व्यक्ती, संस्था, उद्योग या उत्सवासाठी मदतीचा भक्कम हात देतात. त्यामुळे बाप्पांची मूर्ती भव्य दिव्य, मंडप मोठा, रोषणाई, सजावट अनोखी, मिरवणुका विशाल, लेझीम, ढोल, ताशा पथकांमधील सदस्यांची संख्या सर्वाधिक असते. मंडळाची परंपरा, पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लावली जाते. इतर मंडळांपेक्षा आपण काकणभर सरस राहण्यासाठी धडपड केली जाते. याची खरोखर आवश्यकता आहे काय, असा प्रश्न सामान्यजनांच्या मनात निर्माण होतो.याउलट काही मंडळे जाणीवपूर्वक सामाजिक बांधिलकी, काळाचे भान ओळखत उपक्रमशीलता जोपासतात. आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियांना धान्यवाटप, त्यांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप, अनाथगृह, बालनिरीक्षणगृहात वर्षातून काही दिवस भोजन अशा उपक्रमांपासून तर काही जण शासकीय उपक्रमांना मदत करतात. कुठे पाणपोई उभारणे, चौक सुशोभीकरण करणे, गाव दत्तक घेणे, शेततळे वा नाला खोलीकरण करुन देणे यात मंडळे आर्थिक आणि शारीरिक हातभार लावतात. उत्सवामधील बडेजाव दूर सारत अनेक मंडळांनी यंदा केरळमधील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत केली.गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. व्यापार-उद्योग क्षेत्रात उत्साह असतो. दुष्काळाची दाट छाया दाटलेली असताना सणाचा मुहूर्त साधून नागरिक खरेदी करतात. तशी गणेशचतुर्थीला झाली. हा उत्साह टिकेल, पाऊस येऊन शेतातील पीक वाचेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.गणेश मंडळांनी उत्सवकाळात काही पथ्य पाळावी, आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने यंदाही केले. त्याविषयी मात्र मंडळ पदाधिकाºयांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मंडळांचे मंडप रस्त्यात आहेत, त्याबद्दल कुणाची तक्रार राहणार नाही. उत्सव म्हणून दहा दिवस नागरीक त्रास सोसतात. पण मंडपापलिकडचा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवला पाहिजे. उगाच गाड्या लावून तोही बंद करता कामा नये. कार्यक्रम किंवा दर्शनाच्या वेळी दोरी बांधून तो बंद होऊ नये. त्यासोबतच लाऊड स्पीकरचा आवाज ध्वनिमर्यादा ओलांडणार नाही, अशी काळजी घ्यायला हवी. रहिवासी भागातील वयोवृध्द नागरीक, लहान मुले, परीक्षार्र्थींसह सर्वसामान्यांना आवाजाचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कुमारवयीन किंवा तरुण मुलांच्या हाती सर्वत्र सूत्रे असल्याने त्यांना समजावून सांगायला गेल्यास गैरसमज होण्याची भीती, वादाचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता अधिक असते. उत्सवाच्या शेवटी भंडाºयांचे आयोजन केले जाते. उष्टे अन्न, पत्रावळी, पाण्याचे पेले इतस्तत: पडलेले असतात. ते कचराकुंडीत टाकले जातील, याची खबरदारी घ्यायला हवी. उत्सवाचा आनंद सगळ्यांना मिळायला हवा, त्रास व्हायला नको, याची काळजी गणेश मंडळांच्या ज्येष्ठ, अनुभवी पदाधिकाºयांनी घ्यायला हवी. बहुसंख्य मंडळे ती घेतातच, पण एखाद-दुसºया मंडळांमुळे वादाचे प्रसंग ओढवतात. तेही घडू नये, म्हणून प्रयत्न व्हायला हवे. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या मंगलमूर्तीचे आगमन, वास्तव्य आणि विसर्जन सारेच आनंददायी, मंगलदायी व्हायला हवे, नाही का?

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Jalgaonजळगाव